<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-27527214</id><updated>2011-12-27T09:38:02.403-08:00</updated><title type='text'>विखुरलेले मोती</title><subtitle type='html'>काळाच्या ओघात अनेक मोती विखरुन गेले. त्या मोत्यांना हुडकून त्यांची सुरेख मौक्तिक माला गुंफण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>23</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-3331831775375170289</id><published>2011-12-14T02:06:00.000-08:00</published><updated>2011-12-14T02:09:42.229-08:00</updated><title type='text'>उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई</title><content type='html'>भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीज वसाहतींचा विचार केला तर सर्वप्रथम आठवतो तो गोवा. भारत स्वतंत्र झाल्यावरही काही काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेला, पोर्तुगीज संस्कृती जोपासलेला आणि त्याचवेळेस पोर्तुगीज अंमलाखाली दबलेला गोवा. परंतु खुद्द महाराष्ट्रातील, मुंबईच्या अगदी जवळची वसईची पोर्तुगीज वसाहत त्यामानाने चटकन लक्षात येत नाही. ती आजही उपेक्षित राहिल्यासारखी वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वसईच्या किल्ल्याचा नकाशावसईचा इतिहास एखाद्या पक्क्या वसईकराला विचाराल तर अगदी अभिमानाने आणि प्रेमाने तो तुम्हाला माहिती देईल आणि ही माहिती देण्यात कोणत्याही धर्माची वा जातीची व्यक्ती मागे नसेल याची खात्री अगदी छातीठोकपणे देता येईल. अर्थातच, माहिती देण्याची प्रत्येकाची आवृत्ती वेगवेगळी असेल. पुरातन काळापासून सोपारा बंदरामुळे विविध देशांतील, धर्मांतील लोकांचा वावर या परिसरात राहिला आहे आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आला आहे. ब्राह्मण, सारस्वत, सामवेदी, सोमवंशी क्षत्रिय, आगरी, आदिवासी, ख्रिश्चन, मुसलमान आणि अगदी आफ्रिकेहून गुलाम म्हणून आणलेले हबशी अशा अनेक संस्कृती आजही येथे नांदतात. पूर्वापार काळापासून असलेली सुपीक माती, मासेमारी आणि सोबतीला लाकडाचे आणि चामड्याचे उद्योग यामुळे सुबत्ता मिळवलेल्या या प्रदेशात नानाविध लोक वस्तीला येऊन राहिल्याचे आणि कायमचे वसईकर झाल्याचे इतिहासात डोकावल्यास दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वसई जवळचं सोपारा बंदर सम्राट अशोकाच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होते, भरभराटीला आलेले होते तरी कालांतराने वसईचा परिसर राजकीय दृष्ट्या किंचित उपेक्षित झाला. अनेक वर्षांनी तिचा चेहरामोहरा बदलला तो पोर्तुगीजांनी तेथे वस्ती केल्यापासून. वसे असे मूळ नाव असणाऱ्या या प्रदेशाला पोर्तुगीजांनी बसैं (Bacaim) म्हणायला सुरुवात केली, पुढे इंग्रजांनी बसैंचे बसीन (Bassien) केले आणि त्यानंतर आता सद्यकाळी वसई या नावाने या शहराला ओळखले जाते. इतिहासातील; मुख्यत: मराठेशाहीतील काही महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार वसई राहिलेली आहे. पोर्तुगीजांपासून पुढे घडलेल्या इतिहासाचा आणि वसईच्या किल्ल्याचा थोडक्यात लेखाजोखा येथे घेतला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१६ व्या शतकात वसई आणि आजूबाजूचा प्रदेश गुजरातचा सुलतान कुतुबउद्दीन बहादुरशहाकडे होता. मुख्य राज्य गुजरातेत असल्याने त्याच्या काळातही हा प्रदेश उपेक्षितच राहिला. उलट लुटालूट, जाळपोळ, देवस्थानांना इजा पोहोचवणे वगैरे प्रकारांनी त्याने स्थानिकांना जेरीस आणले होते. याच सुमारास पोर्तुगीज दीव-दमण पासून गोव्यापर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत होते. बहादुरशहाला शह देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसईला दोन वेळा आग लावल्याचे कळते. गावांवर हल्ले करणे, लुटालूट करणे वगैरे प्रकार पोर्तुगीज आपल्या जहाजातून करत. “ज्याचं राज्य, त्याचाच धर्म” या उक्तीप्रमाणे देवळांवर बांधलेल्या मशीदींना तोडून तेथे चर्च उभे करण्याचा सपाटा पोर्तुगीजांनी लावला होता. जमिनीवरून मुघलांशी लढा आणि समुद्रावरून पोर्तुगीजांशी लढा, यांत बहादूरशहा जेरीस आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१५३४ मध्ये बहादूरशहाने नुनो डा’कुन्हा या पोर्तुगीज गवर्नरशी तह करून वसई, साष्टी, वरळी, कुलाबा, दीव-दमण, कल्याण, ठाणे, चौल हा सर्व प्रदेश पोर्तुगीजांना देऊन टाकला. अशा रीतीने, उत्तर कोकणावर पोर्तुगीजांचा अंमल आला. याच सुमारास वसईचा किल्ला बांधायला पोर्तुगीजांनी सुरुवात केली. तत्पूर्वी बहादूरशहाने आणि त्याच्या सुभेदाराने किनार्‍यानजीक उभारलेली तटबंदी आणि दुर्ग अस्तित्वात होते. वसईच्या किल्ल्याची माहिती लेखात पुढे बघू.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वसईच्या किल्ल्याचा दरवाजा या काळात पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर अनन्वित अन्याय केले. विहिरीत पाव किंवा गोमांस टाकून लोकांना बाटवण्याचे प्रकार केले. हिंदू मंदिरे तोडून तेथे चर्चेस उभी केली. जाळपोळ करणे, जमिनी हिसकावणे इ. प्रकार होत. एका पोर्तुगीज प्रवाशाच्या वर्णनानुसार हिंदू देवतांच्या मूर्ती जाळणे, त्यांची तोडफोड करणे नित्याचे होते. ज्या ठिकाणी हिंदू स्नानासाठी, धार्मिक विधींसाठी किंवा पापविमोचनासाठी जात असा तलाव पोर्तुगीजांनी नष्ट करून टाकला. या छळाला कंटाळून हिंदू, मुसलमान आणि पारशी लोकांनी येथून स्थलांतर करून शहाजहानच्या मुघली राज्यात आसरा घेतला. १७२० मधील एका नोंदीनुसार वसई भागात ६०००० च्या आसपास लोकसंख्या होती आणि त्यातील बहुतांश बाटलेल्या ख्रिश्चनांची आणि युरोपीयांची होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पोर्तुगीजांनी लाकडाचा आणि बांधकामासाठी लागणार्‍या दगडांचा व्यापार भरभराटीस आणला. घरांसाठी, जहाजांसाठी लागणारी उत्कृष्ट लाकडे आणि बांधकामासाठी तासलेले दगड यांची मोठी निर्यात वसईतून चाले. तत्कालीन पोर्तुगीज प्रवाशाने लिहिलेल्या नोंदीनुसार गोव्यातील अनेक चर्चच्या बांधकामांसाठी वसईतून दगड आणि दगडी खांब नेण्यात आले होते. व्यापारीदृष्ट्या हा वसईतील भरभराटीचा काळ असला तरी स्थानिक जनता अन्यायाखाली दबली जात होती. स्थानिक हिंदू आणि मुसलमानांना जुलमाने बाटवणे, त्यांना त्रास देणे, मूर्तींची आणि प्रार्थनास्थळांची तोडफोड करणे यांत पोर्तुगीजांची धर्मसत्ता इतकी उन्मत्त झाली होती की पुढे तिचा त्रास पोर्तुगीज अधिकार्‍यांना आणि राजसत्तेला होऊ लागला; कारण विविध कामांसाठी त्यांना स्थानिकांची गरज होती, मदत हवी होती, ती लोक वसई सोडून जाऊ लागल्याने मिळेनाशी झाली. अधिकार्‍यांनी याबाबत पोर्तुगीज राजसत्तेकडे केलेल्या तक्रारींच्या नोंदी मिळतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/6251618741/" title="Vasai Fort map by priya_v_p4, on Flickr"&gt;&lt;img alt="Vasai Fort map" height="456" src="http://farm7.staticflickr.com/6053/6251618741_81afb18859.jpg" width="500" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजी महाराजांचे लक्ष या जुलमांच्या बातम्यांनी वसईकडे वेधले होते. त्यांनी वसईवर कडक चौथाई लावली होती. पुढे पेशव्यांच्या डोळ्यातही वसई आणि वसईतील अत्याचार खुपत होतेच, पण प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. शेवटी अणजूरकर नाईकांनी "वसईप्रांत फिरंगीयांकडे आहे. त्याणें देवस्थानें व तीर्थे यांचा व महाराष्ट्रधर्म यांचा लोप केला. हिंदू लोक भ्रष्टाऊन क्षार केले. म्हणून साहेबी मसलत करून प्रांत मजकूर सर करून देवस्थापना करावी व स्वधर्मस्थापना होय ते गोष्टी करावी.” अशी तक्रार पहिल्या बाजीरावाकडे केली. या तक्रारीला यश येऊन वसईवर स्वारी करण्याचा बेत नक्की झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वसईचा वेढा सोपा नव्हता; तब्बल दोन वर्षे मराठ्यांनी कसून लढा दिला. वसईच्या किल्ल्याच्या तीन बाजूंनी समुद्र आणि दलदल असल्याने किल्ला काबीज करणे कठीण होते. शेवटी अर्नाळा, वर्सोवा वगैरे किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश मराठे व्यापत गेले. यामुळे पोर्तुगीज सैन्याच्या रसदीवर परिणाम झाला. शेवटी चर खणून आणि सुरुंग लावून तटाला भगदाडे पाडून मराठे आत घुसले. हे करताना मराठ्यांच्या सैन्याची मोठी हानी झाली, तरीही मराठ्यांनी १७३९ मध्ये किल्ला जिंकून घेतला. तत्कालीन नोंदींनुसार मराठ्यांचे १२००० सैनिक कामी आले तर ८०० पोर्तुगीज कामी आले. (या नोंदीत पोर्तुगीजांकडून लढलेल्या इतर सैन्याची नोंद नसावी.) विजयानंतर मराठा सैन्याने पोर्तुगीजांच्या चर्चवरच्या घंटा उतरवल्या आणि त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यातील एक घंटा नाशिकच्या नारोशंकराच्या मंदिरात असून ती मराठी भाषेत “नारोशंकराची घंटा” या वाक्प्रचाराने प्रसिद्ध आहे. तर दुसरी घंटा अष्टविनायकांतील बल्लाळेश्वराच्या मंदिरात आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/6252147692/" title="Darya Darwaja by priya_v_p4, on Flickr"&gt;&lt;img alt="Darya Darwaja" height="375" src="http://farm7.staticflickr.com/6213/6252147692_cace8c27ce.jpg" width="500" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;मात्र ज्याला धार्मिक युद्धाचे नाव दिले जाते त्या युद्धातील तहाच्या अटी फारच सौम्य होत्या. या अटींनुसार पोर्तुगीज सैन्याला वसई सोडून जाण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली, या सह त्यांची चल मालमत्ता आणि संपत्ती सोबत घेऊन जाण्याची परवानगीही देण्यात आली. आठ दिवसांनंतर मराठ्यांनी किल्ला आणि घरादारांची लूट केली. बरेचसे पोर्तुगीज गोव्याच्या दिशेने चालते झाले. दोनशे वर्षांहून अधिक काळ वसईवरील पोर्तुगीज अंमल अशा रीतीने संपला, परंतु पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा आजही वसईत शिल्लक आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे माधवराव पेशव्यांनी अनेक हिंदू कुटुंबांना वसईत वसण्यासाठी उद्युक्त केल्याचे सांगितले जाते. यावेळी पुण्याहून आणि कोकणातून अनेक हिंदू कुटुंबे वसईत स्थलांतरित झाली. सक्तीने किंवा फसवणूकीने बाटवलेल्यांना हिंदू धर्मात परत घेण्याचेही प्रयत्न माधवरावांनी केल्याचे दाखले मिळतात. मराठ्यांनी शर्थीने जिंकून घेतलेली वसई फार काळ त्यांच्या हाती टिकली नाही. खिळखिळीत झालेल्या पेशवाईला शह देऊन १७८० मध्ये इंग्रजांनी वसई जिंकून घेतली आणि वसईवर इंग्रजांचा अंमल आला. १८०२ मध्ये यशवंतरावाने पुण्यावर हल्ला केल्यावर दुसरा बाजीराव पळून वसईला इंग्रजांना शरण गेला. वसईच्या या दुसर्‍या तहात मराठेशाही बुडाली आणि पेशवे ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातले बाहुले बनले. त्यानंतर वसईला काही काळ बाजीपूर या नावानेही ओळखले जाई.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;किल्ल्याच्या आतील भागवसई आणि तिच्याजवळील माणिकपूर, पापडी, निर्मळ, रमेदी येथे पोर्तुगीजांनी बांधलेली सुरेख जुनी चर्चेस अद्यापही प्रार्थनास्थळे म्हणून वापरात आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;वसईचा किल्ला&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वसईचा किल्ला भुईकोट असून तो समुद्रकिनार्‍याशी बांधलेला आहे. तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रात दाखवल्याप्रमाणे किल्ल्याला दहा बुरूज आहेत. त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक, त्यांचा एक कप्तान अशी फौज तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/6252120480/" title="DSC00702 by priya_v_p4, on Flickr"&gt;&lt;img alt="DSC00702" height="375" src="http://farm7.staticflickr.com/6159/6252120480_97789cd156.jpg" width="500" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;किल्ल्याच्या आतील भागकिल्ल्याला दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे. किल्ल्यात न्यायालय, तीन चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात. किल्ल्यात चोर वाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत. महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना मराठी नावे दिली होती. कोकणातला, बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो. तरीही पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/6000908387/" title="Vasai Fort 2 by priya_v_p4, on Flickr"&gt;&lt;img alt="Vasai Fort 2" height="375" src="http://farm7.staticflickr.com/6021/6000908387_908559d043.jpg" width="500" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरूज रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती. त्यात सन १८६० मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकारयाला, कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात ऊसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. तसेही लोक बांधकामासाठी पडलेले दगड उचलून घेऊन जात होतेच. पूर्वी वसईला भक्कम दगडी वाडे आणि कोट दिसत. ते दगड किल्ल्यातून उचलून आणल्याच्या गोष्टी ऐकायला येत. आज हे दगड आणि वाडे दिसेनासे होऊन तेथे सिमेंट काँक्रिटची जंगले उभी राहिली आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/6251618817/" title="Vasai-fort-ruins by priya_v_p4, on Flickr"&gt;&lt;img alt="Vasai-fort-ruins" height="334" src="http://farm7.staticflickr.com/6037/6251618817_324961c2d7.jpg" width="500" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;किल्ल्याचे अवशेष किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा होत गेली. दिलेल्या चित्रात किल्ल्याचे भग्न अवशेष आणि वाढलेले रान दिसते. १५-२० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या बर्‍याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून, भिंती, बुरूज, तट यांची साफसफाई करून, जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून, पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे.&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/6001451784/" title="Vasai Fort 3 by priya_v_p4, on Flickr"&gt;&lt;img alt="Vasai Fort 3" height="375" src="http://farm7.staticflickr.com/6030/6001451784_5e9f2f1a22.jpg" width="500" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ:&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वसईची मोहीम – य. न. केळकर&lt;br /&gt;&lt;br /&gt;Notes on the history and antiquities of Chaul and Bassein – Joseph Gerson Cunha.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वसईचा इतिहास &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रे:&lt;br /&gt;&lt;br /&gt;नकाशा आणि इतर काही चित्रे विकिपिडीयावरून घेतली आहेत.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-3331831775375170289?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/3331831775375170289/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=3331831775375170289' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/3331831775375170289'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/3331831775375170289'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-7106626864153493253</id><published>2011-05-24T05:25:00.000-07:00</published><updated>2011-05-24T05:32:35.986-07:00</updated><title type='text'>सतीची प्रथा आणि अकबर</title><content type='html'>भारतातील सतीची जुलमी प्रथा बंद करण्याचे श्रेय लॉर्ड बेंटिंक आणि राजा राममोहन रॉय यांना दिले जाते परंतु त्याआधी हजारो वर्षे चालत आलेल्या या प्रथेला कोणाही कनवाळू माणसाने विरोध केला नाही हे पटणे थोडे कठीण वाटते. शिवाजी महाराजांनी जिजाऊंना सती जाण्यापासून रोखल्याचे, तसेच मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला, अहिल्येला सती जाण्यापासून रोखल्याचे वाचायला मिळते परंतु तसा कायदा करणे किंवा इतरांच्या स्त्रियांची या जुलमातून मुक्तता करण्याचे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर अकबराबद्दल जे वाचनात आले ते येथे देते.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;मध्यमवयाकडे झुकणार्‍या अकबराला सुफी पंथ, पारशी आणि जैन धर्मांविषयी गोडी लागली होती. हिंदू आणि ख्रिश्चन धर्माकडेही त्याचा ओढा वाढला होता. अनेक धर्मीयांशी होणार्‍या वादविवाद चर्चांतून त्याच्यात हळूहळू बदल होत गेले. त्यातील काही बदल म्हणजे त्याने मांसाहार सोडला. राज्यातील शिकारींवर निर्बंध आणले, जनावरांची कत्तल करण्यावर निर्बंध आणले. ते इतके की वर्षातील अर्धे दिवस पाळीव जनावरांची (गाई-बैल, म्हशी, घोडे इ.) कत्तल होत नसे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खालील गोष्ट घडली तेव्हा अकबराने चाळीशी पार केलेली होती. एके दिवशी अकबर आपल्या राणीवशात (बहुधा हिंदू राणीच्या) झोपला असता सकाळच्या प्रहरी बायकांची कुजबूज त्याच्या कानी पडली. त्याने उठून चौकशी केली असता कळले की राजा भगवानदासाच्या कुटुंबातील एक स्त्री सती जात आहे. अंबेरचे राजा भगवानदास हे मोठे प्रस्थ होते. त्याच्या बहिणीचा विवाह खुद्द अकबराशी झाला होता आणि त्याचा मुलगा मानसिंग अकबराचा प्रमुख सेनापती होता. त्यांच्या कुटुंबात सती जात आहे असे कळल्यावर राणीवशात चलबिचल होणे साहजिक होते. अधिक चौकशी करता अकबराला कळले की -&lt;br /&gt;जयमल नावाचा राजा भगवानदासाचा एक भाऊ होता. त्याची रवानगी बंगाल, बिहार, ओरिसाच्या क्षेत्रात लढाईसाठी झाली होती परंतु भर उन्हाळ्यात घोडेस्वारी करताना तो बिहारमध्ये उष्माघाताने आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याची बायको राव उदयसिंग या मारवाडच्या राजाची मुलगी होती. तिच्यावर सती जाण्यासाठी दडपण येत होते. सती जाण्यास तिची तयारी नव्हती परंतु घरच्यांनी तिला तिच्या संमतीशिवायही सती जाण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेतला होता. यात खुद्द तिच्या मुलाचा समावेश होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अकबराच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर तो तिरमिरीने उठला आणि तडक घोड्यावर बसून सतीच्या चितेपाशी पोहोचला. बादशहा असा तिरमिरीने निघाला ही खबर कळताच त्याचे अंगरक्षकही घाईघाईने त्याच्या मागोमाग गेले. सुदैवाने, अकबर वेळेत पोहोचला आणि बादशहा आणि त्याच्यामागे आलेले सैनिक पाहून सतीची मिरवणूक थांबली. जबरदस्तीने त्या बाईला सती जाण्यास भाग पाडणार्‍यांची डोकी उडवावी अशी इच्छा झाल्याचे अकबराने नंतर व्यक्त केले परंतु प्रत्यक्षात तसे केले नाही. मिरवणूकीतील सर्वांना अटक मात्र झाली आणि काही काळ बंदीवास दिल्यानंतर त्यांची सुटका झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या घटनेच्यावेळी राज्यात सती जाऊ नये असा पूर्वीच केलेला कायदा होता की या घटनेनंतर तसा कायदा करण्याचा निर्णय अकबराने घेतला ते नेमके कळत नाही परंतु सतीप्रथेवर बंदी आणण्याचा कडक कायदा करणे त्याला शक्य झाले नसावे. याचे कारण पदरी असणार्‍या प्रमुख राजपूत सरदारांना नाराज करणे त्याला शक्य नसावे. तरीही, 'केवळ त्या बाईची संमती असेल तरच ती सती जाऊ शकते परंतु तिच्या संमतीविना तिला सती जाण्यास प्रवृत्त करू नये आणि तसे करणार्‍यांवर कारवाई केली जाऊ शकते' असा कायदा त्याने केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अबु'ल फझलच्या म्हणण्याप्रमाणे अकबराच्या राज्यात कोतवालाची जबाबदारी ही "नागरक" या हिंदुग्रंथातील मौर्यकालीन कोतवालाप्रमाणेच होती. त्यात त्याने ज्या इतर कायद्यांची भर केली त्यात सतीविरोधी कायदाही होता. त्यानुसार, कोतवालाने गावात हेर नेमायचे आणि या हेरांनी गावात काय चालते त्याची इत्यंभूत माहिती परत आणायची. यात एखाद्या बाईला तिच्या संमतीविना सती दिले जात असल्यास ती कृती थांबवायचे आदेश होते. जर स्त्री स्वखुशीने सती जात असेल तर त्या घटनेत विलंब आणण्याचे आणि त्या स्त्रीचे मन वळवायचे आदेश होते. वेळ गेला की त्या स्त्रीचा दु:खावेग आवरून ती मृत्यूपासून परावृत्त होईल असा अंदाज त्यामागे होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अकबराचा कायदा किती सफल झाला याची कल्पना नाही पण त्याच्या पश्चात जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब यांनीही या कायदा तसाच ठेवला. किंबहुना, औरंगजेबाच्या राज्यात सती प्रथेवर पूर्णतः बंदी होती. इतर कायद्यांमध्ये अकबराने विधवांना पुर्नविवाह करण्याची संमती दिली होती आणि विवाहानंतर गर्भदानाचे वय किमान १२ असावे अशी सक्तीही केली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सतीच्या प्रथेविरोधी कायदा करणारी अकबर ही बहुधा पहिली व्यक्ती असावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;याच पार्श्वभूमीवर यापूर्वी १५६८मध्ये अकबराच्या स्वारीत चित्तौडला झालेला ३०० स्त्रियांच्या जौहाराची आठवण होणे साहजिक आहे. तो पाहून अकबराचे मन हेलावल्याचे संदर्भ पाहण्यास मिळत नाहीत. परंतु सम्राट अशोकाप्रमाणेचत्यावेळी अकबराला उपरती आणि साक्षात्कार झालेले नव्हते हे ही खरे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भः अकबर द ग्रेट मोगल - विन्सेंट स्मिथ.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-7106626864153493253?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/7106626864153493253/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=7106626864153493253' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/7106626864153493253'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/7106626864153493253'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2011/05/blog-post_24.html' title='सतीची प्रथा आणि अकबर'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-8757180642956513106</id><published>2011-05-02T06:20:00.000-07:00</published><updated>2011-05-02T06:27:25.224-07:00</updated><title type='text'>अंश ईश्वराचा</title><content type='html'>मानव रानटी अवस्थेत असतानाही त्याला एक गोष्ट नेमकी आणि लवकरच कळून आली असावी ती म्हणजे एक एकटे राहण्यापेक्षा टोळी बनवून राहणे फायद्याचे आहे. ही गोष्ट त्याला रानटी अवस्थेत असताना कळली की कपिवस्थेत याबद्दल विशेष माहिती नाही पण त्याचे नेमके फायदे तोटे मनुष्यावस्थेत कळले असे मानू. आपला गट निर्माण केला की एकत्रितरीत्या शत्रूवर चाल करून जाणे सोपे पडते, स्वतःचे आणि आप्तजनांचे रक्षण करता येते, शिकार करणे सोपे जाते या गोष्टी त्याच्या ध्यानात आल्या असाव्या. टोळी जसजशी मोठी होत गेली तसतसे टोळीत अंतर्गत कटकटीही निर्माण झाल्या असाव्यात आणि मग त्या टोळीला शिस्त लावण्यासाठी, तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोळीतील शक्तीने आणि बुद्धिमत्तेने श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीकडे त्या टोळीचे नेतृत्व आले असावे. नगरे स्थापन झाल्यावर आणि टोळ्यांची व्याप्ती वाढल्यावर याच टोळीप्रमुखाचा राजा झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;&lt;br /&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;br /&gt;&lt;tbody&gt;&lt;br /&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;img height="350" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/49/Denderah3_Cleopatra_Cesarion.jpg" width="250" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;br /&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td class="caption"&gt;आयसीसच्या रूपातील क्लिओपात्रा&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;टोळीची किंवा राज्याची व्यवस्था राखतानाच राजाला स्वतःच्या भवितव्याचा विचार करणे, आपले पद राखून ठेवणे आणि स्वतःला सुरक्षित ठेवणेही आवश्यक होते. या कामी केवळ शक्तीचा उपयोग नव्हता तर युक्तीचा उपयोगही करणे आवश्यक होते. राजाच्या मागे उभे राहणारे बळकट वीर, सेनापती, अमात्य, मंत्री, इतर हुशार सल्लागार आणि सामान्य प्रजाजन या सर्वांत एकी राखण्यास आवश्यक असणारा गुण म्हणजे राजनिष्ठा. एखाद्या व्यक्तीविषयी अपार निष्ठा बाळगण्यासाठी त्या व्यक्तीला एकतर कर्तृत्वाने अतिशय मोठे होण्याची गरज असते किंवा जन्माने/ पदाने अत्युच्च असण्याची गरज असते. या दोहोंमुळे ही व्यक्ती पूजनीय ठरत असे, लोकांच्या निष्ठा राजाकडे अबाधित राहत आणि त्यायोगे राज्य आणि राजा सुरक्षित राहत असे. कर्तृत्वाने नेमके किती मोठे व्हायला हवे याच्या सीमा आखलेल्या नसल्याने आणि प्रत्येक व्यक्तीच्या कर्तृत्वाला मर्यादा असल्याने स्वतःला सुरक्षित ठेवण्यास केवळ कर्तृत्वाचा उपयोग नाही; त्यापेक्षा भव्य काहीतरी उभे करायला हवे ही जाणीवही राज्यपद उपभोगणाऱ्यांना झाली असावी. हे जे काही भव्यदिव्य आहे ते मानवी हस्तक्षेपा पलीकडले असणे किंवा अमानवी असणे किंबहुना ते तसे दाखवणे पथ्यावर पडले. याचे कारण विज्ञानाचा अभाव, नैसर्गिक आपत्ती किंवा न उमजणाऱ्या गोष्टींना सर्वसामान्य जनतेने ईश्वरी संकेत मानणे. या गोष्टी आपल्या हातात नाहीत किंवा या गोष्टींना आपण रोखू शकत नाही, या आपल्या मानवी शक्तीच्या पल्याड आहेत या भावनेतून ईश्वराबद्दल दरारा निर्माण झाला आणि याच भावनेतून जन्माने मोठे होणे -उच्च असणे या संकल्पनेची निर्मिती झाली. राजा हा साक्षात ईश्वराचा अंश आहे किंवा साक्षात ईश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी आहे असे दर्शवून देणे हे राज्यव्यवस्था आणि पद सुरक्षित ठेवण्यास कारणीभूत ठरते याची जाणीवही माणसाला झाली. निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी या युक्तीचा वापर हमखास होऊ लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जगातील बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये अशाप्रकारे राजाला किंवा टोळीप्रमुखाला ईश्वरी अंश, देवाचा पुत्र किंवा साक्षात भगवंत मानण्याची प्रथा आहे. आपल्या महाकाव्यांचा विचार करता त्यातील कोणतेही महापुरुष मानवी नाहीत असे दिसून येईल. कथेतील मुख्य पात्रांचे चमत्कारिक जन्म, पुनर्जन्म, अवतार वगैरे गोष्टी सदर पात्रे सामान्य मनुष्यापेक्षा वेगळी आणि वरचढ होती हे दाखवण्यासाठी केलेला आढळतो. महाभारतातील जवळपास सर्व पात्रांचे जन्म चमत्कारिक आहेत. या पात्रांना दैवी गुण चिकटवलेले आहेत. याचप्रमाणे, इलियडचा विचार केला तरीही अशाचप्रकारचे संदर्भ आढळतात. इतरत्र इतिहासात डोकावले तर इजिप्तमध्ये राजाला देव मानण्याची प्रथा आढळते. राजा (फॅरो) हा होरस हा देवाचा पुनर्जन्म मानला जाई. इजिप्तची प्रसिद्ध फॅरो क्लिओपात्राने स्वतःला इजिप्शिअन देवता आयसीस म्हणून घोषित केले होते. तिच्या आयसीसच्या रूपातील प्रतिकृती आढळतात. चीनमध्ये राजा हा स्वर्गपुत्र असल्याचे मानले जाई, रोमन संस्कृतीत राजाला देव मानण्याची प्रथा होती, इंका संस्कृतीही राजाला देव मानत असे आणि अशा अनेक संस्कृतीत राजाला अमानवी गुणांचा धनी बनवल्याचे दिसून येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अलेक्झांडर द ग्रेट हा झ्यूसचा पुत्र आहे हे स्वतः त्याची आई सांगत असे आणि तो पद्धतशीर प्रचार होता. पुढे सिवाच्या चेटक्याने अलेक्झांडर हा अमुनचा मुलगा असल्याचे म्हटले पण ग्रीकांनी तो झ्यूसचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले अशी अलेक्झांडरच्या गोटातून बतावणी केली गेली. रोमन सम्राट ऑगस्टसला देव म्हणून घोषित करण्यात आले होते. गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला पोटी अद्वितीय पुत्र जन्म घेतो आहे असे स्वप्न पडल्याचे सांगितले जाते. अशोकाच्या शिलालेखात देवांना प्रिय या विशेषणाचा सातत्याने वापर केलेला दिसतो. हुमायूनलाही स्वप्नातून आपल्याला अद्वितीय पुत्र होणार आहे हे कळून चुकले होते. अकबरावर सलीम चिश्तीची कृपादृष्टी असल्याच्या आणि शिवाजीराजांनाही भवानीचा दृष्टांत झाल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.रामदासांनी राजांबद्दल लिहिलेल्या या ओळी बोलक्या आहेत -&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;जे सत्किर्तीचे पुरुष। ते ईश्वराचे अंश।&lt;br /&gt;धर्मस्थापनेचा हव्यास। तेथेची वसे।।&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;या आणि अशा अनेक उदाहरणांवरून राजा हा अतिमानवी शक्तींशी जवळीक साधणारा आहे हे सांगण्याचा प्रयत्न दिसतो. राजाला देवाचा अंश मानणे यापेक्षा थोडी पुढची पायरी देवराजा ही प्रथा. कंबोडियातील ख्मेर राजघराण्यात ही प्रथा दिसते. या प्रथेत राजा ही शिवस्वरूप असून सर्वश्रेष्ठ आहे असे मानले जाई. यालाच मनुष्याचे दैवतीकरण करणे असे म्हणता येईल. चंद्रशेखर यांच्या लेखात जयवर्मन राजाचा मृत्यूनंतर अवलोकेतेश्वराच्या रूपात दैवतीकरण झाल्याचा उल्लेख आहे. ही प्रथा केवळ कंबोडियातच नाही तर इतरत्रही आढळते. मानवी आयुष्यात किंवा मानवी मृत्यूनंतर त्याला देवाच्या जागी बसवणे हे भारतीय संस्कृतीला नवे नाही. व्यक्तिपूजा, अवतार, महात्मा वगैरे अनेक शब्द मनुष्याला अतिमानवी शक्तीच्या जवळ घेऊन जातात आणि जसे हे भारतीय संस्कृतीला नवे नाही तसे जगातील इतर संस्कृतींनाही हे "दैवतीकरण" नवे नाही. दैवतीकरणाची ही पद्धत वर्षानुवर्षे सुरू आहे आणि आता राजे गेले तरी नेत्यांच्या रूपात ही पद्धत सुरू राहिल किंबहुना महात्म्यांच्या उपाधीतून सुरू असल्याचेच जाणवते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;br /&gt;&lt;tbody&gt;&lt;br /&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;img height="250" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/47/Apotheosis_Homer_BM_2191.jpg" width="325" align="right" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;br /&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td class="caption"&gt;होमरचे दैवतीकरण&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशाचप्रकारच्या दैवतीकरणाचा उल्लेख डॅन ब्राऊनच्या लॉस्ट सिंबलमध्ये अनेकांनी वाचला असेल. जॉर्ज वॉशिंग्टनच्या मृत्यूपश्चात त्याचे दैवतीकरण यू. एस. कॅपिटल बिल्डिंगच्या रोटुंडाच्या छतावर दिसते. याला ऍपॉथिओसिस ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन (apotheosis of George Washington) म्हणून ओळखले जाते. दैवतीकरणाची ही पद्धत अर्थातच ग्रीक किंवा रोमनांची. टायटसच्या प्रसिद्ध कमानीच्या छतावर (The Arch of Titus, बांधकामः सुमारे इ. स. ८१) सम्राट टायटसचे दैवतीकरण दिसते. इलियड आणि ओडिसीचा निर्माता महाकवी होमर याच्या दैवतीकरणाचे प्राचीन शिल्पही उपलब्ध आहे. कॉन्स्टंटिनो ब्रुमिडी या इटालियन चित्रकाराने १८६५ मध्ये यू. एस. कॅपिटल बिल्डिंगच्या छतावर ही चित्रकारी केली. सन १८६२ मध्ये हे चित्र काढण्याची परवानगी मिळाल्याचे कळते. ही परवानगी यू. एस. कॅपिटॉल बिल्डिंगचा प्रमुख स्थापत्यशास्त्रज्ञ थॉमस वॉल्टरकडून ब्रुमिडीला मिळाल्याचे कळते. याआधी १८६०मध्येही एका जर्मन चित्रकाराने वॉशिंग्टनच्या दैवतीकरणाचे पेंटिंग तयार केले होते. या चित्राचा पगडा कॅपिटॉल बिल्डिंगीतील चित्रावर असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो. जॉर्ज वॉशिंग्टनला अमेरिकेच्या राष्ट्रपित्याचा दर्जा या आधी अनेक वर्षे मिळालेला होता. त्याची लोकप्रियता मृत्यूनंतरही वाढत गेली. याचा फायदा घेण्यासाठी हे चित्र तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. ब्रुमिडीला महिना दोन हजार डॉलर्सच्या तनख्यावर हे चित्र काढण्याची परवानगी मिळाली. तयार झालेले चित्र अनेकांच्या पसंतीस पडले हे वेगळे सांगायला नको. आधुनिकतेचा मानदंड हाती घेऊन वावरणाऱ्या अमेरिकेचा पहिला देव जॉर्ज वॉशिंग्टन मानला जावा ही इच्छा प्रकट करण्यात हे चित्र सफल झाल्याचे दिसते.&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;br /&gt;जॉर्ज वॉशिंग्टनचे दैवतीकरण&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;a title="DSC02325 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/5422437333/"&gt;&lt;img height="550" alt="DSC02325" src="http://farm6.static.flickr.com/5016/5422437333_a4ecf8e811.jpg" width="700" align="center" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वॉशिंग्टनच्या दैवतीकरणाच्या या एका चित्रात एकूण सात दृश्ये आहेत. मध्यभागी १३ कुमारिकांसह जॉर्ज वॉशिंग्टन स्वर्गारोहणासाठी तयार झालेला दिसतो. १३ कुमारिका अमेरिकेच्या तत्कालीन १३ वसाहती दाखवतात. वॉशिंग्टनच्या डोक्यावर E Pluribus Unum (विविधतेत एकता) हे अमेरिकेचे घोषवाक्य दिसते. वॉशिंग्टनच्या चित्रासभोवताली इतर ६ चित्रे दिसतात आणि ही सर्व चित्रे प्रगतिशील अमेरिकेत होणारे दैवतीकरण दर्शवतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युद्ध -&lt;/strong&gt; केंद्रभागातील वॉशिंग्टनच्या पायथ्याशी दिसणाऱ्या या चित्रात अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता कोलंबिया शत्रूचा नि:पात करताना दिसते. तिच्यासह अमेरिकेचा राष्ट्रपक्षी गरूडही दिसतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;विज्ञान &lt;/strong&gt;- मिनर्वा ही बुद्धी आणि कलेची रोमन देवता. ती या चित्रात अमेरिकेचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलीन, रॉबर्ट फुल्टॉन आणि सॅम्युएल मोर्स यांना बहुधा विद्युतजनित्राबाबत महत्त्वाचे सल्ले देत आहे. मिनर्वा हे ग्रीक देवता अथीनाचे रूप. वॉशिंग्टन डिसीच्या शहरात इतत्रही ती अनेकदा दिसून येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;नौधन(सागरी)- &lt;/strong&gt;समुद्राचा रोमन सम्राट नेपच्यून या चित्रात दिसतो. तसेच समुद्रातून प्रकट झालेली प्रेमाची रोमन देवता वीनसच्या हाती 'ट्रान्सअँटलांटीक टेलेग्राफ केबल' दिसते. या केबलद्वारे अमेरिका आणि युरोपचा संपर्क साधण्याचे प्रयत्न १८५७ ला सुरू झाले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;वाणिज्य - &lt;/strong&gt;मर्क्यूरी हा रोमन व्यापाराचा आणि अर्थकारणाचा देव येथे रॉबर्ट मॉरिस या अमेरिकन व्यापारी आणि राजकारण्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मदतीसाठी सोन्याने भरलेली पुरचुंडी देताना दिसतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;यांत्रिकी - &lt;/strong&gt;या चित्रात वल्कन हा लोहारांचा रोमन देव स्टीमबोट आणि तोफांच्या बांधणीवर काम करताना दिसतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;शेतकी -&lt;/strong&gt; सेरेस ही रोमन पीक पाण्याची देवता सायरस मॅकॉर्मिक या प्रसिद्ध अमेरिकन शेतकऱ्याने तयार केलेल्या पीक कापणी यंत्रावर आरूढ दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्राविषयी याहून अधिक माहिती आंतरजालावर शोधल्यास सहज उपलब्ध आहे. ज्यांना फ्रीमेसनरीच्या कॉन्स्पिरसी थिअरीत रुची आहे त्यांच्यासाठी थॉमस वॉल्टर, १८६५ मधील अमेरिकन अध्यक्ष अँड्र्यू जॉनसन हे दोघे फ्रीमेसन्स होते. तत्पूर्वीचे अब्राहम लिंकन हे फ्रीमेसन नसले तरी सदस्यत्वासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता पण त्यांच्या मृत्यूमुळे ते फ्रीमेसन बनले नाहीत असे कळते. चित्रात दिसणारे बेंजामिन फ्रँकलिन हे फ्रीमेसन होते आणि अर्थातच जॉर्ज वॉशिंग्टन हे स्वतःही फ्रीमेसन होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अधिक माहिती:&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;a href="http://www.aoc.gov/cc/art/rotunda/apotheosis/index.cfm"&gt;वॉशिंग्टनचे दैवतीकरण&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्लिओपात्राचे आणि होमरचे चित्र विकिपिडीयावरून घेतले आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-8757180642956513106?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/8757180642956513106/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=8757180642956513106' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/8757180642956513106'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/8757180642956513106'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='अंश ईश्वराचा'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://farm6.static.flickr.com/5016/5422437333_a4ecf8e811_t.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-7823867911897131038</id><published>2011-01-04T08:20:00.000-08:00</published><updated>2011-01-04T08:29:00.292-08:00</updated><title type='text'>अलेक्झांडर आणि पुरु युद्ध</title><content type='html'>इतिहासकार हा स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या घटनांच्या नोंदी करत असतो किंवा इतरांनी लिहिलेल्या नोंदी वापरून इतिहास लिहून ठेवत असतो. हा इतिहास नमूद करताना तो नि:पक्षपाती असतो का या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थी यावे. महाभारतातील कौटुंबिक कलहाला जय नावाचा इतिहास समजले तरी तेथेही व्यासांनी पदोपदी जेत्या पक्षाला वरचढ स्थान दिलेले आहे. पुढे जनमेजयाच्या समोर वैशंपायनांनी कथा सांगितल्याने राजाला संतोष देण्यासाठी त्यात बरेच फेरफार केले असावेत अशी शंका अनेक तज्ज्ञांना येतेच. महाभारत युद्धाप्रमाणेच भारतीय भूमीवर जी पौराणिक-ऐतिहासिक महत्त्वाची युद्धे लढली गेली त्यात दाशराज्ञ युद्ध, मगध-कलिंगचे युद्ध, पानिपतावरील युद्धे अशा अनेक युद्धांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक युद्ध अलेक्झांडर आणि पुरु यांच्यात लढले गेले. या युद्धामुळे अलेक्झांडरच्या ज्ञात जग जिंकत पुढे सरकण्याच्या इच्छेला खीळ बसली. भारताची भूमी ग्रीकांच्या आक्रमणापासून वाचली. या युद्धात नेमके काय झाले हे जाणून घेण्याची इच्छा मला अनेक दिवस होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अलेक्झांडरच्या लहान आयुष्यातही इतका विस्तृत इतिहास भरलेला आहे की तो लिहित लिहित भारतापर्यंत पोहोचेस्तोवर अनेक लेखकांचा उत्साह गळून जातो असे वाटते. सोईस्कर रित्या याला पाश्चात्यांचा भारतीय दुस्वास असेही म्हणता येईल. &lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img height="500" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/d/d2/Alexander_victory_coin_Babylon_silver_c_322_BCE.jpg" width="250" align="right" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;&lt;sup&gt;या चित्रात अलेक्झांडर पुरुवर स्वारी करताना दिसतो तर दुसर्‍या चित्रात विजयाची देवता नाइके अलेक्झांडरचा गौरव करताना दिसते. या दोन्ही नाण्यांवर कोणतीही अधिक माहिती किंवा लेखन नाही. यावरून हे नाणे अलेक्झांडरने पाडले की त्याच्या क्षत्रपाने याबद्दल साशंकता आहे.&lt;/sup&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;कारण काहीही असो, ज्या अनेक लेखकांचे संदर्भ मी वाचले ते अक्षरशः दोन ते तीन पानांत अलेक्झांडरची भारतीय स्वारी पूर्ण करतात. मागे ऑलिवर स्टोन निर्मित अलेक्झांडर या चित्रपटातही हे असेच झाल्याचे लक्षात आले. तसाही हा चित्रपट इतिहासापेक्षा अलेक्झांडरच्या लैंगिकतेमुळे अधिक गाजला असला तरी चित्रपटात युद्धांचे चित्रण अतिशय सुरेख आहे. भारतीय युद्धाच्या चित्रणातही विशेषतः अलेक्झांडर पुरुच्या हत्तीवर स्वतः चाल करून जातो तो प्रसंग चित्तवेधक आहे. परंतु ऐतिहासिक दृष्ट्या त्यात अनेक त्रुटी आहेत. या प्रसंगात अलेक्झांडर हा कुशल सेनापती असला आणि सैन्याचे नेतृत्व करत असला तरी त्याने पुरुच्या हत्तीवर चाल करून जाण्याचे धाडस दाखवले असेल का असा प्रश्न मनात आला होता. कालांतराने मला ब्रिटिश म्युझियममधील अलेक्झांडरचे नाणे दिसले आणि त्यावर चित्रित हा प्रसंगही दिसला. तरीही विश्वास ठेवण्यास काहीतरी कमी पडते आहे असे वाटले म्हणून अलेक्झांडरचा सर्वात विश्वासार्ह इतिहास, एरियनचा "ऍनाबेसिस ऑफ अलेक्झांडर" चाळला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लढाईकडे वळण्यापूर्वी एरियन आणि त्याच्या ग्रंथा विषयी थोडे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;एरियन&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;एरियनचा जन्म सन ८६ ते १६० दरम्यानचा. म्हणजेच अलेक्झांडर नंतर सुमारे चारशे-साडेचारशे वर्षांनंतरचा. अलेक्झांडरच्या कर्तृत्वामुळे प्रेरित होऊन त्याने स्वारीचा वृत्तांत लिहिला तरी त्यात राजाची स्तुती करणे असा हेतू दिसत नाही. अनेक संदर्भ वापरून, आपली टिप्पणी देऊन तो इतिहास समोर आणतो. त्याच्या लेखनात व्यक्तीपूजा (हिरो-वरशिप) केलेली दिसत नाही आणि तरीही अलेक्झांडरला "द ग्रेट" बनवण्यात या इसमाचा मोठा हात असल्याचे मानले जाते . अलेक्झांडरच्या काळात न जन्मता, प्रत्यक्ष इतिहासाचा साक्षीदार नसतानाही त्याने लिहिलेला इतिहास हा अलेक्झांडरविषयीचा सर्वात मोठा विश्वासार्ह स्रोत मानला जातो. हा इतिहास लिहिण्यासाठी एरियनने जे संदर्भ चाळले त्यात टोलेमीने लिहिलेला अलेक्झांडरच्या स्वारीचा वृत्तांत, ऍरिस्टोब्युलसने लिहिलेला इतिहास हे दोन अतिशय महत्त्वाचे संदर्भ आणि याशिवाय कॅलिस्थेनिसने लिहिलेला इतिहास, नीअर्कसचा इतिहास आणि अशा अनेक संदर्भांचा समावेश आहे. मेगॅस्थेनिसने लिहिलेला इंडिका हा ग्रंथ, फिलिपच्या मंत्र्याकडील नोंदी आणि अलेक्झांडरच्या पत्रांचा तो संदर्भ म्हणून वापर करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;टोलेमीच्या संदर्भांवर त्याचा सर्वात अधिक विश्वास आणि याचे कारण देताना एरियन म्हणतो की टोलेमी हा लहानपणापासून अलेक्झांडर सोबत वाढलेला, त्याच्या सोबत राहिलेला, स्वारीवर गेलेला आणि याहूनही महत्त्वाचे असे की टोलेमी पुढे स्वतः सम्राट झाला. अशा परिस्थितीत त्याने काही खोटे लिहून ठेवणे म्हणजे स्वतःच्या नावाला बट्टा लावून घेण्यासारखे आहे. टोलेमीने अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इतिहास लिहिला. तो लिहिण्याची त्याच्यावर जबरदस्ती नव्हती किंवा जे घडले त्यापेक्षा वेगळे लिहून त्याला त्यातून काही बक्षीस किंवा उत्पन्न मिळणार नव्हते. अशाच कारणांसाठी ऍरिस्टोब्युलसही एरियनला विश्वासार्ह वाटतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थातच, एरियनच्या अभ्यासातील त्रुटी दाखवणारे निबंध आहेत परंतु अलेक्झांडरच्या इतिहासाचा सबळ स्रोत म्हणून आजही एरियनकडेच पाहावे लागते. त्याचे लेखन आज इतक्या कालावधीनंतर शाबूत असणे ही सर्वात महत्त्वाची बाब.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसर्‍या भागात युद्धाचे त्रोटक वर्णन केले आहे. या युद्धातील एरियनने दिलेले मनुष्यबळ किंवा मनुष्यहानी यांच्या आकड्यांविषयी अनेकांना शंका वाटते. किंबहुना, एरियनला स्वतःलाही शंका वाटते म्हणून तो टोलेमीवर विश्वास प्रकट करतो. मीही केवळ एरियनचे संदर्भ वाचून आकडे दिले आहेत. ते योग्य आहेत असा दावा नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;hr /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;u&gt;काही संदर्भः&lt;br /&gt;&lt;/u&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;टोलेमी &lt;/strong&gt;- हा अलेक्झांडरचा लहानपणीपासूनचा मित्र. टोलेमी हा अलेक्झांडरचा अनौरस सावत्र भाऊ असावा असा अंदाज बांधला जातो. अलेक्झांडरच्या सर्व स्वार्‍यांत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याचे जे ४ मोठे भाग झाले त्यात टोलेमीने इजिप्तचे राज्य हस्तंगत केले. टोलेमीने अलेक्झांडरच्या स्वार्‍यांचा विस्तृत इतिहास लिहून ठेवला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;ऍरिस्टोब्युलस&lt;/strong&gt; - अलेक्झांडरचा मित्र आणि विश्वासू. सैन्यात स्थापत्यशास्त्री किंवा अभियंता असे त्याचे पद होते. त्याने अलेक्झांडरला अनेक स्वार्‍यांत सोबत केली आणि इतिहासही लिहून ठेवला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;नीअर्कस&lt;/strong&gt; - अलेक्झांडरचा सेनापती. भारतीय युद्धात त्याचा समावेश होता. भारताबद्दल त्याने लिहून ठेवलेल्या नोंदींचा एरियनने आपल्या इंडिका या ग्रंथात उपयोग केला.&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;br /&gt;मेगॅस्थेनिस &lt;/strong&gt;- चंद्रगुप्ताच्या दरबारातील सेल्युकस निकेटरचा राजदूत. त्यानेही भारतावर इंडिका हा ग्रंथ लिहिला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;कॅलिस्थेनिस&lt;/strong&gt; - हा ऍरिस्टॉटलचा नातू. त्याने अलेक्झांडरवर लिहिलेला इतिहास हा इतिहास कमी आणि भाटगिरी अधिक प्रकारचा आहे. मात्र अलेक्झांडरने पर्शियन रीतीरिवाजांचा स्वीकार केल्यावर कॅलिस्थेनिसची भाषा बदलते. बहुधा यावरूनच त्याचे आणि अलेक्झांडरचे संबंध बिघडले आणि त्याला राज्यद्रोहाच्या आरोपांखाली तुरुंगात टाकण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑलिवर स्टोनच्या चित्रपटात वर्णन केलेला प्रसंग असा दिसतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img alt="" src="http://allmovietrivia.info/wp-content/uploads/alexander-movie-still-7.jpg" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्र क्र. १ विकीपिडीयावरून घेतलेले असून चित्र क्र. २ allmovietrivia.info येथून घेतले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;भारतीय स्वारीचा वृत्तांत&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;एरियनच्या मते सिंधू नदी ही भारतातील महत्त्वाची नदी होय. त्याला गंगा नदीचीही माहिती आहे परंतु भारतात प्रवेश करतेवेळी सिंधू ही विस्तृत नदी लागत असल्याने किंवा अलेक्झांडर गंगेपर्यंत न पोहोचल्याने सिंधू नदीच त्याला महत्त्वाची वाटणे साहजिक आहे. सिंधू नदी ही नाइल आणि युफ्रेटिसपेक्षाही अधिक गाळ-माती वाहून नेते, तिला चांगला वेग आहे असे एरियन म्हणतो. सिंधू नदीचा वेग आणि खोली पाहता ग्रीक सैन्याने इतक्या कमी वेळात कायमस्वरुपी पूल बांधला नसावा असे त्याला वाटते. तसे ठोस संदर्भ त्याला मिळत नाहीत म्हणून तो म्हणतो की होड्यांना होड्या जोडून, बहुधा त्या रश्शींनी एकत्र बांधून त्यावरून सैन्य नदी ओलांडून गेले असावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सिंधू नदी ओलांडून अलेक्झांडर तक्षशीलेला पोहोचल्यावर तेथे त्याचे मानाने स्वागत झाले. आजूबाजूच्या प्रदेशातील अनेक राजांनी कोणतीही खळखळ न करता शरणागती पत्करली. त्यात अभिसार हा झेलमच्या पलीकडल्या डोंगरी प्रदेशातील राजा आणि त्याचा भाऊ यांची गणती होते. &lt;span style="color:#cccccc;"&gt;(अभिसार हा कश्मीर प्रांतातील राजा असावा. ) &lt;/span&gt;दक्षराज नावाचा राजाही अलेक्झांडरला सामील झाल्याचे दिसते. इथे तक्षशीलेचा पाहुणचार स्वीकारून, ग्रीक प्रथेप्रमाणे खेळांचे आयोजन करून आणि जनावरांचे बळी देऊन पूजा करून अलेक्झांडर झेलमच्या दिशेने पुढे निघाला. हे करताना त्याने शरणागत तक्षशीलेत आपला प्रांताधिकारी (व्हॉइसरॉय) नेमला आणि जखमी सैनिकांना सुश्रूषेसाठी मागे ठेवले. एव्हाना सुमारे पाच हजारी भारतीय सेना त्याला सामील झाली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अलेक्झांडरच्या आगमनाची खबर लागल्याने झेलमच्या पैलतिरावर पुरुची सेना जमली होती. अलेक्झांडरला झेलम ओलांडू न देता, किंबहुना, तो त्या प्रयत्नांत असताना त्यावर हल्ला करायचा अशी पुरुची रणनीती होती. अलेक्झांडरने झेलम किनारी आपला तळ ठोकला. पैलतिरावर पुरुची प्रचंड सेना आणि हत्ती उभे ठाकलेले दिसत होते. पुरुने जेथून जेथून नदी पार करणे सहज शक्य आहे तेथे तेथे आपले तळ ठोकले होते. अलेक्झांडरच्या हे लक्षात आल्यावर त्याने सैन्याच्या लहान फळ्या करून सर्व बाजूने पसरण्याचा आदेश दिला. असे केल्याने पुरू चकीत होईल आणि आपली निश्चित निती पुरुला कळून येणार नाही असे त्याला वाटले पण पुरू सावध होता. अलेक्झांडरने सिंधू नदीत पुलासाठी वापरलेल्या आपल्या होड्या झेलमपाशी मागवल्या. हे करताना त्याने त्यातील मोठ्या होड्या कापून त्यांच्या लहान होड्या बनवाव्यात अशी सूचना दिली. ती अंमलात आणून मोठ्या होड्यांचे दोन किंवा तीन तुकडे करण्यात आले.&lt;img height="250" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/1/16/Battle_hydaspes_crossing.gif" width="300" align="left" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;समोरासमोरून झेलममध्ये घोडे टाकून नदी पार करणे अलेक्झांडरला शक्य नव्हतेच. एकतर पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी दुथडी भरून वाहत होती आणि पुरुचे हत्ती समोर तयार होते. घोडे पाण्यात शिरल्यावर या हत्तींनी त्यांच्यावर चाल केली असती आणि ग्रीक सैन्याची तेथेच धूळधाण उडाली असती हे अलेक्झांडर जाणून होता. त्याने आपण पावसाळा संपून थंडी सुरू झाल्यावरच हालचाल करू अशी अफवा पसरवली परंतु या अफवेचा पुरुच्या सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही. नंतर अलेक्झांडरने वेगळी निती अवलंबली. ती म्हणजे, रात्रीच्या पोटात त्याने आपले थोडे घोडदळ नदीच्या वेगवेगळ्याठिकाणी पसरवणे पण मोठमोठ्याने प्रचंड आवाज आणि गाजावाजा करणे सुरू केले. असे केल्याने पुरुला वाटावे की अलेक्झांडर स्वारीला सज्ज झाला आहे आणि त्याचे सर्व घोडदळ नदी ओलांडायच्या प्रयत्नात आहे म्हणून त्यानेही आपले सैन्य त्या दिशेने पाठवावे आणि त्यामुळे अलेक्झांडरला मूळ ठिकाणी नदी पार करता यावी. परंतु पुरुला हा कावा कळून आल्याने ही नितीही फसली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लवकरच अलेक्झांडरला सुगावा लागला की त्याच्या सैन्यतळापासून सुमारे १७ मैलांवर झेलम नदीत एक बेट आहे. तिथे नदी थोडी उथळ होते आणि बेटाच्या आडोशाने नदी ओलांडणे सोपे आहे. पुरुच्या नजरेसमोरून सैन्य हलवणे सोपे नव्हते. अलेक्झांडरने हळूहळू त्याचे अंगरक्षक, काही सेनापती आणि काही चिवट सैनिकांची फळी बाजूला काढली आणि मागे नेली. क्रेटेरस या आपल्या सेनापतीच्या आधिपत्याखाली मुख्य सैन्य ठेवून त्याने स्वतः लहान फळीचे नेतृत्व केले. किनाऱ्यापासून बरेच अंतर ठेवून ही फळी पुढे सरकू लागली. सिंधू नदीतून आणलेल्या ३० वल्ह्यांच्या होड्यांचे तीन तुकडे करण्यात आले होते. हे तुकडेही या फळीसोबत पाठवण्यात आले. झेलम काठच्या दाट झाडीचा उपयोग त्यांना आडोशासाठी झाला. झेलमच्या त्या बेटामागे ईप्सित स्थळी पोहोचण्याच्या आदल्या रात्री विजांचा चकचकाट आणि गडगडाट होऊन वादळी पाऊस झाला. या पावसामुळे पुरुचे सैन्य गाफील राहिले आणि अलेक्झांडरच्या सैन्याला सुखरूप वाटचाल करण्यास जागा मिळाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बेटापलीकडून सैन्य जेव्हा नदीत उतरले तेव्हा नदी उथळ असूनही झालेल्या पावसाने भरून वाहत होती. छातीपर्यंत येणाऱ्या पाण्यातून वाट काढत सैन्याने आगेकूच केली. हे करताना बेटालाच दुसरा किनारा समजून सैन्य बेटावर जमा झाले पण लवकरच चूक कळल्याने त्यांनी पुन्हा किनाऱ्याकडे वाटचाल सुरू ठेवली. या सैन्यात पर्डिकस, कोएनस आणि सेल्युकसचा समावेश होता. पुरुला ही बातमी कळताच त्याने आपल्या मुलाला सैन्यानिशी अलेक्झांडरचा सामना करण्यास पाठवले. येथील युद्धात नेमके काय झाले याबाबत एरियन साशंक दिसतो परंतु टोलेमीच्या संदर्भांवर तो अधिक विश्वास ठेवतो. टोलेमीच्या संदर्भाप्रमाणे १२० रथ आणि दोन हजारांचे घोडदळ घेऊन पुरुपुत्र अलेक्झांडरचा पाडाव करण्यास रवाना झाला. परंतु अतिवृष्टीमुळे चिखल झाला होता त्यात रथ रुतले आणि गोंधळ झाला. येथे पुरुला अलेक्झांडर स्वतः नदी पार करण्याचे वेडे साहस करेल अशी कल्पना नव्हती. अशा गदारोळात पुरुच्या मुलाचा पराभव झाला. &lt;img height="250" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/5e/Battle_hydaspes_combined_at.gif" width="300" align="right" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुरुपुत्राला अलेक्झांडरच्या सैन्याने कापून काढले आणि पुरुच्या मुख्य तळाकडे मोर्चा वळवला. याचवेळी क्रेटेरसही नदीत उतरू लागला. पुत्राच्या मृत्यूची बातमी आणि दोन्ही बाजूंनी सरकणारे अलेक्झांडरचे सैन्य पाहून नेमकी कोणती युद्धनिती वापरावी हे पुरुला कळेना. शेवटी त्याने अलेक्झांडरच्या रोखाने सैन्य वळवण्याचे आदेश दिले. वळवलेल्या सैन्यात ३०, ००० चे पायदळ, ४००० चे घोडदळ, सुमारे ३०० रथ आणि २०० हत्ती होते. बाकीची सेना त्याने क्रेटेरसशी सामना करण्यासाठी ठेवली. जेथे चिखल झालेला नाही अशा ठिकाणी थांबून त्याने व्यूहरचना केली. या रचनेत हत्ती सर्वांत पुढे होते. या हत्तींना घाबरून शत्रूचे घोडदळ किंवा पायदळ पुढे सरकणार नाही असा पुरुचा अंदाज होता. हत्तींच्या मागे पायदळ होते. पायदळाला कोट करण्यासाठी बाजूने घोडदळ उभे केलेले होते. त्याच्या बाजूने रथ उभे होते. अलेक्झांडरचे घोडदळ पुरुपेक्षा मोठे होते परंतु हत्तींवर हल्ला करणे अशक्य होते त्यामुळे अलेक्झांडरने स्वतःच्या नेतृत्वाखाली उजवीकडून आणि कोएनसने डावीकडून हल्ला चढवला. तसेच ग्रीक तिरंदाजांनी हत्तीच्या माहुतांचा वेध घेण्यास सुरुवात केली. पलीकडून क्रेटेरसनेही पुढे सरकण्यास प्रारंभ केला. अनेक दिशांनी झालेल्या हल्ल्यांमुळे पुरुचे सैन्य अडचणीत सापडले. हत्ती बिथरून मागे फिरले आणि पुरूच्या सैन्याला चिरडून जाऊ लागले. ग्रीक सैन्याने यानंतर चोहोबाजूंनी हल्ला चढवला. या युद्धात पुरूचे बरेचसे घोडदळ मारले गेले आणि अगदी क्षुल्लक पायदळ जिवंत राहिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एरियनच्या सांगण्यावरून भारतीयांचे सुमारे २०,००० च्या आसपास पायदळ आणि ३ हजारांच्या आसपास घोडदळ युद्धात कामी आले. रथांची मोडतोड झाली. पुरुचे दोन पुत्र कामी आले. पुरुचे सर्व सेनापती, युद्धभूमीवरील प्रांताधिकारी, अनेक माहुत वगैरे कामी आले. अलेक्झांडरच्या सैन्यातील कामी आलेल्यांची संख्या मात्र एरियन अतिशय क्षुल्लक (काही शेकड्यांत) देतो. या गणितात एरियनचे काहीतरी निश्चितच चुकलेले आहे हे सहज लक्षात येते. तज्ज्ञांच्या मते टोलेमीचे संदर्भ एरियन वापरतो. यापेक्षा ऍरिस्टोब्युलसचे संदर्भ खरे वाटतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एरियन पुढे म्हणतो की अलेक्झांडर तीक्ष्ण नजरेने पुरुवर लक्ष ठेवून होता. आपल्या सैन्याचा पराभव होतो आहे हे कळून चुकल्यावरही पुरू माघारी फिरला नाही. तो आपल्या सैन्यासह शौर्याने लढत राहिला. सैन्य माघार घेते म्हटल्यावर काढता पाय घेणाऱ्या पर्शियाचा सम्राट दरायुषसारखा पुरू नाही हे लक्षात आल्याने अलेक्झांडरच्या मनात या राजाविषयी आदर निर्माण झाला. सरतेशेवटी पुरुच्या उजव्या खांद्याला मोठी जखम झाली आणि त्याचा हत्ती माघारी फिरला. अलेक्झांडरने हे पाहिल्यावर तत्काळ हुकूम सोडले की माघारी फिरणाऱ्या पुरुला कुणीही अधिक इजा पोहोचवू नये. पुरुशी वाटाघाटी व्हाव्यात म्हणून त्याने तक्षशीलेचा एक घोडेस्वार पुरुच्या हत्तीच्या दिशेने पाठवला. घोडेस्वाराने पुरुचा हत्ती गाठला तसे त्याला पाहून पुरुचा राग उफाळून आला आणि त्याने पुन्हा शस्त्र उचलले परंतु बरीच विनवणी केल्यावर तो शरण येण्यास तयार झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पुरुरवा&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;पुरुरवाचा नेमका वंश इतिहासात नमूद नाही. त्याचे राज्य झेलमच्या पूर्वेला पसरलेले होते त्यावरून तो पूर्व पंजाबातील राजा मानला जातो. तक्षशीलेच्या राजा अंभीशी त्याचे शत्रुत्व असल्याने अलेक्झांडर तक्षशीलेस पोहोचला असता त्याला नजराणे पाठवण्याची किंवा मैत्रीचा हात पुढे करण्याची तसदी त्याने घेतलेली नव्हती. उलट, अलेक्झांडर पूर्वेला कूच करेल या अंदाजाने त्याने सैन्याची जमवाजमव केली होती. पावसाळा आणि ग्रीकांना हत्तीशी लढण्याचा अनुभव नाही या अंदाजांवर तो गाफील राहिला आणि ग्रीक सैन्याने संधी साधली. लढाईत पुरुच्या सैन्याची संख्या पाहिली &lt;span style="color:#cccccc;"&gt;(एरियनने ती वाढवून-चढवून सांगितली नसेल तर)&lt;/span&gt; तर तो कुणी मोठा राजा असावा असा अंदाज बांधता येतो. त्याच्या बाजूने इतर कोणते राजे लढले हे कळत नाही. त्याचे प्रमुख सेनापती कोण होते ते कळत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एरियन पुरुचे वर्णन करताना त्याची उंची "पाच क्युबिट" होती असे म्हणतो. यावरून पुरु सुमारे ६ फुटांपेक्षा अधिक उंच असावा असे वाटते. त्याचे दोन पुत्र युद्धात कामी आले यावरून तो किमान मध्यमवयीन असावा असे दिसते. एरियनच्या सांगण्यावरून पुरू दिसायला अतिशय रुबाबदार असून शरणागत पुरू अलेक्झांडरला भेटायला आला असता त्याच्या चेहऱ्यावर भीती किंवा पराभव दिसत नव्हता. ते पाहून ग्रीक सैन्य अचंबित झाले. पुरुला येताना पाहून अलेक्झांडर स्वतः सैन्याच्या पुढे जाऊन स्वागतासाठी उभा राहिला. अलेक्झांडरने स्वतःहून बोलायला सुरुवात केली आणि पुरुला प्रसिद्ध प्रश्न विचारला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"राजा, मी तुला कसे वागवू? " पुरुने बाणेदार उत्तर दिले, "हे अलेक्झांडर, मला राजासारखेच वागव. "&lt;br /&gt;यावर अलेक्झांडर उत्तरला, " मी माझ्या मनाच्या समाधानासाठी तुला राजासारखेच वागवेन पण तू तुझे समाधान व्हावे म्हणून काहीतरी माग. "&lt;br /&gt;त्यावर पुरू म्हणाला, "मी प्रथमतः जे मागितले त्यातच सर्व आले. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;अलेक्झांडरने पुरुला त्याचे जेवढे राज्य होते ते मानाने परत करून राज्याचे क्षत्रप बनवले तसेच कश्मीरचा भागही पुरुच्या आधिपत्याखाली दिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;---------&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या युद्धातील अलेक्झांडरच्या हानीची संख्या एरियनने दिलेल्या आकड्यांपेक्षा बरीच अधिक असावी. ग्रीक सैन्याला भारतीय भूमीवर युद्ध लढायचा अनुभव नसणे, पावसाळी वाईट हवामान, हत्तींचा सैन्यातील समावेश वगैरेंने त्रस्त होऊन त्यांनी कोएनसतर्फे परतण्याची विनंती अलेक्झांडरला केली. ती नाराजीने का होईना अलेक्झांडरला मानावी लागली. या युद्धानंतर &lt;span style="color:#cccccc;"&gt;(किंवा युद्धात)&lt;/span&gt; झालेला ब्युसाफलसचा मृत्यू वगैरे अलेक्झांडरचा निग्रह तोडण्यास हातभार लावून गेले असावेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अलेक्झांडर आणि पुरुच्या लढाईत अलेक्झांडर ऐवजी पुरुचाच विजय झाला असे तर्क अनेकांनी मांडलेले आढळतात. या तर्कांना अद्यापतरी तज्ज्ञांच्या लेखी अधिष्ठान मिळालेले नाही परंतु लढाईत पराभव होऊनही स्वतःचे राज्य परत मिळणे, सोबत दुसरे राज्यही पदरात पडणे, ज्या परदेशी सम्राटाने विजय मिळवला त्याचा त्या राज्यात/ देशात स्थायिक होण्याचा हेतू नसणे, इथपासून अलेक्झांडरचे माघारी फिरणे, पुढील काही वर्षांत त्याचा मृत्यू इ. मधून पुरुचा पराभव झाला तरी अंतिम विजय पुरुचाच झाला असे वाटणे शक्य आहे असे वाटते.&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;---------&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वरील लेखात विस्तार भयास्तव युद्धाचे वर्णन त्रोटक केले आहे. हा लेख लिहिताना एरियन खेरीज इतर कोणत्याही इतिहासकाराचे भारतीय युद्धाविषयक संदर्भ तपासलेले नाहीत. लेखासंबंधात प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांतून देता येतीलच. वाचकांकडे अधिक माहिती असल्यास अवश्य पुरवावी. एरियनने लिहिलेला अलेक्झांडरच्या स्वारीचा वृत्तांत गूगलबुक्स वरून उतरवून घेता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लेखातील चित्रे विकीपीडीयावरून घेतली आहेत.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-7823867911897131038?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/7823867911897131038/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=7823867911897131038' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/7823867911897131038'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/7823867911897131038'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='अलेक्झांडर आणि पुरु युद्ध'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-6581048643174552790</id><published>2010-06-16T09:12:00.000-07:00</published><updated>2010-06-16T09:34:45.543-07:00</updated><title type='text'>कॉटिंग्लीच्या पर्‍यांचे प्रकरण</title><content type='html'>आजवरच्या देशी-विदेशी साहित्यातील सर्वोत्कृष्ट सत्यान्वेशी कोण - याचे उत्तर साहित्य रसिकांकडून वेगवेगळे आले तरी बहुमताचा मान शेरलॉक होम्सला मिळेल असे वाटते. गेल्या एका शतकाहून अधिक काळापर्यंत वाचकांना मोहवून ठेवण्यात शेरलॉक होम्सला घवघवीत यश मिळाले आहे. थोडासा तिरसट, सामाजिक शिष्टाचारांपासून चार हात दूर पण चलाख आणि धूर्त अशा शेरलॉक होम्सच्या यशाचा खरा धनी मात्र त्याचा जनक आर्थर कॉनन डॉयल मानायला हवा. हुशार, धूर्त आणि प्रचंड निरीक्षण दृष्टी असणारा चिकित्सक शेरलॉक होम्स, पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉयलच्या वैद्यकीय ज्ञानातून उभा राहिला असावा असे म्हटले जाते. शेरलॉक होम्सच्या कथांना प्रसिद्धी मिळाली 'द स्ट्रँड मॅगझिन' या मासिकातून. डॉयलच्या कथांनी गुन्हेगारी-सत्यान्वेशी आणि चातुर्य कथांना फार मोठी प्रसिद्धी आणि वाचकवर्ग दिला. आजही सर आर्थर कॉनन डॉयल यांचे नाव एक उत्कृष्ट लेखक म्हणून घेतले जाते. परंतु, हाच डॉयल प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या मानसपुत्रापेक्षा कसा भिन्न होता याची जाणीव खालील लेखातून वाचकांना व्हावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही घटना आहे सुमारे पहिल्या महायुद्धाच्या नंतरची. कॉटींग्ली या इंग्लंडमधील एका गावात दोघा मुलींना काहीतरी अविस्मरणीय दिसून येण्याची. १६ वर्षीय एल्सी राइट आणि तिच्याकडे राहायला आलेली तिची एक १० वर्षीय बहीण फ्रान्सीस ग्रिफिथ्स यांना घरामागील एका ओढ्यावर खेळताना पऱ्या दिसल्या. नाजूक, पंखधारी, चिमुकल्या पऱ्यांना या बहिणींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केले आणि एका अविस्मरणीय कहाणीचा जन्म झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एल्सी राईट ही एका सुशिक्षित घरातील मुलगी. तिचे वडील पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. एकदा वडलांचा कॅमेरा घेऊन तिने आणि फ्रान्सीसने घरामागील ओढ्यावर काही छायाचित्रे काढली. ही चित्रे डेवलप करताना एल्सीच्या वडलांना त्यात पऱ्या दिसल्या. प्रथमतः त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही आणि त्यांनी एल्सीला कॅमेरा वापरण्यास बंदी घातली. तिच्या आईला मात्र ही छायाचित्रे पाहता क्षणीच त्यांच्या खरेपणाविषयी विश्वास वाटला. याचे कारण असे की एल्सीची आई गूढ-आध्यात्मवादावर विश्वास ठेवणारी होती. पऱ्या, देवदूत, जादू आणि इतर गोष्टींवर तिचा विश्वास होता त्यामुळे आपल्या मुलीने यात कोणताही बनाव केलेला नाही अशी तिची खात्री झाली. "थिऑसॉफिकल सोसायटीच्या" एका सभेत तिने या प्रकरणाची वाच्यता केली आणि दोन लहान मुलींनी पऱ्या पाहिल्या. एवढेच नाही तर त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे ही गोष्ट सर्वश्रुत झाली. &lt;img src="http://upload.wikimedia.org/wikipedia/en/f/f9/CottingleyFairies3.jpg" width="250" align="left" /&gt;&lt;br /&gt;थिऑसॉफिकल सोसायटीच्या एका सदस्याने ही छायाचित्रे तपासणीसाठी तज्ज्ञाकडे पाठवली असता या तज्ज्ञाने छायाचित्रांच्या छायाप्रती (निगेटिव्हज) विश्वसनीय असल्याची ग्वाही दिली. ही माहिती फिरत फिरत सर आर्थर कॉनन डॉयल यांच्यापर्यंत पोहोचली. स्ट्रँड मासिकाने आपल्या ख्रिसमसच्या अंकात या पऱ्यांवर लेख लिहिण्याचे आवाहन डॉयल यांना केले. डॉयल यांनी या प्रकरणाला प्रसिद्धी देणाऱ्या थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य एडवर्ड गार्डनर यांच्याशी आणि एल्सिच्या वडलांशी संपर्क साधला. तोपर्यंत या प्रकरणाबाबत साशंक असणारे एल्सीचे वडील सर आर्थर कॉनन डॉयल छायाचित्रांच्या प्रकाशनाची परवानगी मागत आहेत या मागणीने सुखावले आणि त्यांनी छायाचित्रे वापरण्याची परवानगी डॉयल यांना दिली. यानंतर गार्डनर आणि डॉयल यांनी हे फोटो छाननीसाठी कोडॅक आणि इलफोर्ड या छायाचित्रीकरणासाठी प्रसिद्ध कंपन्यांकडे पाठवले. पैकी कोडॅक कंपनीतील अनेक तज्ज्ञांना ही छायाचित्रे विश्वसनीय वाटल्याचे सांगितले जाते. इलफोर्डला या छायाचित्रांत बनाव असल्याचे वाटले. दोन्ही कंपन्यांनी जाहीरपणे या छायाचित्रांना विश्वसनीय करार देण्यास नकार दिला पण डॉयल यांनी हार मानली नाही.&lt;br /&gt;&lt;img height="320" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/en/7/78/CottingleyFairies4.jpg" width="320" align="right" /&gt;&lt;br /&gt;एडवर्ड गार्डनर यांनी एल्सीच्या घरी जाऊन पऱ्यांची आणखी चित्रे मिळवण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही मुलींनी खूप लोक गोळा झाले तर पऱ्या संपर्कात येणार नाहीत असे कारण दिल्याने गार्डनर यांनी चांगले कॅमेरे या मुलींच्या हाती देऊन स्वच्छ सूर्यप्रकाशात त्यांना छायाचित्रे घेण्याचे सुचवले. त्यानुसार या मुलींनी घेतलेल्या अनेक छायाचित्रांतून केवळ दोन छायाचित्रांत पऱ्यांचे दर्शन झाले. गार्डनर यांनी ही बातमी ताबडतोब डॉयल यांना कळवली. त्या वेळेस डॉयल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते. बातमी कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. या लेखाच्या निमित्ताने अतींद्रिय शक्तींवर लोकांचा विश्वास बसेल असा त्यांचा ग्रह झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१९२० सालच्या डिसेंबर महिन्यात सर आर्थर कॉनन डॉयल यांनी आपला लेख स्ट्रँड मासिकात प्रसिद्ध केला. गोपनीयता राखण्यासाठी लेखातील नावे बदलून टाकण्यात आली. मासिकाच्या प्रती रातोरात खपल्या. डॉयल हे प्रसिद्ध लेखक असल्याने सुरुवातीला संमिश्र प्रतिक्रिया आल्या पण नंतर लेखावर उलट-सुलट प्रतिक्रियांना उधाण आले. या लेखाचे खंडन करणाऱ्यांनी आपापल्या लेखांतून डॉयल यांची आणि या प्रकरणाची खिल्ली उडवली तर डॉयल यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्यावर विश्वासही दाखवला. १९२२ साली डॉयल यांनी या प्रकरणावर "द कमिंग ऑफ द फेअरिज" नावाचे पुस्तकही प्रकाशित केले. काही काळानंतर या प्रकरणाने उडालेला धुरळा खाली बसला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढील अनेक वर्षे आपल्याला पऱ्या दिसल्या होत्या या विधानावर या दोन्ही मुली ठाम राहिल्या. या छायाचित्रांत पऱ्यांची कात्रणे वापरली होती हे त्यांनी कबूल करण्यास १९८३ साल उजाडले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज या छायाचित्रांवर नजर टाकली तर चित्रातील पऱ्या मानवांप्रमाणे त्रिमित नाहीत हे सहज ध्यानात येते. या मुलींनी लहान मुलांच्या पुस्तकातून कापून त्या छायाचित्रांसाठी उभ्या केल्या असाव्यात आणि पिन किंवा पातळ धाग्याने लटकवल्या असा अंदाज सहज बांधता येतो. एल्सीच्या वडिलांनी स्वतःही असे म्हटले होते की ही छायाचित्रे पाहिल्यावर त्यांना ही ठकबाजी वाटली आणि त्यांनी मुलींच्या खोल्यांची झडती घेतली होती परंतु त्यांना कुठलीही कात्रणे, चित्रे मिळाली नाहीत. तरीही, छायाचित्रांकडे निरखून पाहिले तर ही ठकबाजी आहे हे सहज लक्षात येते. १९२० साली छायाचित्रण ही कला नवी असली तरीदेखील ही ठकबाजी आहे असे अनेकांच्या लक्षात आले होतेच परंतु अशी ठकबाजी इतक्या लहान निष्पाप मुली करतील हा विचार अनेकांना रुचला नसावा. सर आर्थर कॉनन डॉयल हे त्यापैकीच एक.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या बायकोच्या आणि मुलाच्या अकाली मृत्यूनंतर डॉयल यांना अतिशय नैराश्य आले होते असे सांगितले जाते. नैराश्यातून सुटका करून घेताना डॉयल यांचा गूढ-आध्यात्मवाद आणि अतींद्रिय शक्तींवर विश्वास वाढला. "द घोस्ट क्लब" नावाच्या अतींद्रिय शक्तींचा पाठपुरावा करणाऱ्या संघटनेचे ते सदस्यही होते. त्यांच्या या वेडापायी हॅरी हुडिनी या प्रसिद्ध जादुगाराशी त्यांची घनिष्ठ मैत्री फाटली होती कारण हुडिनीच्या अंगात अतींद्रिय शक्ती असल्याचा त्यांना विश्वास होता आणि हुडिनीचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता; तो अशा फसवणुकीचा पर्दाफाश करण्यास उत्सुक असे. डॉयल यांच्या काही मित्रांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष आयुष्यात डॉयल हे अतिशय सरळ आणि साधे गृहस्थ होते. गूढ गोष्टींवरील विश्वास आणि लहान वयाच्या निष्पाप मुली अशी फसवणूक करूच शकत नाहीत अशी त्यांची धारणा यामुळे त्यांची फसवणूक झाली असावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कारणे काहीही असतील, आपल्या लेखनातून बारीकसारीक निरीक्षणांवर भर देणारा चिकित्सक लेखक दोन लहान पोरींच्या खेळात सहज गंडला गेला असेच म्हणावे लागेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पूरक माहिती आणि अन्य छायाचित्रे:&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Cottingley_Fairies"&gt;विकीवर कॉटिंग्ली पर्‍या&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Cottingley_Fairies"&gt;कॉटिंग्ली. नेट&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.sacred-texts.com/neu/eng/cof/index.htm"&gt;द कमिंग ऑफ फेअरीज - आर्थर कॉनन डॉयल&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लेखातील सर्व चित्रे विकीपिडीयावरून साभार.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-6581048643174552790?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/6581048643174552790/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=6581048643174552790' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/6581048643174552790'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/6581048643174552790'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2010/06/blog-post_16.html' title='कॉटिंग्लीच्या पर्‍यांचे प्रकरण'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-2441742733821874378</id><published>2010-04-26T11:54:00.000-07:00</published><updated>2010-04-26T12:01:50.544-07:00</updated><title type='text'>जपून! ते लक्ष ठेवून आहेत - ३</title><content type='html'>गरगॉयल, कायमेरा आणि ग्रोटेस्क याविषयी यापूर्वीच्या लेखांत माहिती दिली आहेच. गॉथिक बांधणीच्या एखाद्या चर्चच्या किंवा कॅथेड्रलच्या मनोर्‍यांवरून आणि खांबांवरून नजर फिरवली तर बर्‍याचदा ही गरगॉयल्स नजरेस पडतात. चर्चच्या भिंतींवर गरगॉयलचे अस्तित्व हे दुष्ट शक्ती चर्चच्या भिंतींबाहेर ठेवण्यासाठी आहे पासून ही गरगॉयल्स चर्चला सुरक्षितता देण्यासाठी आहेत अशा विविध कारणांसाठी असल्याचे सांगितले जाते. अधिक माहिती -&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://mr.upakram.org/node/1772"&gt;जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १ &lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://mr.upakram.org/node/1773"&gt;जपून! ते लक्ष ठेवून आहेत - २&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वॉशिंग्टन डिसीतील नॅशनल कॅथेड्रल ही निओ-गॉथिक बांधणीची प्रसिद्ध इमारत. इमारतीची रचना, भव्यता, स्टेन्ड-ग्लासच्या प्रचंड खिडक्या यामुळे ही इमारत लक्षवेधी ठरते. केवळ बांधणीसाठीच नाही तर वॉशिंग्टन डिसी भागातील सर्वात लांब चाललेलं बांधकाम याच इमारतीचे. १९०७ साली सुरु झालेले हे बांधकाम १९९० साली संपुष्टात आले, म्हणजेच तब्बल ८३ वर्षे चालले. एम्पायर स्टेट बिल्डींग, व्हाईट हाऊस यांच्यानंतर अमेरिकन स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट इमारतींचा नमुना म्हणून नॅशनल कॅथेड्रलकडे बोट दाखवले जाते. भव्यतेच्या दृष्टीतून या कॅथेड्रलचा जगात सहावा क्रमांक लागतो. हा लेख नॅशनल कॅथेड्रलवर नसल्याने यापेक्षा अधिक माहिती &lt;a href="http://www.nationalcathedral.org/"&gt;येथे &lt;/a&gt;मिळेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नॅशनल कॅथेड्रलच्या भेटीत "गरगॉयलची सहल" करता येते. आम्ही ज्या वेळात तेथे पोहोचलो त्या वेळात अशी सहल नसल्याने आम्हीच दुपारी टळटळीत उन्हात आकाशाकडे बघत गरगॉयल शोधण्याचा प्रयत्न केला. ड्रॅगन, रानटी कुत्रे, सर्प, मगर अशी अनेक भयानक गरगॉयल्सनी ही इमारत सजली आहे परंतु इमारतीच्या उंचीमुळे सर्वच गरगॉयल जमिनीवरून दिसत नाहीत. काही इतक्या उंचीवर आहेत की माझ्याकडील कॅमेराचा झूम पुरेसा नव्हता त्यामुळे फोटो काढले तरी ते चांगले आले नाहीत. सातव्या माळ्यावरील सज्जातूनही काही सुरेख गरगॉयल आणि ग्रोटेस्क यावेळी नजरेस पडली. त्यापैकी आवडलेली काही येथे देत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://farm5.static.flickr.com/4042/4541443676_97717e5130_o.jpg" width="682" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img height="496" alt="DSC00127" src="http://farm5.static.flickr.com/4070/4541440078_8a51367e52_o.jpg" width="590" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गरगॉयलच्या संदर्भातील एक घटना येथे देत आहे. ८० च्या दशकात कॅथेड्रलच्या पश्चिमेकडील भागाचे काम सुरु होते. या भागाच्या सुशोभीकरण गरगॉयल्सनीच करायचे होते. या सुशोभीकरणासाठी स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. नॅशनल जिओग्राफिकच्या मासिकातून ही माहिती देण्यात आली. ज्यांना त्यात पारितोषिके मिळाली त्यातील तिसर्‍या क्रमांकावरील गरगॉयल खाली दिले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चाणाक्ष वाचकांना हे गरगॉयल कोणाचे ते सांगण्याची गरज नाही.&lt;br /&gt;&lt;img height="500" alt="Darth" src="http://farm3.static.flickr.com/2691/4540814823_5366d70476.jpg" width="378" /&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-2441742733821874378?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/2441742733821874378/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=2441742733821874378' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2441742733821874378'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2441742733821874378'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='जपून! ते लक्ष ठेवून आहेत - ३'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://farm3.static.flickr.com/2691/4540814823_5366d70476_t.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-2653375939165899708</id><published>2009-12-18T19:02:00.000-08:00</published><updated>2009-12-18T19:08:05.952-08:00</updated><title type='text'>वेडात वीर दौडले... तीनशे सात</title><content type='html'>&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;म्यानातून उसळे तरवारीची पात&lt;br /&gt;वेडात मराठे वीर दौडले सात&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;कुसुमाग्रजांच्या या अप्रतिम पंक्तींनी मराठी मानसात आणि मराठी साहित्यात प्रतापराव गुजर आणि त्यांच्या साथीदारांना मानाचे पान दिलेले आहे. इतिहासात मात्र पावनखिंडीला जे स्थान आहे ते नेसरीच्या खिंडीला नाही असे दिसते. महाराजांचा शब्द पाळण्यात सरसेनापती चुकले. त्यांनी भावनेच्या भरात आपले प्राण खर्ची घातले. राज्याभिषेकाआधी काही थोडक्या दिवसांत राज्याला सेनापती नाही अशी स्थिती राज्यात निर्माण झाली. असे नेमके काय झाले होते प्रतापरावांकडून, याविषयी सर्वश्रुत असणारी कहाणी पुढीलप्रमाणे - &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;सन १६७३ साली शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर स्थित होते. याचकाळात अदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांचे वीस हजारी सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागताच प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना शिवाजीराजांनी गडावर बोलावले आणि आज्ञा दिली की "खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. ” &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;महाराजांची आज्ञा घेऊन प्रतापराव आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले. बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने खानाला पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला चढवला. त्यानंतर झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली. पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. त्याने प्रतापरावांकडे आपला वकील पाठवला. वकिलाच्या रदबदलीने आणि गोड शब्दांनी प्रतापरावांचे मन द्रवले. खानाला असा हिसका दाखवल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी खात्री त्यांना वाटली आणि त्यांनी वकिलाच्या प्रार्थनेचा स्वीकार करून खानाला अभय दिले. इतकेच नाही तर त्याला कैद न करता, मुक्काम हलवण्यास वाट करून दिली. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;या लढाईची बातमी महाराजांना कळल्यावर ते साहजिकच चिडले. महाराजांच्या स्पष्ट आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका त्यांना होतीच. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून "सला काय निमित्य केला? ” असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच बहलोलने हल्ले पुन्हा सुरू केले. शिवराज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली होती. यांत होणारे बहलोलखानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते. त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, “हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे. ” महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर त्यांना लागली आणि हाताशी असणाऱ्या सहा शिलेदारांसह ते खानावर चालून गेले. खानाच्या अफाट सैन्यासमोर या सात वीरांचा निभाव लागणे केवळ अशक्य होते आणि परिणामी धाडस आणि शौर्याची परिसीमा गाठणारे हे वीर धारातीर्थी पडले. महाराजांना ही वार्ता कळल्यावर ते अतिशय दु:खी झाले. राज्याच्या सरसेनापतीला दूरदृष्टी हवी ही अपेक्षा महाराजांनी करणे स्वाभाविक होते परंतु भावनेच्या भरात प्रतापरावांसारखा निधड्या छातीचा वीर दुसरी चूक करून बसला. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;प्रतापरावांच्या मृत्यूचे मराठाशाहीवर नेमके परिणाम कसे झाले याबाबत मला फारसे वाचायला मिळाले नाही परंतु सर्वसामान्य अंदाज लावायचा झाला तर राज्याचा सरसेनापती अशा रितीने मृत्यूला कवटाळतो तेव्हा सैन्यात बेबंदशाही माजण्याची शक्यता असते. राजा, प्रजा, राज्य आणि सैन्य यांचे खच्चीकरण होण्याची शक्यताही असते. २४ फेब्रुवारी १६७४ ला प्रतापरावांना वीरमरण आले आणि १६ जूनला राजांना राज्याभिषेक झाला. शिवराज्याभिषेक जवळ आला असता सरसेनापतीचा मृत्यू होणे ही घटना राज्यस्थापनेसाठी नक्कीच पूरक नसावी. निश्चलपुरी महाराजांनी अपशकुन म्हणून प्रतापरावांच्या मृत्यूचे कारण दाखवल्याची घटनाही वाचनात येते. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;उतावळा, भावनाप्रधान स्वभाव आणि दूरदृष्टीचा अभाव ही कारणे राज्याचा सरसेनापती हिरावून घेण्यास कारणीभूत ठरली. इतके सर्व असूनही, प्रतापरावांच्या अतुलनीय धाडसाचे कोठेतरी कौतुक करावेसे वाटते. गैरजबाबदार कृत्य हातातून घडले तरी त्यांची स्वामीनिष्ठा वाखाणण्याजोगी होती. खुद्द महाराजांना त्याविषयी शंका असावी असे वाटत नाही. आपल्या जिवाचा, घरादाराचा, कुटुंबाचा विचार न करता केवळ स्वाभिमानाला ठेच लागली म्हणून स्वामीनिष्ठेपायी आपला जीव ओतून टाकणाऱ्या या वीरांच्या धमन्यांतील रक्तात असा कोणता गुण असावा की कोणताही इतर विचार न करता त्यांनी बहलोलखानाच्या सैन्यावर चालून जाण्याचा निर्णय घेतला; यामागील नेमकी मानसिकता समजून घेणे कठिण वाटते. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;तरीही, नेसरीच्या खिंडीला पावनखिंडीचे महत्त्व नाही याचे कारण प्राणार्पण कोणी, कधी आणि नेमके कशासाठी केले याला इतिहासात महत्त्व आहे. बाजीप्रभूंचे प्राणार्पण आणि प्रतापरावांचे प्राणार्पण यांत फरक दिसून येतो. युद्धात बरेचदा हार-जीत यांच्यापेक्षाही मागाहून होणारे परिणाम महत्त्वाचे ठरतात. बाजीप्रभूंचे बलिदान महाराजांना सुखरूप ठेवण्याकामी आले. बहुधा, मूठभर सैनिकांसह बाजीप्रभू मागे राहिले तेव्हाच त्यांचा मृत्यू अटळ आहे हे सर्वांना माहित असावे. प्रतापरावांच्या बाबत तसे होत नाही. कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितेने मात्र प्रतापरावांच्या प्राणार्पणाचे उदात्तीकरण झाले. या कथेसारखी भासणारी पाश्चात्य इतिहासातील एक प्रचलित कथा पुढे देता येईल. ती म्हणजे थर्मापलैयच्या लढाईची. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;प्राचीन ग्रीकमधील अथेन्स आणि स्पार्टा ही दोन प्रसिद्ध शहर-राज्ये गणली जातात. अथेन्स आणि स्पार्टा एकमेकांपासून फार लांब नाहीत परंतु या दोन्ही राज्यांचे नीतिनियम, कायदे भिन्न होते. अथेन्स हे समुद्राजवळ असल्याने समुद्र व्यापारात हे राज्य अग्रेसर होते. व्यापाराच्या निमित्ताने अनेकविध संस्कृतींशी आलेल्या संबंधातून अथेन्सवासीयांचा सामाजिक, राजकीय दृष्टीकोण पुरोगामी होता. या उलट, स्पार्टा हे ग्रीक प्रदेशात आतवर वसलेले शहर-राज्य. सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेले. शत्रूराज्यांमुळे सतत सावध असलेले आणि त्यामुळे सांस्कृतिक बाबींमध्ये संकुचित राहिलेले. स्पार्टाचे कायदे आणि नीतिनियम हे अथेन्सपेक्षा क्रूर होते. केवळ सुदृढ मुलांना येथे वाचवले जाई. अशक्त आणि अपंग बालकांना मारले जाई. लष्करी प्रशिक्षण सक्तीचे होते. दोन्ही शहरांत गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. यापैकी, स्पार्टातील गुलामांना हेलॉट असे संबोधले जाई. इतर राज्यांतील गुलामांपेक्षा हेलॉटांना थोड्या अधिक सवलती होत्या. त्यांना जमीन कसता येई पण इतर नागरिकांपेक्षा अधिक शेतसारा भरावा लागे. स्पार्टाच्या नागरिकांकडून हेलॉटचा मृत्यू हा दखलपात्र गुन्हा नसे. प्रामुख्याने हेलॉट हे कामगार किंवा कलाकार असत. सैन्यातही त्यांची भरणा होई. आपले स्वातंत्र्य त्यांना विकत घेण्याची मुभा होती. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;अथेन्स आणि स्पार्टाप्रमाणेच ग्रीसमध्ये इतर अनेक लहान-मोठी राज्ये होती. ग्रीसच्या जवळचे प्रबळ राष्ट्र पर्शियाचे. पर्शियाचा सम्राट झेरेक्सिस याने इ.स.पूर्व ४८३ पासून सैन्याची मोठी जमवाजमव केली आणि इ.स.पूर्व. ४८० मध्ये ग्रीसवर भूमार्गे आणि समुद्रमार्गे लाखोंच्या सैन्यानिशी हल्ला चढवला. झेरेक्सिसने हल्ल्याची वेळ ऑलिंपिक्सचे खेळ आणि कार्निया या ग्रीक सणाच्या सुमारास ठरवली होती. याचे कारण या काळात ग्रीक शस्त्रे उचलत नसत. कार्नियाच्या दिवसांत शस्त्र उचलणे दैवी कोपास कारण होऊ शकते अशी प्रचलित श्रद्धाही होती. ग्रीकांना झेरेक्सिसच्या स्वारीचा सुगावा लागताच त्यांनी आपापसांतील वैर बाजूला ठेवून एकत्रित होऊन लढायचे ठरवले. त्यानुसार समुद्रमार्गे येणारा पर्शियन सैन्याचा ताफा रोखण्यास ग्रीक सेना आर्टेमिसिअमच्या सामुद्रधुनीत एकत्रित झाल्या. स्पार्टावर या काळात लिओनायडस या राजाचे राज्य होते. त्याची सेनाही मित्र ग्रीक सेनेत सहभागी होती. असे म्हणतात की स्वारीपूर्वी लिओनायडस डेल्फायच्या पुजारीणीचा सल्ला घेण्यास गेला असता तिने त्याला भविष्य सांगितले होते की "पर्शियन युद्धात एकतर स्पार्टाचा विनाश होईल आणि तसे न होता राज्य वाचले तर राजाचा विनाश नक्की होईल. " &lt;/p&gt;&lt;ol&gt;&lt;li&gt;&lt;a href="http://www.amazon.com/Spartans-World-Warrior-Heroes-Ancient-Greece/dp/1400078857/ref=sr_1_4?ie=UTF8&amp;amp;s=books&amp;amp;qid=1261140589&amp;amp;sr=1-4"&gt;द स्पार्टन्स - द वर्ल्ड ऑफ द वॉरिअर हिरोज ऑफ एन्शंट &lt;/a&gt;&lt;/li&gt;&lt;li&gt;डिसिजीव बॅटल्स - थर्मापलै - हिस्टरी &lt;span&gt;चॅनेल&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Leonidas_I"&gt;विकिवर लिओनायडस&lt;/a&gt;&lt;a href="http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3131435,prtpage-1.cms"&gt;प्रतापरावांवरील मटामधील लेख&lt;/a&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;/li&gt;&lt;/ol&gt;&lt;p&gt;&lt;span&gt;याखेरीज&lt;/span&gt; वर्तमानपत्रांतील अनेक लेखांचा संदर्भ.&lt;br /&gt;चित्रे:&lt;br /&gt;सर्व चित्रे विकिपिडीयावरून&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-2653375939165899708?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/2653375939165899708/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=2653375939165899708' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2653375939165899708'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2653375939165899708'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2009/12/blog-post.html' title='वेडात वीर दौडले... तीनशे सात'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-2736318711444464655</id><published>2009-09-03T02:29:00.000-07:00</published><updated>2009-09-03T02:37:03.216-07:00</updated><title type='text'>एक डॉलरचे रहस्य</title><content type='html'>दा विंची कोड ही डॅन ब्राऊनची सुप्रसिद्ध कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल किंवा तिच्याबद्दल ऐकले असेल. काही प्राचीन रहस्यांचा शोध, ऐतिहासिक रहस्यांचा पाठपुरावा आणि काही प्राचीन गुप्तसंस्थांचे कामकाज असा साचा डॅन ब्राऊनच्या कादंबर्‍यांत सहसा आढळून येतो. दा विंची कोडमधील प्रायॉरी ऑफ झायन आणि एंजल अँड डिमन्स या दुसर्‍या कादंबरीतील इल्युमिनाती या गुप्तसंस्था या कादंबऱ्यांचा गाभा आहेत. एंजल्स अँड डिमन्स मधील एका प्रसंगात, कादंबरीची नायिका वित्तोरिया वेत्रा, रॉबर्ट लॅंग्डनला विचारते की "तू प्राचीन चिन्हशास्त्राकडे कसा काय वळलास? " याचे उत्तर देताना तो सांगतो "मला या शास्त्राबद्दल आवड उत्पन्न झाली ती एक डॉलरच्या नोटेमुळे! " &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अमेरिकन डॉलरची नोट किंवा अमेरिकन पद्धतीत म्हणतात तसे, डॉलर-बिल हाताळले असावे. अमेरिकन डॉलर वापरून व्यवहार केला असावा, आपल्या खिशात, पाकिटात, पर्समध्ये डॉलर-बिल ठेवले असावे. परंतु हे करताना आपण एक प्राचीन रहस्य आपल्यासोबत बाळगतो आहोत याची जाणीव फार कमीजणांना असावी. एक डॉलरच्या नोटेकडे निरखून पाहिले तर एक गोष्ट दिसून येईल की नोटेच्या एका बाजूस संयुक्त संस्थानांचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चित्र असून दुसर्‍या बाजूस अमेरिका किंवा अमेरिकन इतिहासाशी दूरवर संबंधीत नसणारा एक वर्तुळाकार शिक्का आहे. या वर्तुळात एक इजिप्शियन पिरॅमिड दिसते. हे पिरॅमिडही पूर्ण नाही. मध्येच कापलेले आहे. त्याच्या शिखरावरील भागात एक प्रकाशमान डोळा असून पायथ्याशी रोमन आकडे दिसतात. पिरॅमिडच्या वर आणि खाली लॅटीन भाषेतील मजकूर आहे. गेली कित्येक वर्षे लोकांना हे चिन्ह नेमके का निवडले गेले हे गूढ उलगडलेले नाही आणि यामागे एक प्राचीन "काँस्पिरसी थेअरी" असल्याची आख्यायिका सुप्रसिद्ध आहे. अनेकांच्या मते हे चिन्ह फ्री-मेसन्स या प्राचीन गुप्तसंघटनेची देणगी असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि फ्री-मेसन संघटनेचे कार्यकर्ते फ्रॅंकलीन रूझवेल्ट यांनी त्याला डॉलरच्या नोटेवर स्थानापन्न केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/1/1d/United_States_one_dollar_bill%2C_reverse.jpg"&gt;&lt;img src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/1/1d/United_States_one_dollar_bill%2C_reverse.jpg" border="0" alt="" height="100" width="250" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्वसाधारणत: या चिन्हाची माहिती काढायला गेले असता केवळ प्रेसिडेंट रूझवेल्ट यांचा या प्रकारात समावेश नसून हे चिन्ह अमेरिकेच्या राष्ट्रीय शिक्क्यावरही (Great Seal) असल्याचे सांगितले जाते. या शिक्क्याची निर्मिती १८ व्या शतकात करण्यात आली असून तिचा संबंध अमेरिकेचे आद्य संस्थापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंजामीन फ्रॅंकलीन यांच्याशी जोडला जातो. शिक्क्यावर असणार्‍या या चिन्हाची माहिती पुढीलप्रमाणे मिळते -&lt;br /&gt;&lt;br /&gt;चिन्हातील खालचा अपूर्ण पिरॅमिड हा १३ पायऱ्यांचा बनलेला असून नंतर कापलेला आहे. पिरॅमिडच्या वरील भागात एक सर्वदर्शी नेत्र आहे. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीप्रमाणे हे ईश्वराचे सर्वव्यापी आणि संपूर्ण मानवजातीवर देखरेख करणारे नेत्र असल्याचे मानले जाते. पिरॅमिडच्या पायथ्याशी रोमन क्रमांक दिसतो. या पिरॅमिडच्या वर Annuit Coeptis ही लॅटीन वाक्यरचना आढळते तिचा अर्थ "कार्यारंभास त्याचा (देवाचा) आशीर्वाद आहे" आणि पिरॅमिडच्या खाली असणाऱ्या Novus Ordo Seclorum या वाक्यरचनेचा अर्थ "नव्या जगाची व्यवस्था" असा सांगितला जातो. इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा की बेंजामीन फ्रॅंकलीन हे देखिल फ्रीमेसन होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशीच एक गोष्ट सांगितली जाते ती थोरले जॉर्ज बुश यांच्या संदर्भात आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी जॉर्ज बुश यांनी अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत आणि अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी. आय. ए. चे प्रमुख म्हणून पदे भूषविली होती. १९८९ च्या जानेवारी महिन्यात जॉर्ज बुश यांचा शपथविधी झाला तेव्हा सर्वसामान्यांच्या लक्षात न येईल अशी एक गोष्ट घडली होती. ती म्हणजे शपथविधी दरम्यान वापरली गेलेली बायबलची आवृत्ती हे नेहमीच्या बायबलपेक्षा वेगळी होती. ही आवृत्ती फ्रीमेसनांच्या गूढ आकृत्या आणि चित्रांनी सजलेली होती आणि हीच आवृत्ती अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी शपथविधीसाठी वापरली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरिकेचे चौदा अध्यक्ष हे फ्रीमेसन्स होते असे मानले जाते. जॉर्ज वॉशिंग्टन, थिओडोर रुझवेल्ट, अँड्रू विल्सन, फ्रॅंकलीन रुझवेल्ट, हॅरी ट्रुमन आणि थोरले जॉर्ज बुश हे त्यापैकी काही प्रमुख राष्ट्राध्यक्ष. यापैकी, ट्रुमन हे अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएचे जनक होत. बॉस्टन टी पार्टीतील सहभागापासून अमेरिकेची घटना लिहिणाऱ्यांपैकी अनेकजण फ्रीमेसन असल्याचे पुरावे सादर केले जातात. अब्राहम लिंकन यांनीही फ्रीमेसन संस्थेचे सदस्यत्व घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते आणि यावरून अमेरिकन सरकार नावाचे कळसूत्री बाहुले फ्रीमेसनांच्या गुप्तसंघटनेकडून नाचवले जाते अशी अटकळ बांधली जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;फ्रीमेसनांची संस्था ही एक अतिशय प्राचीन गुप्त बंधुभावसंवर्धिनी (Fraternal Organization) असून त्यात कोणत्याही जाती-धर्माचे लोक सामील होऊ शकतात याखेरीज या संस्थेची माहिती अनेकांना नसते. ही संघटना कशी अस्तित्वात आली, तीत सामील होण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते, त्यांनी राखून ठेवलेली प्राचीन गुपिते कोणती वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरे सहसा उपलब्ध नाहीत. माहिती शोधत जाता जे थोडेफार धागेदोरे हाती लागतात ते असे -&lt;br /&gt;&lt;br /&gt;फ्रीमेसनरी या संस्थेचा उगम स्टोनमेसन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरवट आणि शिल्पकारांशी निगडित आहे. ही संस्था कधी अस्तित्वात आल्याचे कळत नसले तरी बायबलमधील प्रसिद्ध राजा सॉलोमन (सुलेमान) याचे मंदिर बांधताना त्याच्या हायरम अबीफ या प्रमुख स्थापत्यकाराची हत्या कोणतेतरी गुपित काढून घेण्यासाठी केली गेल्याचे सांगितले जाते आणि आपल्या प्राणांची किंमत देऊन ते गुपित जपणारा स्थापत्यकार, फ्रीमेसन असल्याचे सांगितले जाते. किंबहुना, फ्रीमेसनरीच्या घटनेतील एक प्रमुख मुद्दा - गुपिताचे रक्षण प्राण जाईस्तोवर करायचे असा असतो. ही प्राचीन गुपिते कोणती या बद्दल अनेक अटकळी आहेत. सुलेमानचा खजिना, होली ग्रेलचे गुपित, मध्ययुगात युरोपात मुसलमानांविरुद्ध काढल्या गेलेल्या धार्मिक युद्धमोहिमा (क्रुसेडस), अनेक मध्ययुगीन राज्यक्रांत्या, राजकीय स्थित्यंतरे आणि अशा अनेक ऐतिहासिक गुपितांचे रक्षणकर्ते फ्रीमेसन्स असल्याचे सांगितले जाते. डॅन ब्राऊनच्या दा विंची कोडमुळे प्रसिद्ध झालेले सरदार नाइट टेंप्लारही फ्रीमेसन्स असल्याचे समजले जाते. आख्यायिकांचा आणि दंतकथांचा भाग सोडल्यास फ्रीमेसन्स ही संस्था खरी असली तरी ही प्राचीन गुप्तसंस्था काळाच्या उदरात कधीतरी गडप झाली असे दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यानंतर इ.स. १७१७ साली किंवा त्या सुमारास इंग्लंडमध्ये फ्रीमेसन्स संस्थेचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ मेसन्स हे दगड कापणारे, घडवणारे आणि शिल्पकाम करणारे पाथरवट असले तरी १८ व्या शतकात या संस्थेचे पुनरुत्थान काही राजकारणी, उमराव, साहित्यिक, व्यावसायिक आणि कलाकारांनी केल्याचे सांगितले जाते. १८ व्या फ्रीमेसनरीची घटना, विधी,&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुपिते, कूटशब्द इतकेच नव्हे तर नवी लिपी तयार करण्यात आली. कूटशब्द आणि गुपिते राखून ठेवण्यासाठी प्राणांची शपथ घालण्याची प्रथा निर्माण करण्यात आली. मुख शहरांत फ्रीमेसन्सची आलिशान आणि ऐश्वर्यसंपन्न सभागृहे आहेत. यांना ग्रँड लॉजेस म्हणून ओळखले जाते. स्थापत्यशास्त्राची उपकरणे वापरून त्या मध्यभागी G लिहिलेले शेजारील चित्रातील हे बोधचिन्ह पाश्चात्य जगतात कुठेना कुठे नजरेस पडते. या अक्षराचे गूढही कोणाला सुटलेले नाही. God, Goodness, Geometry अशा अनेक अटकळी बांधल्या जातात. तरी, जगातील सर्वश्रेष्ठ स्थापत्यकार ईश्वराला मानवंदना देण्यासाठीच G हे अक्षर येते असे अनेकजण मानतात. युरोपातील आणि प्रामुख्याने अमेरिकन सरकारवर या संघटनेचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. फ्रीमेसनरी ही तिच्या राजकारणातील सहभागामुळे बऱ्यापैकी कुप्रसिद्धही गणली जाते. राजकीय हत्या, हल्ले, स्थित्यंतरे यांत या संस्थेचा सहभाग असल्याच्या वदंता प्रसिद्ध आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परंतु, या सर्व सांगोवांगीच्या कथा आहेत की यात काही तथ्यांशही आहे याचा मागोवा घेताना तज्ज्ञ ही कॉन्स्पिरसी थिअरी अर्थातच मोडीत काढतात. त्यांचे काही ठोस मुद्दे असे -&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरिकेचा शिक्का निश्चित करण्यात बेंजामीन फ्रँकलीन हे एकटेच नव्हते. त्यांच्यासोबत इतर अनेक होते आणि ते फ्रीमेसन असल्याचे पुरावे नाहीत. अमेरिकन शिक्क्यातील फ्रँकलीन यांनी सुचवलेला काही भाग नाकारण्यातही आला होता. बॉस्टन टी पार्टीची आखणी सर्वस्वी फ्रीमेसन्सनी केली होती याला पुष्टी देणारे संदर्भ सापडत नाहीत. फ्रीमेसन्स आणि इजिप्त व इजिप्तमधील पिरॅमिडस यांचा कोणताही संबंध असल्याचे दाखले नाहीत. हायरम अबीफच्या खुनाचा ऐतिहासिक पुरावा मिळत नाही आणि त्याच्यामुळे प्राणांची शपथ घालण्याचा विधी फ्रीमेसन संस्थेत रुजू झाल्याची कथा केवळ दंतकथा आहे. फ्रीमेसनरी ही कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाची संस्था असल्याचे सिद्ध झालेले नाही. काही विद्वानांनी एकत्र येऊन सुरू केलेली आणि स्वयंप्रेरणेने ज्यांना या संस्थेत सहभागी व्हावे असे वाटते त्यांना सभासदत्व देणारी ही संस्था आहे इतकेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;याचप्रमाणे, एक डॉलरच्या रहस्याचा मागोवा घेता, या नोटेवरील १३ पायऱ्यांच्या पिरॅमिडमधील १३ हा आकडा अमेरिकेच्या १३ मूळ वसाहती दर्शवतो. हा अपूर्ण पिरॅमिड राष्ट्रबांधणीचे आणि एकजूटीचे काम अद्याप बाकी आहे असे सांगतो. या पिरॅमिडच्या पायथ्याशी असणारा MDCCLXXVI हा रोमन क्रमांक १७७६ हे वर्ष दर्शवतो. १७७६ मध्ये अमेरिकेच्या "डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडस"वर शिक्कामोर्तब झाले होते. Novus Ordo Seclorum या वाक्यरचनेचा अर्थ आहे "नव्या युगाची व्यवस्था" कारण ते १७७६ सालापासून सुरू झाले असे गणले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रहस्य, गुपिते, थरार यांचे मानवी मनाला अनादी कालापासून आकर्षण आहे. दंतकथा या सत्यापेक्षा अधिक आकर्षक असतात आणि लोकांच्या मनात घर करून राहतात. त्या सर्वस्वी खऱ्या असतीलच असे नाही पण तथ्यांश नक्कीच असू शकतो. आपल्याला विश्वासाचा कोणता धागा पकडून पुढे जायचे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, इतरांपेक्षा आपल्याला काकणभर अधिक ज्ञान आहे, वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहित आहेत आणि आपण त्या इतरांपासून सुरक्षित ठेवू शकतो ही भावना माणसाला लहानपणापासूनच सुखावत असते. इतिहासात अनेकदा अशा गुप्तसंस्थांचा उल्लेख आढळतो. प्रायॉरी ऑफ झायन नावाची राजवंशाचे किंवा येशूच्या वंशाचे पुरावे जपून ठेवणारी आणि त्यांना संरक्षण देणारी गुप्तसंथा, भक्त आणि श्रद्धाळूंच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेली नाइट टेंप्लार ही संघटना, रहस्यांचे राखण करून राजकारणात आपला ठसा उमटवणारी फ्रीमेसन्स ही संघटना आणि यापेक्षा थोड्या वेगळ्या गुन्हेगारी वाटेने जाणाऱ्या असॅसीन किंवा हश्शाशीन ही हशीशाच्या अंमलाखाली सदस्यांकडून गुन्हे करवून घेणारी संघटना आणि खुद्द भारतातील ठग या नावाने प्रसिद्ध पावलेली गुन्हेगारी संघटना अशा अनेक गुप्त संघटना जगाच्या इतिहासात कार्यरत असल्याचे आढळून येते. या संघटनांत सामील होण्यासाठी लागणारी सदस्य पात्रता, त्यांचे शपथविधी, गुप्त ठिकाणी गुप्ततेत पार पाडले जाणारे विधी, त्यांची कार्यपद्धती या सर्वांनी समाजाला वर्षानुवर्षे भुऱळ पाडली आहे. डॅन ब्राऊनची नवी कादंबरी लवकरच येत आहे आणि ती सुलेमान राजाने बांधलेले प्राचीन मंदिर आणि फ्रीमेसन्स या गुप्तसंस्थेवर आधारित आहे. त्या कादंबरीच्या निमित्ताने फ्रीमेसनरीवर पुनश्च चर्चा सुरू होईल. नवी माहिती बाहेर येईल. नवी संशोधने केली जातील. तूर्तास, ही संस्था अद्यापही जगभरात कार्यरत आहे आणि अमेरिकेचे अनेक राष्ट्राध्यक्ष फ्रीमेसन्स होते एवढे सत्य एक डॉलरच्या नोटेवरच्या या चिन्हामागील रहस्याचे गूढ कायम राखण्यास पुरेसे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;--------------------------------------------------------------------------------&lt;br /&gt;लेखासाठी वापरलेली सर्व चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत.&lt;br /&gt;संदर्भः &lt;br /&gt;डोन्ट नो मच अबाऊट मायथॉलॉजी - केनेथ डेविस &lt;br /&gt;एंजल्स अँड डिमन्स - डॅन ब्राऊन &lt;br /&gt;सीक्रेट्स ऑफ फ्रीमेसनरी - डिस्कवरी चॅनेलवरील माहितीपट &lt;br /&gt;&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Freemasonry"&gt;फ्रीमेसनरी - विकिपीडिया &lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/United_States_one-dollar_bill"&gt;एक डॉलरचे अमेरिकन बिल&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-2736318711444464655?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/2736318711444464655/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=2736318711444464655' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2736318711444464655'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2736318711444464655'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2009/09/blog-post.html' title='एक डॉलरचे रहस्य'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-8466413708788895337</id><published>2009-04-20T05:34:00.000-07:00</published><updated>2009-04-20T05:35:18.272-07:00</updated><title type='text'>जपून! ते लक्ष ठेवून आहेत</title><content type='html'>Seeing this obscene thing is a shock; what is worse is seeing people passing to and fro beneath it, intent on either plotting their day's business or planning their evening's pleasure; they pass to and fro and do not look up.&lt;br /&gt;&lt;br /&gt;None of them look up.&lt;br /&gt;&lt;br /&gt;I hear him say it again: We don't see them... but they see us.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: right"&gt;- Stephen King&lt;br /&gt;Nightmares in the sky&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुप्रसिद्ध भयकथा लेखक स्टीफन किंग यालाही अंगावर शहारे आणणारे असे काही अस्तित्वात आहे ही कल्पनाच मोठी रोचक आहे. वर उद्धृत केलेली वाक्ये स्टीफन किंगच्या एखाद्या प्रसिद्ध कादंबरीतील नसून एका विशिष्ट प्रकारच्या शिल्पकलेवरील चित्रांच्या पुस्तकासाठी किंग यांनी केलेले हे भाष्य आहे. मध्ययुगात प्रामुख्याने प्रसिद्ध झालेल्या परंतु पुरातन काळापासून सर्व संस्कृतीत चालत आलेल्या या शिल्पकलेला ढोबळमानाने गर्गॉयल्स&lt;sup&gt;१&lt;/sup&gt; , ग्रोटेस्क&lt;sup&gt;२&lt;/sup&gt; अशा नावांनी संबोधले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;गरगॉयल म्हणजे काय?&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर गरगॉयल म्हणजे इमारतींवरील पाणी वाहून नेणारी आणि त्याचा निचरा करणारी नळकांडी. याला इंग्रजीत "गटर" असा शब्द आहे. ही प्रामुख्याने इमारतींच्या माथ्यावर स्थित असून नळकांड्याच्या तोटीला एखादा भयप्रद चेहरा किंवा अर्धपशूमानवी आकृतीचे शिल्प असते. यांचा मुख्य उपयोग इमारतीच्या भिंती आणि वास्तुचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करून हे पाणी इमारतीपासून थोड्या दूर अंतरावर फेकणे हा असतो. आपल्याकडेही थोडेफार यासाठीच परंतु वेगळ्या वापरासाठी देवळांमध्ये गोमुखे दिसतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: left; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img height="300" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/c/c4/Gargoyle%2C_Dornoch_Cathedral.jpg" width="260" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;चित्र १: पाणी ओकणारे गरगॉयल&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गरगॉयल या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे "गार्गल" या शब्दावरून. घशातून गुळण्यांसारखे आवाज करत पाणी ओकणार्‍या या शिल्पांना गरगॉयल हा ध्वन्यानुसारी शब्द अगदी चपखल बसतो. अशाचप्रकारे, इमारतींवर स्थित चमत्कृतीपूर्ण परंतु पाण्याचा निचरा न करणार्‍या शिल्पांना ग्रोटेस्क, दोन किंवा अधिक प्राण्यांच्या संकराने तयार होणारे "कायमेरा" अशा अनेक प्रकारांनी संबोधले जाते. ही शिल्पे इमारतींचे कळस, प्रवेशद्वारे, खांब, कमानी यांवर स्थित दिसतात. कायमेरा, ग्रोटेस्क आणि गरगॉयल्स यांच्यात मूलभूत फरक असला तरी प्रामुख्याने ही शिल्पे गरगॉयल्स या नावाने अनेक माध्यमांतून प्रसिद्ध असल्याने लेखाच्या सुटसुटीतपणासाठी गरगॉयल असाच शब्द यापुढे वापरला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गरगॉयल, ग्रोटेस्क आणि याप्रकारची शिल्पे अस्तित्वात कशी आली असावीत याचा विचार करता अनेक संस्कृतींमध्ये समान आढळणारी आणि प्राचीन काळापासून चालत आलेली काही उदाहरणे येथे देता येतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माणसाला अनादी काळापासून त्याच्या आसपास वावरणारे प्राणी आणि त्यांच्या वर्तणूकीविषयी कमालीचे कुतूहल वाटत आले आहे. वाघाचे शौर्य, घारीची नजर, गरुडाची झेप, कोल्ह्याचे चातुर्य, लांडग्याचा लबाडपणा, सशाचे भित्रेपण यासर्वांमधून मानवी स्वभावाचे विशेष प्राण्यांना चिकटवलेले आढळतील आणि प्राण्यांचे विशेष मानवी स्वभावात उतरतात हे दर्शवलेले आढळेल. पक्ष्यांची आभाळातील भरारी पाहून माणसालाही आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पडले असावे ही गोष्ट जितकी सत्य आहे त्याचबरोबर, मनुष्य आणि प्राणी यांच्या संकराने चमत्कृतीपूर्ण अशी अर्धपशूमानवी व्यक्ती आणि शक्ती निर्माण करण्याचा मानवाचा मानसही पुरातन काळापासून स्पष्ट आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही पुरातन संस्कृतींचा विचार करता, ग्रीक संस्कृतीतील मिनोटॉर हा राक्षस, सापांचे केस डोक्यावर बाळगणारी मेड्युसा, भारतीय संस्कृतीतील हत्तीचे डोके चिकटवलेला गणपती, बोकडाचे डोके लावलेला दक्षराज, घोड्यांची तोंडे असणारे गंधर्व, शंकराचा नंदी, इजिप्शीयन संस्कृतीमधील कोल्ह्याचे तोंड चिकटवलेला मृत्युदेव अनुबीस, पक्ष्याचे डोके असणारा थॉथ आणि परिकथांतून समोर येणार्‍या मत्स्यकन्या, घोड्याचे धड असणारे धनुर्धर सेंटॉर, पंखधारी पर्‍या वगैरे या अर्धपशूमानवी गटात मोडतील. अगदी अर्वाचीन काळातही वटवाघळांसारखे पंख लावून फिरणारा बॅटमॅन, मनगटातून कोळ्याची जाळी काढणारा स्पायडरमॅन हे साय-फाय नायकही प्राण्यांचे गुणधर्म मानवी जीवनात अंतर्भूत करताना दिसतात आणि याच पार्श्वभूमीवर कुठेतरी चमत्कृतीपूर्ण गरगॉयल्सचीही भेट घडते. इमारतींच्या कळसांवरून तुमच्याकडे ते सतत पाहात असतात. नजर ठेवून असतात, तुमच्या लक्षात ते येवो किंवा न येवो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 0.5%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img height="270" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/e4/Notre_dame-paris-view.jpg" width="300" align="right" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;चित्र २: पॅरिसमधील सुप्रसिद्ध नोत्र दाम चर्चवरील ग्रोटेस्क&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एखाद्या जुन्या गॉथिक किंवा रोमन बांधणीच्या इमारतींवर भयप्रद किंवा हिंस्त्र चेहरे, अर्धपशूमानवी मुखवटे आणि शरीरे, आक्रमक आविर्भावातील पशू यांची शिल्पे तुमच्या पाहण्यात आली असावीत. युरोपमधील ऐतिहासिक इमारती, चर्चेस, न्यूयॉर्क, बॉस्टन, फिलाडेल्फिया, मुंबई अशा अनेक ठिकाणी अशी शिल्पे तुमच्या नजरेस पडतील. पडली नसतील, तर पाहून घ्या, आढळतील हे निश्चित. आकाशातून उंचावरून आपल्याकडे अशा हिडीस आकृत्या पाहात आहेत ही कल्पना मनाला हुरहुर लावणारी नक्कीच ठरावी. हॅलोवीनच्या सुमारास बाजारातही गरगॉयल्सच्या चमत्कारिक प्रतिकृती विकायला ठेवलेल्या आढळतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पशूंच्या आणि अर्धपशूमानवांच्या चमत्कृतीपूर्ण शिल्पांबरोबरच संपूर्ण मानवी परंतु हिडीस आणि भयप्रद स्वरूपातील गरगॉयल्सही अनेकदा इमारतींवर पाहण्यास मिळतात. एखाद्या रोमन किंवा गॉथिक बांधणीच्या इमारतींच्या कमानींवरील किंवा प्रवेशद्वारांवरील की-स्टोन्सवर असे हिडीस चेहरे सहज दृष्टीस पडतील. अशा भयप्रद चेहर्‍यांमुळे अनेकांना हे गरगॉयल्स एखाद्या सैतानी करणीचे, दुष्ट प्रवृत्तींचे प्रतिनिधी वाटतात आणि गरगॉयल्सच्या गूढपणात भर पडते. काहीजणांच्या मते वास्तुकडे सैतानी प्रवृत्तींची नजर पडू नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी ही शिल्पे कोरलेली असतात तर काहींच्या मते शत्रूची मुंडकी प्रवेशद्वारांवर लावून विजय साजरा केला जातो. या ठिकाणी शौर्यवान विजेता राहतो असे सांगण्याची ही पद्धत असावी, इमारतीच्या मालकांचा किंवा त्यांच्या विजयांचा संबंध या शिरांशी जोडता येतो असे काहींना वाटते. भारतातही शत्रूचे शीर तोडून ते वेशीवर, किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जनतेला दिसावे असे ठेवले जाण्याची प्रथा होती तसेच काहीसे. काही तज्ज्ञांच्या मते हल्लीच्या काळात जसे एखाद्या चेहर्‍याचे व्यंगचित्र करण्याची पद्धत आहे त्याप्रमाणेच मध्ययुगात एखादा चेहरा अशा स्वरूपात लावण्याची पद्धत असावी. त्यात भयरसाची निर्मिती नसून केवळ विनोदनिर्मितीसाठी ही शिल्पे कोरली जात असावीत. कारणे काहीही असली तरी ही शिल्पे पाहून अंगावर शहारा आल्यास किंवा भीतीची भावना मनाला चाटून गेल्यास नवल नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="MARGIN-LEFT: 40px"&gt;&lt;div style="MARGIN-LEFT: 40px"&gt;&lt;div style="MARGIN-LEFT: 40px"&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img alt="" src="http://www.frightcatalog.com/i/360x360/1007003.jpg" align="center" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;चित्र ३: हॅलोवीनच्या सुमारास अशी गरगॉयल्स बाजारात विकायला ठेवलेली आढळतात.&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गरगॉयल्सची शिल्पकला मध्ययुगात प्रसिद्ध झाली असली तरी प्राचीन काळीही अशाप्रकारच्या शिल्पांचा आणि चित्रांचा वापर होत असे हे जाणवते. पुरातन इजिप्शियन स्थापत्त्यशास्त्रातील स्फिन्क्स, ग्रीक मडक्यांवर आढळणारे अर्धपशूमानव या सारख्या शिल्प आणि चित्रांना सुमारे ३-४ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. इजिप्शियन स्फिन्क्सला ग्रीकांनी आपली पौराणिक कथा जोडून भयनिर्मितीचा प्रयत्न केलेला आहे असे सांगितले जाते. एक आद्य गरगॉयल म्हणून याकडे पाहता यावे. याचप्रमाणे जुन्या काळातील उत्कृष्ट गरगॉयल कोणते यावर अनेक तज्ज्ञांचे एकमत होते ते म्हणजे अथीनाच्या ढालीवर असणारे मेड्युसाचे शीर. ग्रीक पुराणांत मेड्युसा या राक्षसीला गॉर्गॉन असे म्हटले गेले आहे. &lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img height="270" alt="" src="http://farm1.static.flickr.com/195/453105941_e1c0c095a7.jpg" width="300" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;चित्र ४: पार्थेनॉनची प्रतिकृती असलेल्या नॅशविलमधील अथीनाची ढाल येथे पाहता येईल.&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;गॉरगॉन या शब्दाचा अर्थ "घशांतून मोठ्याने आवाज काढणारे &lt;span style="color:#999999;"&gt;(डरकाळ्या फोडणारे) &lt;/span&gt;" असा होतो. प्राचीन ग्रीक संस्कृतीत दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावण्यासाठी अशा शिरांचा वापर केला जाई. कपडे, चिलखते, ढाली, घरे, भिंती वगैरेंवर गॉरगॉनचे शीर रंगवलेले किंवा कोरलेले आढळत असे. अलेक्झांडर द ग्रेटच्या चिलखतावरही मेड्युसाचे शीर विराजमान असल्याचे पॉम्पै येथील कलाकृतीवरून कळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;येथे एक गंमतीदार गोष्ट आठवते ती म्हणजे मेड्युसा ही पूर्वी अतिशय रूपवान होती. तिच्यावर रागावलेल्या अथीनाने तिला शाप दिल्यावर मेड्युसा भयंकर दिसू लागली. तिचे लांबसडक केस विषारी सापांत बदलले. ती इतकी हिडीस दिसू लागली की तिला पाहून भीतीने थरथरणार्‍या मनुष्याचे रुपांतर दगडात होई, म्हणजेच भीतीने आक्रसून घेतलेल्या किंवा वेडावाकडा चेहरा झालेले एक नवे गरगॉयल अस्तित्वात येई.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाश्चात्य जगतातून सरकून भारताकडे नजर टाकल्यास भारतीय स्थापत्यशास्त्राला हजारो वर्षांचा इतिहास आहे हे लक्षात येते. परकीय आक्रमणे, कलेवरील परकीय प्रभाव या सर्वातून भारतीय कला फुललेली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;strong&gt;भारतातील गरगॉयल्स&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;मुंबईत असताना छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारती समोरून तुम्ही अनेकदा गेला असाल तर वरील गरगॉयल्स तुमच्या पाहण्यात आली असतील. असे नसल्यास, यानंतर कधी जाणे झाले तर या स्थापत्यशास्त्राच्या उत्कृष्ट नमुन्यासमोर काही काळ अवश्य रेंगाळा. सुबक आणि घाटीव गरगॉयल्स इमारतीच्या माथ्यावरून तुमच्याकडेच रोखून पाहात आहेत याची प्रचीती येईल. तेथून पुढे फोर्ट विभागातील जुन्या इमारतींकडेही बघा, तिथेही गरगॉयल्स सापडण्याची शक्यता आहेच. बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजमहालावरही अशाच प्रकारचे गरगॉयल्स आहेत अशी बातमी नुकतीच एका मित्रांशी बोलताना कळली. अर्थातच, हे पाश्चात्य स्थापत्यशास्त्राचे नमुने आहेत. लक्ष्मी विलास राजवाडा हा संपूर्ण पाश्चात्य धर्तीचा नसला तरी त्यावर काही पाश्चात्य धाटणीचे सोपस्कार पार पडले असावेत असे वाटते. यामुळेच अस्सल भारतीय स्थापत्यशास्त्रातील गरगॉयल्स म्हणून यांची गणना करता येणार नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतातही गरगॉयलसारखी शिल्पे कोरली जात का? या प्रश्नाचे उत्तर "होय" आहे. गोमुख हे सर्वार्थाने योग्य गरगॉयल मानले तरी गरगॉयल या शब्दाचा हेतू ज्याप्रमाणे बदलला आहे त्या सदृश भय उत्पन्न करणारी शिल्पेही भारतात आढळतात. भारतातील कोरीवकामाने मढवलेल्या कोणत्याही मंदिरांकडे पाहिले तर अशा गरगॉयल सदृश मूर्ती सहज दिसून येतील. या ठिकाणी चटकन आठवलेले दोन शिल्प प्रकार म्हणजे दक्षिण भारतातील मंदिरांत आढळणारे याली आणि भारतभर सर्वत्र सहज आढळणारे कीर्तिमुख यांची माहिती पुढे दिली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;शरभेश्वर (सरभ/ याली)&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुराणांतून पुढील कथा सांगितली जाते ती अशी, हिरण्यकश्यपूचा नायनाट झाल्यावरही विष्णूने घेतलेल्या नरसिंहावताराचा राग शांत होईना. नरसिंहावताराच्या रागाचा त्रास संपूर्ण जगाला होऊ लागला तेव्हा त्याचा नि:पात करण्यासाठी शिवाने सिंह, गरूड आणि मानव यांच्या संकराने बनलेला शरभेश्वर अवतार धारण केला आणि नरसिंहाशी घनघोर युद्ध केले. काही काळाने नरसिंहाला शरभेश्वराचे खरे स्वरूप कळले आणि त्याचा राग शांत झाला आणि तो शरभेश्वराचा परमभक्त बनला. यापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारे, शरभ उपनिषदात शरभाने नरसिंहाला मारून टाकले असा उल्लेख येतो. &lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img alt="" src="http://www.mysoresandal.co.in/gifs/sharabha12.gif" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;चित्र ५: मैसूर सँडल सोपचे बोधचिन्ह असणारा शरभेश्वर&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दक्षिण भारतात मंदिरांच्या खांबावर सिंह, गरूड यांच्या संकराने बनलेला अर्धपशूमानव कोरण्याची प्रथा मध्यकाळापासून प्रसिद्ध आहे. याला "याली" असे म्हटले जाते. भारतात इतरत्रही हे याली, शरभेश्वर किंवा सरभ या नावाने प्रसिद्ध आहेत. मंदिरांचे संरक्षण करणार्‍या देवता म्हणून त्यांना खांबावर कोरले जाते. सिंह-गरूड आणि मानव यांच्या संकराने दर्शवलेले पर्शियन सम्राट दरायसचे (दर्युश) चित्र, बॅबिलॉनचे पंखधारी सिंह आणि सुप्रसिद्ध इजिप्शियन स्फिन्क्स हे सर्व शरभेश्वराविषयी लिहिताना नजरेआड करवत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवाळीच्या दिवसांत उटण्यासारखा साबण म्हणून ज्या मैसूर सँडल सोपचा वापर केला जातो त्याचे बोधचिन्ह शरभेश्वर आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img alt="" src="http://www.art-and-archaeology.com/india/madurai/d20736.jpg" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;चित्र ६: मदुराईमधील मंदिराच्या खांबावर कोरलेला याली&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;कीर्तिमुख&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मध्यंतरी बिल मॉयर्स या प्रसिद्ध अमेरिकन पत्रकाराने जोसेफ कॅम्पबेल यांच्या घेतलेल्या मुलाखतींचे संकलन वाचताना शिवपुराणातील एक गोष्ट आढळली. ती काहीशी अशी -&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोण्या एका बलाढ्य राक्षसाने देवांचा पराभव करून स्वर्गावर आपले राज्य स्थापन केले आणि तेथून तो तडक कैलासावर पोहोचला आणि विजयोन्मादाच्या भरात त्याने शिवाकडे पार्वतीची मागणी केली. संतप्त शिवाने आपले तिसरे नेत्र उघडले आणि त्यातून विजेचा लोळ बाहेर पडला. त्या लोळातून पहिल्या राक्षसापेक्षाही बलवान आणि भयंकर असा दुसरा राक्षस निर्माण झाला. सिंहाचे डोके, त्यावर लांबलचक जटाधारी केस, प्रचंड शरीर असणार्‍या या राक्षसाची निर्मिती शिवाने पहिल्या राक्षसाला खाऊन टाकण्यासाठी केली होती. या राक्षसाला पाहून पहिला राक्षस थरथरा कापू लागला आणि शिवाकडे क्षमायाचना करू लागला. भोळ्या शिवाला याचनेचा अव्हेर करता येईना आणि त्याने या पहिल्या राक्षसाला क्षमा केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता दुसर्‍या राक्षसाने शिवाला विचारले, "माझी निर्मिती या पहिल्या राक्षसाला खाण्यासाठी तुम्ही केलीत. मी प्रचंड भुकेला आहे. आता मी कोणाला खाऊ?" शिवाने उत्तरात म्हटले, "असं कर. तू स्वतःलाच खा." शिवाची आज्ञा शिरसावंद्य मानून या राक्षसाने प्रथम आपले पाय खाण्यास सुरूवात केली. मग पोट खाल्ले. नंतर हात खाल्ले, छाती, मान खाल्ली आणि असे करता करता केवळ डोके शिल्लक राहिले. राक्षसाच्या या आज्ञाधारकतेवर प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला तेथेच थांबवले आणि वर दिला, तो असा, "यापुढे तुला जग कीर्तिमुख म्हणून ओळखेल. माझ्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुझी स्थापना होईल. तुझ्यासमोर वाकल्याखेरीज माझे दर्शन लोकांना होणार नाही, त्यांना पुण्य प्राप्त होणार नाही."&lt;br /&gt;&lt;br /&gt;कीर्तिमुखांची कथा पद्मपुराणातही आढळते परंतु त्यात थोडाफार बदल दिसतो. तो काहीसा असा, कीर्तिमुख हा शंकराच्या जटेतून निघालेला एक शिवगण. याला तीन तोंडे, तीन पाय, तीन शेपट्या आणि सात हात होते. शंकराच्या आज्ञेवरून याने प्रेत खाऊन दाखवले. त्याचे साहस पाहून शंकराने वर दिला की, 'तुझे स्मरण केल्याशिवाय माझे दर्शन करणार्‍याचा अध:पात होईल.' &lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img height="160" alt="sangameshwar - dhruv" src="http://farm4.static.flickr.com/3547/3443144890_a7c95217a3_m.jpg" width="240" /&gt;" &lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;चित्र ७: संगमेश्वर मंदिरातील कीर्तिमुख&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शंकराच्या शिवगणाची ही गोष्ट खरी मानली तरी विष्णूमंदिरातदेखील ही कीर्तिमुखे सहज दिसून येतात. वेंकटेश्वर बालाजीच्या मूर्तीवरही हे कीर्तिमुख दिसते. महाराष्ट्रातील काही शिवमंदिरांतील कीर्तिमुखे उपक्रमावरील ध्रुव या प्रकाशचित्रकारांनी मला वापरण्यासाठी दिली होती ती येथे लावत आहे. भयंकर चेहर्‍यांच्या या राक्षसांचे देवाच्या मंदिरांत स्थान गॅरगॉयल (ग्रोटेस्क) सदृशच असावे हा कयास येथे मांडता येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ध्रुवने दिलेले कीर्तिमुखांचे काही फोटो येथे लावत आहे. फोटो काढण्यादरम्यान ध्रुवने निरीक्षण केले त्यात महाराष्ट्रात कीर्तिमुखे केवळ प्रवेशद्वारे किंवा कमानींवर न दिसता गर्भगृहाकडे जाणार्‍या पायर्‍यांवर, विशेषतः सर्वात वरच्या पायरीवरही दिसून येतात. वाचक्नवींनी पुरवलेल्या माहितीनुसार प्राचीन संस्कृतीत सिंह हे सामर्थ्याचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे राजद्वारावर, राजाच्या आसनावर, मंदिरात गाभार्‍याच्या दरवाज्यावर, देवाच्या प्रभावळीत, उंबर्‍यावर अथवा शिखरापासी एक विक्राळ सिंहमुख(कीर्तिमुख) कोरलेले असते. अशी आकृती असलेले भवन सुरक्षित राहते अशी भावना असते. जैन आणि बौद्ध संस्कृतीतही अशाप्रकारे कीर्तिमुखे कोरण्याची प्रथा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img alt="" src="http://farm4.static.flickr.com/3402/3443144914_3509d52276.jpg" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;चित्र ८: वाटेश्वर मंदिरातील एक ग्रोटेस्क&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जगातील विविध संस्कृतींची तुलना करत गेल्यास त्यांच्यातील साम्यस्थळे आश्चर्यचकीत करतात. गरगॉयल्स, ग्रोटेस्क, कायमेरा, स्फिन्क्स, याली, कीर्तिमुखे ही एकमेकांशी सांस्कृतिक दुव्यांतून बांधली गेली असावीत का? या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणारा अभ्यासक "होय" असेच देईल. ड्रॅगनसदृश प्राणी किंवा भयंकर दिसणारे डायनॅसोर, काळाच्या ओघात नष्ट पावलेले काही प्रचंड आकारांचे जीव हे तर या गरगॉयल्समागील प्रेरणा नसावेत. विषयाचा आणि या शिल्पांचा आवाका बराच मोठा आहे. या लेखातून या विविध शिल्पांना केवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या शांत संध्याकाळी वेळ काढून या गरगॉयल्सकडे अवश्य नजर टाका, तेही तुमच्याकडे इमारतींच्या छतांवरून कुतूहलाने पाहतील याबाबत शंका नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img height="479" alt="grotesque - dhruv" src="http://farm4.static.flickr.com/3621/3443150020_32a7206c33_o.jpg" width="720" /&gt; चित्र ९: महाराष्ट्रातील एक ग्रोटेस्क&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;hr /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तळटीपा: &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;sup&gt;१&lt;/sup&gt; उपक्रमावरील टंकात ग्यर्गॉयल या उच्चारात शब्द लिहिणे कठिण वाटल्याने सुटसुटीत गरगॉयल या शब्दाचा वापर लेखात केला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;sup&gt;२&lt;/sup&gt; ग्रोटेस्क या शब्दाचे मूळ ग्रोट्टो या शब्दात दडलेले आहे. अधिक माहिती &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Grotto"&gt;येथे &lt;/a&gt;मिळेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;संदर्भ, अधिक माहिती, पूरक वाचनः&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ol&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;&lt;a href="http://books.google.com/books?id=KH-bW3iKWuYC"&gt;गरगॉयल्स&lt;/a&gt;&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;&lt;a href="http://www.amazon.com/Nightmares-Sky-Grotesques-Stephen-King/dp/0670823074"&gt;नाईटमेअर्स इन द स्काय : स्टिफन किंग&lt;/a&gt;&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;&lt;a href="http://northstargallery.com/gargoyles/aboutgargoyles.htm"&gt;अबाऊट गरगॉयल्स&lt;/a&gt;&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;&lt;a href="http://www.celextel.org/108upanishads/sarabha.html"&gt;शरभ उपनिषद&lt;/a&gt;&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;&lt;a href="http://kirtimukha.com/devilsMask.htm"&gt;कीर्तिमुख&lt;/a&gt;&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;&lt;a href="http://www.amazon.com/Joseph-Campbell-Power-Myth-III/dp/B00005MEVQ"&gt;जोसेफ कॅम्पबेल अँड पावर ऑफ मिथ&lt;/a&gt;&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;याखेरीज, विकिपिडीयावर अनेक संदर्भ वाचनास मिळतील.&lt;br /&gt;&lt;/ol&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आभारः&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;कीर्तिमुखांच्या चित्रांसाठी ध्रुवची आभारी आहे. संदर्भांसाठी चित्राची आभारी आहे. इतर अनेक सुचवण्यांसाठी धनंजय, वाचक्नवी, विसुनाना, तो, चित्तरंजन यांची आभारी आहे. ही सर्व मंडळी &lt;a href="http://mr.upakram.org/"&gt;उपक्रम.ऑर्ग&lt;/a&gt; या संकेतस्थळाचे सदस्य आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;चित्रे: &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ol&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;चित्र १ आणि चित्र २ ही विकिपिडीयावरून घेतलेली असून चित्र ३ www.frightcatalog.com येथून घेतले आहे. &lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;चित्र क्र. ५ www.mysoresandal.co.in येथून घेतले आहे.&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;चित्र क्र. ६ www.art-and-archaeology.com येथून घेतले आहे.&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;ध्रुवची चित्रे त्याच्या परवानगीने लावली आहेत.&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;/ol&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-8466413708788895337?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/8466413708788895337/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=8466413708788895337' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/8466413708788895337'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/8466413708788895337'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2009/04/blog-post.html' title='जपून! ते लक्ष ठेवून आहेत'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://farm1.static.flickr.com/195/453105941_e1c0c095a7_t.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-4250355325572694122</id><published>2008-11-24T03:04:00.000-08:00</published><updated>2008-11-24T03:53:16.071-08:00</updated><title type='text'>महाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे</title><content type='html'>प्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत (इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. गुप्त कालापासून आजतागायत भारतातील विविध प्रांतात विविध धाटणीची देवळे उभी राहिल्याचे दिसून येते. स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या देवळांच्या बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. स्थापत्यशास्त्राचे हे पुरावे तत्कालीन संस्कृतीची ओळख आणि माहिती करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खजुराहो, कोणार्क, हम्पी आणि चालुक्यांची बदामी येथील मंदिरे त्यांच्या स्थापत्य आणि शिल्पकामांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत आणि पर्यटनस्थळेही गणली जातात।&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्रातही अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकामाने सजवलेली प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहेत याची माहिती अनेकांना नसते. महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने सजवलेली जी देवळे दिसतात ती बरेचदा हेमाडपंती या नावाने ओळखली जातात. वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर इत्यादी. हेमाडपंती पद्धतीत थोडा बदल करून सासवडचा संगमेश्वर व वटेश्वर, धावडशी येथील परशुरामाचे आणि पालीचे खंडोबाचे देऊळ इ. मंदिरे बांधली आहेत. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांत हेमाडपंती मंदिरे आहेत. हयहैय, यादव, चालुक्य हे त&lt;br /&gt;त्कालीन राजे शिवभक्त असल्याने महाराष्ट्रात हेमाडपंती बांधणीची शिवमंदिरे प्रामुख्याने दिसतात.&lt;img height="160" alt="sangameshwar" src="http://farm4.static.flickr.com/3253/2817498394_9b9522e5fb_m.jpg" width="240" align="right" border="2" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला आणि पटईची छते या मंदिरांना एक आगळे रूप प्रदान करतात. या मंदिरांची बांधकामे यादव काळात सुरू झाली असावी असा सर्वसाधारण समज दिसतो. तज्ज्ञांच्या मते यादव काळापूर्वीही अनेक वर्षे असे बांधकाम झाल्याचे आढळते. उत्तरेत कोरड्या बांधकामाची मंदिरे बांधण्याची प्रथा पूर्वापार होती आणि बदामीच्या चालुक्यांच्या काळातही अशी मंदिरे बांधली गेल्याचे सांगितले जाते. पण हे बांधकाम फार मोठ्या प्रमाणात झालेले नसावे आणि महाराष्ट्रात त्याचा प्रसार झालेला नसावा असे मानले जाते. परंतु यादव काळात आणि त्या नंतर हेमाडपंती बांधकामाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याचे दिसते. याचे एक मुख्य कारण मूर्तिभंजक मुसलमानांचा महाराष्ट्राला होणारा उपद्रव हे असावे. हेमाडपंती मंदिरे पक्क्या बांधकामाची नसल्याने ही मंदिरे झटकन उभारणे शक्य होत असावे. अर्थातच, दर्जा भरून पक्के बांधकाम नसल्याने सद्यस्थितीत ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला नाही ती मोडकळीला आलेल्या अवस्थेत दिसतात. भूकंप, पूर, पावसाच्या मार्‍याने होणारी झीज, दगडांच्या भेगांतून पसरत जाणार्‍या झाडाझुडपांनी मंदिरांची दुर्दशा केली आहे.&lt;br /&gt;&lt;img height="240" alt="Amruteshwar" src="http://farm4.static.flickr.com/3133/2816661535_474650d8c7_m.jpg" width="194" align="left" border="2" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;यादव राजे कलाप्रेमी असल्याने हेमाडपंती धाटणीची अनेक मंदिरे या काळात निर्माण झाली. त्यांची धाटणी, शिल्पकाम, बांधकाम यांत कमालीचे साम्य आढळते आणि तरीही प्रत्येक मंदिराचे आपले स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य दिसून येते. या मंदिराचे स्थापत्यकार हेमाडपंत यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडे असले तरी या युगपुरुषाबद्दल फारशी माहिती महाराष्ट्राला नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;हेमाडपंत&lt;/span&gt; &lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हेमाडपंत हे हेमाद्री पंडित या नावानेही ओळखले जातात. हेमाडपंतांविषयी अनेक स्थानिक लोककथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक अशी:&lt;br /&gt;&lt;br /&gt;हेमाडपंतांच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या आईचा बाळंतपणात मृत्यू झाला. पोरका हेमाद्री अतिशय प्रतिभावान आणि विद्वान होता. त्याने भाषा आणि विविध शास्त्रांत प्रावीण्य प्राप्त केले. वैद्यकशास्त्रात त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता. असे सांगतात की रावणाचा भाऊ बिभीषण आजारी असताना हेमाद्रीने त्याची शुश्रूषा केली आणि त्याच्या बदल्यात प्रसन्न होऊन बिभीषणाने हेमाद्रीला वर मागण्यास सांगितले. लंकेच्या समृद्धीवर भाळलेल्या हेमाद्रीने लंकेसारखी मंदिरे राक्षसांकरवी आपल्या प्रदेशात बांधण्याचा वर मिळवला आणि बिभीषणाने तो आनंदाने देऊ केला. मात्र त्याने एक अट घातली. ती अशी की राक्षस फक्त एकच रात्र काम करतील. दर्जा भरून केलेले बांधकाम नसल्याने हेमाडपंतांनी एका रात्रीत सर्व मंदिरे उभी केली. या आख्यायिकेबरोबरच हेमाडपंत श्रीलंकेतून लिपी शिकून आल्याची दुसरी एक आख्यायिका ऐकायला मिळते. हीच लिपी मोडी म्हणून प्रसिद्ध झाल्याचे कळते. परंतु मोडी ही शिकस्ता या फारशी लिपीवरून अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाहही दिसतो।&lt;br /&gt;&lt;br /&gt;आख्यायिका बाजूला सारून ऐतिहासिक हेमाडपंतांचा शोध घेतला असता हेमाद्री पंडित हे यादवांच्या काळातील मुख्य प्रधान होते असे दिसून येते. यादव राजे महादेव (इ. स. १२६०-७०) आणि रामचंद्र (इ. स. १२७१-१३०९) यांच्या काळातील हे अतिशय विद्वान मंत्री असावेत. यादव साम्राज्याचे ते प्रधान, मुख्य सचिव असल्याने आणि याचबरोबर जमिनीची पाहणी करून महसूल ठरवणे, तो वसूल करणे, उत्पन्न ठरवणे इ. हेही करत असल्यामुळे त्यांना "श्रीकरणाधिप" (जमाबंदीचे प्रमुख) या पदवीनेही ओळखले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हेमाडपंतांचा जन्म द. कर्नाटकात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कामदेव होते. पुढे ते कर्नाटक सोडून महाराष्ट्रात स्थायिक झाल्याचे कळते. हेमाडपंत संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक तर होतेच, परंतु लेखक, कवी, स्थापत्यशास्त्रज्ञ आणि धन्वंतरीही होते. यादवांच्या दरबारातील एक विद्वान मुत्सद्दी म्हणून त्यांची गणना होते. धर्मशास्त्रावरील चर्तुर्वग चिंतामणी हा ग्रंथ, आयुर्वेदरसायन हे वाग्भटाच्या अष्टांगहृदय या ग्रंथावरील भाष्य, आणि इतरही अनेक साहित्यनिर्मिती त्यांनी केल्याचे सांगितले जाते. मराठी भाषेसाठी देवनागरीपूर्वी वापरण्यात येणार्‍या मोडी लिपीचा शोधही त्यांनी लावल्याचे सांगितले जाते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे व डॉ. भांडारकरांच्या मते ही लिपी हेमाडपंत श्रीलंकेतून घेऊन आल्याचे सांगितले जाते, परंतु इतर तज्ज्ञ ते ग्राह्य मानत नाहीत।&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्थापत्यशास्त्रात हेमाडपंतांनी चुना किंवा मातीचा दर्जा न भरता मध्यम आकाराचे दगड कापून, खालच्या दगडात खड्डा करून वरील दगडाची खुंटी एका विशिष्ट कोनात खालच्या दगडाच्या खड्ड्यात बसवून घडीव वास्तू बांधण्याची कलाही प्रसिद्ध केली. हे दगड तासून त्यावर कोरलेल्या शिल्पाकृती तत्कालीन संस्कृतीचे आणि कलाविष्काराचे उत्तम नमुने आहेत. थोड्याशा परावर्तित प्रकाशातही मंदिराच्या वास्तुयोजनेतील सौंदर्य कायम ठेवल्याचे दिसते आणि संपूर्ण वास्तूच्या उंचीचा किंवा वर झेपावत जाणार्‍या स्थापत्याच्या प्रभाव पडणे हे या मंदिर रचनांचे वैशिष्ट्य मानले जाते।&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा अनेक मंदिरांच्या निर्मितीमुळे यादव साम्राज्याच्या आधीही अस्तित्वात असणाऱ्या या स्थापत्यकलेला हेमाडपंतांच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. या शैलीचे प्रसिद्ध उदाहरण म्हणून वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचे नाव घेता येईल आणि हेमाडपंती स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून नाशिकजवळील गोन्देश्वर मंदिराचे नाव घेता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;घृष्णेश्वर मंदिर&lt;/span&gt; &lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;औरंगाबादजवळील दौलताबादेपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर असणारे घृष्णेश्वराचे शिवमंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांतील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग गणले जाते. लाल पाषाणात अप्रतिम कोरीव काम केलेले हे मूळ मंदिर पुरातन असून, सोळाव्या शतकात शिवाजीराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आणि त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याने ते अद्यापही चांगल्या अवस्थेत आहे.&lt;img height="240" alt="DSC_1253_resize" src="http://farm4.static.flickr.com/3059/2816646947_95c016ba61_m.jpg" width="159" align="right" border="2" /&gt;&lt;br /&gt;घृष्णेश्वराचे प्राचीन मंदिर कसे अस्तित्वात आले याबद्दलही अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार, घृष्मा (किंवा घृष्णा) नावाची एक शिवभक्त स्त्री दरदिवशी शिवलिंग बनवून नंतर ते भक्तिभावाने शिवतीर्थात विलीन करत असे. या बाईला घरात आपल्या सवतीकडून बराच जाच होता. एके दिवशी सवतीने घृष्मेच्या मुलाला कपटाने ठार केले. दु:खाने वेडीपिशी झालेली घृष्मा शिवतीर्थावर येऊन शंकराची पूजा करून आळवू लागली आणि त्याच शिवतीर्थातून तिचा मुलगा पुनर्जीवित होऊन परतला. यावेळेस शंकराने तिथे उपस्थितांना दर्शन दिले आणि गावकऱ्यांनी शंकराचे मंदिर त्या ठिकाणी बांधले, जे घृष्णेश्वराच्या नावाने प्रसिद्ध झाले।&lt;br /&gt;&lt;img height="159" alt="DSC_1256_resize" src="http://farm4.static.flickr.com/3158/2817498454_ff6dffd9ce_m.jpg" width="240" align="left" border="2" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे आढळून येतो. त्यानुसार ' श्री शके १६९१ विरोधी वत्सरी माघ सुरी नाग बुध दिनी होळकर कुलाल वाल कल्पवल्ली श्री अहिल्याबाईने श्री तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला असे श्रीरस्तू शिवमाकल्पं' हे कोरलेले आढळते. आज सुमारे एक एकर क्षेत्रफळात वसलेले हे मंदिर मालोजीराजे आणि अहिल्याबाईंनी केलेल्या जीर्णोद्धारामुळे सुस्थितीत आहे. मंदिराच्या चार दिशांना चार महादरवाजे असून चौरसाकृती शिवतीर्थासभोवती अष्टतीर्थांची आठ सुंदर आणि सुबक देवालये येथे आहेत. शिवमंदिराचे गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप असे तीन मुख्य भाग असून मंदिराचा आकाशाच्या दिशेने झेपावाणारा उंच कळस आणि त्यावरील अप्रतिम कोरीव काम लक्षवेधक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;गोन्देश्वर मंदिर&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;नाशिकपासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर सिन्नर येथील गोन्देश्वराचे मंदिर हा हेमाडपंती स्थापत्यकलेचा आणखी एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. मध्ययुगीन काळातील अतिशय सुंदर आणि सुबक कारागिरीचा आविष्कार म्हणून गोन्देश्वर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे असाही कयास बांधला जातो. महाराष्ट्रात आढळणार्‍या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणती होते.&lt;img class="transl_class" id="1166" height="180" src="http://farm4.static.flickr.com/3251/2867687184_914b853b14_m.jpg" width="240" align="right" border="2" /&gt;&lt;br /&gt;या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची वास्तू पायर्‍या पायर्‍यांनी बनलेल्या १२५ फूट x ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे मंदिर इतर हेमाडपंती मंदिरांपेक्षा किंचित वेगळे असून उत्तरेकडील नागरी मंदिरांची झाक त्यावर दिसते. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोन्देश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. इतर मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर थोडे उंचावर असून मंदिराचे सभामंडप आणि गर्भगृह असे भाग आहेत. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पट्टईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्‍या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते।&lt;br /&gt;&lt;br /&gt;नैसर्गिक उत्पात आणि मानवी औदासिन्यातून टिकून राहिलेली ही मंदिरे काही स्थानिकांच्या आस्थेतून अद्याप सुस्थितीत आहेत. कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा असल्याचे ध्यानात आल्यावर पुरातत्त्वखात्यानेही या मंदिरांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. शासनाने या स्थळांचा पर्यटन विकास केल्यास आणि स्थानिकांनी योग्य काळजी घेतल्यास सर्वांच्या अथक प्रयत्नांतून आणि श्रद्धेतून महाराष्ट्राला हेमाडपंतांनी दिलेला हा वैभवशाली वारसा टिकून राहील याची खात्री वाटते।&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आभार:&lt;/strong&gt; या लेखाला माहितीचा हातभार लावण्याबद्दल चित्तरंजन भट आणि शुद्ध मराठी यांची आभारी आहे. संगमेश्वर, अमृतेश्वर आणि घृष्णेश्वर मंदिरांची प्रकाशचित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल ध्रुव मुळे यांची आणि गोन्देश्वर मंदिराचे प्रकाशचित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल पराग पुरंदरे यांची अतिशय आभारी आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-4250355325572694122?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/4250355325572694122/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=4250355325572694122' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/4250355325572694122'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/4250355325572694122'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2008/11/blog-post.html' title='महाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://farm4.static.flickr.com/3253/2817498394_9b9522e5fb_t.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-2136048138799865302</id><published>2008-05-22T04:04:00.000-07:00</published><updated>2008-05-22T04:05:03.486-07:00</updated><title type='text'>भारताचे अटलांटिस</title><content type='html'>अटलांटिस या समुद्रात लुप्त झालेल्या दंतकथेतील प्रसिद्ध बेटाचा परिचय अनेकांना आहे. अटलांटिसबद्दल ठोस माहिती देणारा उल्लेख ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने केल्याचे आढळते. अटलांटिसच्या राज्यात अनेक सुंदर इमारती, मंदिरे उभी होती. त्यातील काही सोन्या-चांदीने मढवलेली होती. राज्यात सुबत्ता नांदत होती. लोक सुसंस्कृत आणि कलाप्रेमी होते. लाखोंचे सैन्य आणि सुसज्ज आरमार बाळगणार्‍या या प्रगत राज्याने अथेन्सवर हल्ले केल्याचे प्लेटो सांगतो परंतु अचानक एका दिवस-रात्रीत होत्याचे नव्हते होऊन अटलांटिस समुद्राच्या पोटात गडप झाल्याची नोंद येते. अटलांटिस हे खरेच राज्य होते की प्लेटोच्या सुपीक डोक्यातून निर्माण झालेली ती एक रम्य कल्पना होती याबाबत कोणी पुरावा देऊ शकत नाही. प्लेटोखेरीज अन्य कोणत्याही पुरातन नोंदीत किंवा ग्रीक दंतकथांत अटलांटिसचा उल्लेख सापडत नाही आणि अटलांटिस असे अचानक गडप होण्याचे नेमके कारण काय तेही समजत नाही परंतु तरीही अटलांटिसने संशोधकांना आजतागायत भुरळ घातली आहे. हे बेट शोधून काढण्याचे हजारो प्रयत्न झाले आहेत आणि होत राहतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अटलांटिसचे भौगोलिक स्थान कोणते याबाबतही अनेक प्रवाद आहेत. ग्रीसच्या जवळ भूमध्य समुद्रात, इजिप्तच्या जवळ अफ्रिकेनजीकच्या समुद्रात ते दूरवर अटलांटिक समुद्रात आणि हिंदी महासागरातही अटलांटिस असावे का काय या विचारांनी पछाडलेले अनेक हौशी संशोधक सापडतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;समुद्राने गिळलेल्या बेटांची आणि किनार्‍यावरील शहरांची संख्या तशी बेसुमार असावी. सॅंटोरिनी, विनेटा, ओलस, अलेक्झांड्रियाचा समुद्रतटाजवळील भाग आणि अशी अनेक शहरे समुद्राने आपल्या उदरात सामावून घेतलेली आहेत. भारताचा विचार करता समुद्राने गिळलेले चटकन आठवणारे शहर म्हणजे द्वारका. महाभारताच्या १६ व्या अध्यायात द्वारकेचा विनाशकाळ जवळ आला असता विनाश कसाकाय घडत गेला याचे उल्लेख येतात. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे - घरांतील भांडी अचानक फुटू लागली, रस्त्यांवर उंदीर-घुशी राजरोस फिरू लागले, शहरातील पक्षी उच्च रवात ओरडू लागले, गिधाडे शहरावर घिरट्या घालू लागली, द्वारकावासियांनी स्थलांतरास सुरुवात केली आणि बघता बघता द्वारका समुद्राच्या उदरात नाहीशी झाली इ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाभारतात, द्वारकेच्या अशा नाहीशा होण्याचा संबंध गांधारीचा शाप, यादवांचा शाप ते श्रीकृष्णाच्या मृत्यूशीही लावला जातो परंतु द्वारकेचेही नेमके असे का व्हावे ते कळत नाही. आज या सर्वांची कारणे समुद्राची पातळी वाढणे, किनारे खचणे, भूकंप, त्सुनामी अशी पुढे करता येतात. पूर्वापार भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावरून व्यापार चालत असल्याच्या नोंदी मिळतात. महाराष्ट्राचे, केरळचे किनारे आणि त्यावरील बंदरे यांचे उल्लेख इतिहासात शोधल्यास सहज मिळतात. बंगालच्या महासागरातील असेच एक पुरातन बंदर तमिळनाडूतील महाबलीपुरम‌ला असल्याचे सांगितले जाते. &lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/en/c/c6/Mamallapuram-april2008.jpg" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;महाबलिपुरम्‌चे समुद्रतटावरील मंदिर&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाबलीपुरम्‌बद्दल प्रसिद्ध आख्यायिका अशी की हिरण्यकश्यपुचा नरसिंहाने वध केल्यावर प्रह्लाद गादीवर बसला. या प्रह्लादाचा मुलगा बळी किंवा महाबळी. या बळीराजाने महाबलीपुरम्‌ची स्थापना केल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक नोंदींनुसार पल्लव राज्यकाळात महाबलीपुरम्‌च्या बंदराचा विकास झाल्याचे सांगितले जाते. सातवाहनांचे राज्य खिळखिळे झाल्यावर पल्लव राजघराण्याने आपले स्वतंत्र राज्य आंध्र आणि तमिळनाडूमध्ये स्थापन केले. त्यापैकी दुसरा नरसिंहवर्मन या राजाने आठव्या शतकात महाबलीपुरम्‌ शहराचा विकास केल्याचे सांगितले जाते. या पल्लव राजांबद्दल विस्तार लेखात नंतर येईलच. या शहराबद्दल दुसरी प्रसिद्ध आख्यायिका अशी की येथे समुद्रतटापाशी सात प्रचंड मंदिरे उभी होती आणि या मंदिरांच्या सभोवताली प्रचंड राजवाडे, महाल आणि हवेल्या उभ्या होत्या. एक सुसंस्कृत राज्य येथेही नांदत होते. आज यापैकी फक्त एकच मंदिर समुद्रतटावर उभे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img height="250" src="http://www.silk-road.com/maps/images/polomap.jpg" width="250" align="left" /&gt;महाबलीपुरम् शहराबद्दल प्राचीन उल्लेख मार्को पोलोच्या नोंदीत आढळतो असे म्हणतात. हा उल्लेख महाबलीपुरमवर उल्लेखनीय प्रकाश टाकत नसला तरी मार्को पोलोच्या प्रवासाचे नकाशे पाहता तो या बंदराला भेट देऊन गेल्याचे स्पष्ट कळते. यानंतरची महत्त्वाची नोंद जॉन गोल्डींगहॅम या ब्रिटिश खगोल संशोधकाने अठराव्या शतकात केलेली आढळते. या नोंदीत तो महाबलीपुरम्‌चे मंदिर, त्याचे स्थापत्त्य, रचना या सर्वांवर भाष्य करतो. प्राचीन आख्यायिकेनुसार येथे सात मंदिरे असल्याचाही उल्लेख येतो, गोल्डींगहॅमची आख्यायिका सांगते की कोणे एके काळी या जागी एक अतिशय सुसंस्कृत शहर विकसित झाले होते. स्वर्गस्थ देवांना याचा हेवा वाटल्याने त्यांनी प्रलय निर्माण केला आणि क्षणार्धात सर्व शहर पाण्यात गडप झाले. सातपैकी सहा मंदिरे पाण्याखाली गेली आणि एक किनार्‍यावर शिल्लक राहिले. या नोंदीचा काळ सुमारे १७९८चा. या आख्यायिकेला पुष्टी देणारी घटना सुमारे १०० वर्षांनी घडली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१८८३ मध्ये इंडोनेशियाजवळील क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक होऊन प्रचंड त्सुनामी लाटा निर्माण झाल्या. या प्रलयात सुमारे ३६,००० जीव गेले आणि इंडोनेशियाजवळील काही लहान बेटे जगाच्या नकाशावरून पुसली गेली. भारताच्या किनार्‍याला नेमकी हानी कशी पोहोचली याचे तपशील मिळू शकले नाहीत परंतु पोहोचली असावी ही शक्यता फार मोठी वाटते. यानंतर १९१४ मध्ये जे. डब्ल्यू. कूम्बस या ब्रिटिश लेखकाने लिहिलेल्या आख्यायिकेत येथे बंगालच्या उपसागराकडे पाहणारी सात भव्य मंदिरे असून त्यांचे कळस तांब्याचे होते असे म्हटले आहे. हे कळस सूर्यप्रकाशात झळाळत असत आणि नाविकांना दिशा मार्गदर्शक म्हणून या कळसांचा मोठा उपयोग होत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या मंदिरांचा र्‍हास नेमका कशामुळे आणि कधी झाला याची नोंद मिळत नसली तरी संशोधकांच्यामते भूकंप, त्सुनामीसारखे काहीतरी घडले असावे आणि त्यातून देवांना हेवा वाटल्याने त्यांनी हे शहर नष्ट केले ही दंतकथा जन्मली असावी. १०००-१२०० वर्षांपूर्वी येथील जमीनही समुद्रात आतवर पसरलेली असावी आणि आतापर्यंतच्या कालावधीत जमिनीची धूप होऊन समुद्र आत सरकला असावा ही दुसरी शक्यता वर्तवली जाते परंतु प्रचलीत आख्यायिकेशी ती मेळ खात नाही. ब्रिटिश राजवटीत या समुद्रकिनार्‍यावरील अनेक मूर्ती आणि स्थाने वाळूखालून साफ करून घेण्यात आली आणि पुरातत्त्वखात्याचे कामही रुजू करण्यात आले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तरीही २००४ सालच्या त्सुनामीपूर्वी या प्राचीन शहराबद्दल आणि त्याच्या सात प्रसिद्ध मंदिरांबद्दल म्हणावे तसे पुरावे सापडत नव्हते. अनेक भारतीय आणि परदेशी संशोधकांच्यामते या सर्व भाकडकथा असण्याची शक्यता वर्तवली जात असे. परंतु, समुद्रात नाव घातल्यावर आणि कधी कधी ओहोटीच्या वेळी समुद्राखाली मानवनिर्मित बांधकाम दिसते अशा प्रकारच्या स्थानिक कोळ्यांनी सांगितलेल्या दंतकथा मात्र प्रसिद्ध राहिल्या. २००२ साली एका ब्रिटिश संस्थेसोबत नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या भारतीय संस्थेने महाबलीपुरमच्या किनार्‍यावर संशोधन प्रकल्प राबवला. त्यात किनार्‍यापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मानवनिर्मित भिंतींसदृश बांधकाम सापडले. बांधकामाच्या रचनेवरून तेथे एकेकाळी अनेक इमारती उभ्या असाव्यात असा अंदाज बांधण्यात आला. संशोधकांनी या बांधकामाचा काळ पल्लव राज्यकाळात, अंदाजे नरसिंहवर्मनच्या काळात नेऊन ठेवला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्सुनामीच्या दिवशी अनेक पर्यटकांना आणि स्थानिक रहिवाशांना ओहोटीसारखी परिस्थिती निर्माण होऊन समुद्राचे पाणी अचानक शेकडो मैल आत ओढले गेल्याचे दिसले. या काळात अनेकांना पाण्याखालील बांधकामाचे दर्शन झाले. त्यानंतर आलेल्या प्रचंड लाटेने समुद्रातील काही प्राचीन अवशेष किनार्‍याकडे ढकलले गेले आणि किनार्‍याजवळील काही दुर्लक्षित बांधकामांवरील शेकडो वर्षे साचलेली वाळू धुतली गेल्याने ते नव्याने नजरेस आले. &lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img alt="" src="http://newsimg.bbc.co.uk/media/images/40818000/jpg/_40818721_relics203afp.jpg" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;किनार्‍यावर ढकलले गेलेले - नव्याने सापडलेले काही अवशेष&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आलोक त्रिपाठी या भारतीय पुरातत्त्व खात्यातील संशोधकाची मुलाखत हल्लीच पाहण्यात आली. त्यांच्या म्हणण्यानुसार या भागातील समुद्र उथळ असल्याने बरेचदा तेथे नाव घालण्यास किंवा पाणबुड्यांना आत जाऊन चित्रण करण्यास अडचणी येतात. तरीही २००५ सालापासून केलेल्या अव्याहत प्रयत्नांतून येथे एक पुरातन शहर वसत होते यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. या बांधकामात ताशीव भिंती आणि बांधकाम स्पष्ट दिसून येते आणि सध्या हे बांधकाम पल्लव राज्यकाळातीलच आहे की त्याहीपेक्षा प्राचीन आहे यावर संशोधन सुरू आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;u&gt;पल्लव राजघराणे&lt;/u&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लेखात वर उल्लेखल्याप्रमाणे सातवाहनांच्या पडत्या काळात पल्लव राजघराण्याचा उदय झाला आणि त्यांनी आंध्र आणि तमिळनाडू प्रदेशात आपले राज्य स्थापन केले. हे पल्लव राजे मूळचे कोणते याबाबत मात्र प्रवाद आहेत. काही संशोधकांच्या मते पर्शियातील पह्लव म्हणजेच पल्लव. स्थलांतरित होऊन ते येथे स्थायिक झाले असावेत आणि पुढे त्यांचे नाव पल्लव असे पडले असावे. या घराण्यातील बरेचसे राजे वर्मन ही उपाधी चालवत. या वर्मन उपाधीमुळे यापैकीच एखादा राजा कंबोडियात जाऊन ख्मेर घराण्याचा निर्माता ठरला असावा अशी शक्यताही वर्तवली जाते. पल्लव राजा महेंद्रवर्मन हा कला आणि स्थापत्त्य यांचा प्रेमी होता. त्याचा राजवटीत पाषाणातून कोरलेल्या सुबक आणि देखण्या मंदिरांची निर्मिती केली गेली. महाबलिपुरम्‌च्या मंदिराचा विकास किंवा निर्मिती दुसर्‍या नरसिंहवर्मनाच्या काळात झाली असे मानले जाते. हा राजाही कला, भाषा आणि स्थापत्त्यशास्त्राचा प्रेमी होता. हा राजा मल्लविद्येतही प्रवीण होता आणि त्यामुळे महाबलिपुरम्‌ला मामल्लापुरम्‌ (मामल्ला = मल्ल) या नावानेही ओळखले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img height="250" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/8/81/MamallapuramStoneCarvings.JPG" width="350" align="center" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;u&gt;महाबलिपुरम्‌चे समुद्रतटावरील मंदिर&lt;/u&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाबलिपुरम्‌चे समुद्रतटावरील उरलेले एकमेव मंदिर संपूर्ण पाषाणातून कोरलेले आहे. या मंदिराच्या स्थापत्त्याबद्दलही आख्यायिका सांगितली जाते की हे कोरीव काम करताना लाकूड आणि धातू यांचा वापर केला नाही. हे मंदिर एका संपूर्ण पाषाणातून कोरलेले आहे. येथे प्रमुख मंदिर विष्णूचे असून या मंदिराच्या स्थापनेनंतर महाबलिपुरम्‌चा र्‍हास थांबला अशी कथा सांगितली जाते. याचबरोबर, मोकळ्या जागेवर खडकांवर कोरलेले गंगेचे पृथ्वीवर अवतरणे, अर्जुनाची तपश्चर्या, वराहाचे मंदिर, पांडवांचे रथ हे कोरीव कामांचे उत्कृष्ट नमुने मानले जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भः&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Mahabalipuram"&gt;महाबलिपुरम् : विकिपीडिया&lt;/a&gt;&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;एन्शन्ट डिस्कवरीज : हिस्टरी.कॉम&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;डोन्ट नो मच अबाऊट मायथॉलॉजी: केनेथ डेविस&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;चित्रे&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;मार्कोपोलोचा नकाशा : http://www.silk-road.com/maps/images/polomap.jpg&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;महाबलिपुरम् मंदिर आणि कोरीव लेणी : विकिपीडिया&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;किनार्‍यावर ढकलले गेलेले - नव्याने सापडलेले अवशेष : http://newsimg.bbc.co.uk&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/ul&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-2136048138799865302?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/2136048138799865302/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=2136048138799865302' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2136048138799865302'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2136048138799865302'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2008/05/blog-post.html' title='भारताचे अटलांटिस'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-380823590057878260</id><published>2007-11-04T15:56:00.000-08:00</published><updated>2007-11-04T15:59:41.603-08:00</updated><title type='text'>द्रौपदीचा पांडवांशी विवाह - आक्षेप आणि कारणमीमांसा</title><content type='html'>&lt;span style="color:#0000ff;"&gt;मनोगतावर कर्ण या व्यक्तिरेखेवर कसा अन्याय होत गेला हे सांगणारी एक चर्चा सुरु होती. ती वाचत असता अनेकांची मतप्रदर्शने पाहण्यात आली. लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे लावताना दिसतात. गांगुलींचे महाभारत हीच माझ्याकडील विश्वसनीय प्रत आहे. तिच्या अनुषंगाने खालील लेख लिहिला आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील महाभारताची सुधारित प्रत कोणी वाचली असल्यास आणि खालील लेखावर अधिक प्रकाश टाकू शकल्यास आभारी असेन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चर्चेतील आक्षेप काहीसे असे होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;द्रौपदी ही भीक होती का?&lt;/li&gt;&lt;li&gt;पांडवांनी बैलोबांप्रमाणे आईची आज्ञा शिरसावंद्य मानून द्रौपदीला वाटून कसे घेतले?&lt;/li&gt;&lt;li&gt;कुंतीने भावांभावांत एकी रहावी म्हणून पाचांचा विवाह द्रौपदीशी करण्याचा जलद निर्णय कसा काय घेतला?&lt;/li&gt;&lt;li&gt;अनेक प्रसंगांतून द्रौपदी उर्मट होती असे दिसते तर तिने पाचांची पत्नी बनणे कसे स्वीकारले?&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;/ul&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भिक्षा ही भिकार्‍याला दिलेली भीक नसून ब्राह्मणाची मिळकत समजली जाई. तत्कालीन स्त्रियांची सामाजिक स्थिती पाहता, स्त्रीही गोधनाप्रमाणेच पुरुषाची मिळकत असणे वावगे नसावे. आता वळू स्वयंवरपर्वाकडे - यातील स्वयंवराचा भाग सोडून, द्रौपदीला जिंकल्यावर ब्राह्मणवेशात पांडव तिला घेऊन कुंभाराच्या घरी येतात तिथपासून सुरुवात करू.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपले पुत्र परतले नाहीत या काळजीत पाठमोऱ्या बसलेल्या कुंतीच्या समोर उभे राहून पांडव, आपण भिक्षा घेऊन आल्याचे सांगतात. 'जे काही मिळाले ते तुम्ही समान वाटून घ्या' असे कुंती सांगते आणि पुत्रांकडे वळते. समोर उभ्या असलेल्या याज्ञसेनीला पाहून कुंती चकित होते आणि तिला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो. 'हे मी काय केले?' असे मोठ्याने बोलून ती द्रौपदीचा हात पकडते आणि पापाचे क्षालन व्हावे म्हणून युधिष्ठीरासमोर उभी राहते आणि सुनावते ' द्रुपद राजाची कन्या तुझ्या धाकट्या भावांनी जिंकून आणून माझ्यासमोर उभी केली आणि वर भिक्षा आणली असे ओरडले तो त्यांचा निव्वळ मूर्खपणा आहे. हे राजा! भिक्षा आणली असे वाटल्याने मी काही चुकीचे बोलून गेले नाही पण आता तूच सांग की माझे बोलणे खोटे कसे पडावे? आपल्या हातून पाप कसे घडू नये आणि या नवपरिणित वधूला येथे अवघडल्यासारखे कसे वाटू नये?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;युधिष्ठीर आईची समजूत घालतो आणि अर्जुनाकडे वळून म्हणतो, 'याज्ञसेनीला तू पणात जिंकलेस, तेव्हा तिच्याशी लग्न केवळ तूच करावेस. तेच योग्य होईल.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;यावर अर्जुन म्हणतो, 'असे करून पापाचा घडा माझ्या नशिबी येणार. आपण सर्व काही वाटून घ्यायची शपथ घेतली होती, मातेने तशी आज्ञाही दिली. आता याज्ञसेनीशी सर्वप्रथम विवाह तुम्ही करावा, मग भीमाने, मी, नकुल आणि सहदेवाने विवाह करावेत असे मला वाटते. यानंतर, मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्व आपली आज्ञा मानू.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्जुनाचे वक्तव्य ऐकून बाकीच्या पांडवांनी द्रौपदीकडे निरखून पाहिले आणि तिच्या अप्रतिम सौंदर्याकडे पाहून ती आपलीही पत्नी होऊ शकते या शिवाय कोणताही दुसरा विचार त्यांच्या मनात येईना. युधिष्टीराने हे सर्व पाहून जाणले की आपल्या भावांच्या मनात द्रौपदीविषयी लालसा निर्माण झाली आहे आणि ही गोष्ट भावांभावांत फूट पाडायला कारणीभूत होईल हे जाणून त्याने 'द्रौपदी ही पाचही पांडवांची बायको होईल' असे घोषित केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सर्व घडत असता आपल्या बहिणीला जिंकणारे हे ब्राह्मण कोण हे पाहण्यासाठी धृष्टद्युम्न कुंभाराच्या घराबाहेर लपला होता. लाक्षागृहाच्या कांडापासून नाहीसे झालेले पांडव हेच ते पाच ब्राह्मण असावेत अशी शंका आल्याने श्रीकृष्ण आणि बलराम कुंभाराच्या घरात येऊन पांडवांना भेटून सल्ला मसलत करून गेले. ती रात्र पांडवांनी आनंदात काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी लपलेला धृष्टद्युम्न महालात परतला तसे द्रुपदाने उत्सुकतेने ब्राह्मणांविषयी विचारले तेव्हा धृष्टद्युम्नाने ते पांडव असल्याचा संशय व्यक्त केला. येथे द्रुपद विचारतो की त्या गरीबाच्या घरात द्रौपदी कशी राहिली आणि धृष्टद्युम्न सांगतो की अतिशय शालीन आणि मिळून मिसळून राहिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;विवाहाची बोलणी करायला द्रुपद कुंभाराच्या घरी गेला आणि पांडवांना उत्सवासाठी आमंत्रित करून गेला. यानंतर मिरवणूक, भोजन इ. नंतर द्रुपदाने लग्नाची बोलणी सुरू केली. पांडवांनीही त्याला आपली खरी ओळख दिली आणि द्रुपदाकडे आश्रय मागितला. द्रुपद आणि पांडवांची कुरुराजघराण्यात चाललेल्या राजकारणाविषयी बोलणी झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यानंतर द्रुपदाने युधिष्ठिराकडे विनंती केली की आता अर्जुन आणि द्रौपदीचा विवाह ठरावा. यावेळेस युधिष्ठिराने सांगितले की द्रौपदीशी विवाह प्रथम मी करणार. झाला प्रकार माहित नसल्याने द्रुपदाने युधिष्ठिराला म्हटले की 'द्रौपदीला अर्जुनाने जिंकले आहे. सर्वांची संमती असेल की आपण मोठे भाऊ असल्याने तिच्याशी विवाह करावा तर माझी काहीच हरकत नाही.' यावर युधिष्ठिराने त्याला घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते ऐकून द्रुपद काळजीत पडला आणि म्हणाला की 'एका पुरुषाने अनेक विवाह करणे ही आपली प्रथा आहे परंतु एका स्त्रीने अनेक पती करणे धर्मबाह्य ठरणार नाही काय? असे पाप कसे करता येईल? या प्रसंगाने तुमच्या किर्तीला काळिमा तर नाही लागणार? अशा प्रकारचे लग्न मला समाजात आणि वेदांत आढळून आलेले नाही. हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;युधिष्ठिर उत्तरादाखल म्हणतो, 'नैतिकता हा फार नाजूक मामला आहे. तिचा पथ सतत बदलत असतो. मी आयुष्यात कधी खोटे बोललो नाही. ज्येष्ठांचा अवमान केला नाही. आमच्या मातेने हे शब्द उच्चारले ते खोटे ठरावेत अशी तिची आणि माझी इच्छा नाही.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;यावरही द्रुपदाचे संपूर्ण समाधान झालेले दिसत नाही &lt;span style="color:#cccccc;"&gt;(असे माझे मत) &lt;/span&gt;तो उद्गारतो, 'हे कुंती, तू, तुझे पुत्र आणि माझा पुत्र धृष्टद्युम्न मिळून या गोष्टीवर निर्णय करा. तुम्ही कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचलात ते मला कळवा. मी विवाहाची तयारी करेन.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;द्रुपद, पांडव, कुंती आणि धृष्टद्युम्न यांचा विचारविनिमय चालला असता तेथे व्यास पोहोचले. यानंतर द्रुपद, धृष्टद्युम्न, युधिष्ठीर आणि व्यास यांच्यात मोठी चर्चा झाली. त्या चर्चेचे फलीत असे निघाले की पूर्वीही एका स्त्रीला एकाहून अधिक नवरे असल्याचे दाखले आहेत. द्रौपदीही "श्री"चा पुनर्जन्म असून ती पूर्वजन्मी पाच इंद्रांची पत्नी होती. &lt;span style="color:#999999;"&gt;(ती गोष्ट विस्तारभयास्तव येथे देत नाही) &lt;/span&gt;तिचा जन्म एका विशिष्ट हेतूने झाल्याने तिला पाचांची पत्नी होऊ देणे धर्मबाह्य नाही. आणि या चर्चांचे फलीत धर्मानुसार द्रौपदीने पांडवांशी केलेल्या विवाहात झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो. आता माझी टिप्पणीः&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;भिक्षा म्हणजे भिकार्‍याला दिलेली भीक नाही.&lt;/li&gt;&lt;li&gt;कुंतीने एक दोन मिनिटांत निर्णय घेतला नाही किंबहुना, निर्णय कुंतीचा नाही हे सहज समजते. &lt;/li&gt;&lt;li&gt;युधिष्ठिराने लंपटपणे द्रौपदी मिळावी म्हणून प्रयत्न केले किंवा भावाभावांतील एकी राहावी म्हणून प्रयत्न केले हे मानणे ज्याच्या त्याच्या समजूतीवर अवलंबून आहे. मला दोन्हींशी वावडे नाही.&lt;/li&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;राजकारणाचा विचार केला असता पांडवांची स्थिती त्यावेळी फार वाईट होती. त्यांना योग्य आश्रयदाता हवा होता आणि तो द्रुपदापेक्षा उत्तम मिळाला नसता. द्रुपदाचे आश्रित होण्यासाठी आणि त्याची कृपा आपल्यावर राहण्यासाठी द्रौपदीला जिंकणे आवश्यक होते. ते न होता, भावाभावांतच कलह उत्पन्न झाले तर गेलेले राज्य मिळणे कठिण होते आणि विनाश निश्चित होता. आईची आज्ञा न मानणे, मोठ्या भावाच्या आधी धाकट्या भावाने लग्न करणे, शब्द खोटा पाडणे इ. गोष्टीही धर्मबाह्यच ठरल्या असत्या. म्हणजेच, इथून नाहीतर तिथून पांडवांचाच दोष मानला गेला असता. द्रुपदालाही द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी प्रबळ मित्रांची आणि सहकार्‍यांची गरज होती. धर्मबाह्य वाटले तरी त्याने मान तुकवली असतीच. व्यासांनी तेथे येऊन धर्मचर्चा करून पांडव कोणतेही पाप करत नसल्याचा निर्वाळा दिला आणि द्रौपदीचा विवाह पाचांशी झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;द्रौपदी या प्रसंगात काहीच का बोलली नाही याचे एक कारण द्रौपदीला आपला जन्म कशासाठी झाला आहे याची कल्पना होती. श्रीकृष्णाच्या भेटीने हे ब्राह्मण पांडवच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले. वडिलांच्या अपमानाचा बदला आणि त्यासाठीच आपला जन्म आहे आणि पांडवांशिवाय हे कार्य कोणीच करू शकत नाही हे माहित असल्याने तिने गप्प राहणे पसंत केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;किंवा, दुसर कारण जे महाभारताबाहेरील असावे - बाईने पतिविरुद्ध बोलले की संस्कृतीचा ऱ्हास होतो अशी समजूत असल्याने कदाचित ते संवाद मूळ महाभारतात झालेल्या बदलांमध्ये काढून टाकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूर्याचा पुत्र म्हणून तेजस्वी कर्ण आणि यज्ञज्वालेतून बाहेर आलेले धृष्टद्युम्न आणि द्रौपदी दोघेही उर्मट असल्याचे दाखले महाभारतात दिसतात. तेव्हा या सर्व प्रसंगात द्रौपदीने आपली नाराजी दाखवली नसेल असे वाटत नाही. कदाचित, तिने ती आपल्या पित्याकडे व्यक्त केली असेल किंवा भावाकडे कारण त्या दोघांच्या संवादांत चिंता, काळजी, पापाची भीती दिसून येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भः द महाभारता ऑफ कृष्णद्वैपायन व्यास - के. एम. गांगुली (पाने २४७ ते २५६)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-380823590057878260?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/380823590057878260/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=380823590057878260' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/380823590057878260'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/380823590057878260'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2007/11/blog-post.html' title='द्रौपदीचा पांडवांशी विवाह - आक्षेप आणि कारणमीमांसा'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-5988567858792994126</id><published>2007-08-16T17:39:00.000-07:00</published><updated>2007-08-16T17:46:00.521-07:00</updated><title type='text'>गौतमीपुत्र शातकर्णी</title><content type='html'>&lt;span style="color:#000000;"&gt;महाराष्ट्राला संपन्न इतिहास आहे असे बरेचदा वाचनात येते. &lt;/span&gt;प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारच थोडक्यात आपल्याला शिकवला जातो किंवा फारच कमी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, यादव आणि सातवाहन राजघराण्याविषयी त्रोटक इतिहास नजरेस पडतो. या राजघराण्यांनीही आपापल्यापरीने आपले राज्य सांभाळले आणि वाढीस नेल्याचे दिसते परंतु समग्र इतिहास सहज नजरेस पडत नाही. बरेचदा, या राजांविषयी अधिक माहिती काढायची झाल्यास पुराणांचा आधार घ्यावा लागतो. मराठी साहित्यात या राज्यांविषयी लिहिले गेले असण्याची शक्यता आहे परंतु महाजालावर समग्र लेखन दिसत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यांतील सर्व राजघराण्यांपैकी सातवाहन राजघराण्याची आठवण आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या नेहमीच काढत असतो. आजही वापरात असलेली शालिवाहन शके ही दिनमान पद्धती या राज्यकाळात सुरू झाल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या इतिहासात या राजघराण्याचे स्थान कोणते हे माहित करण्यासाठी काही वाचन केले त्याचा गोषवारा येथे देत आहे -&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सातवाहन राजघराणे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिल्याचे पुरावे मिळतात. त्यानुसार मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले &lt;span style="color:#999999;"&gt;(बहुधा किल्ले)&lt;/span&gt; आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वत: अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्‍यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत वाढत गेली.&lt;br /&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img height="300" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/c/c8/SatavahanaMap.jpg" width="250" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;सातवाहन राज्य&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अधिक माहितीसाठी विकिपीडियाचा &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Satavahana"&gt;हा &lt;/a&gt;दुवा पाहावा. याच दुव्यात पुढे या राजघराण्याचा उल्लेख कोणकोणत्या पुराणांत आला आहे त्याची उदाहरणे दिसतात. या राजघराण्यातील महत्त्वांच्या राजांपैकी गौतमीपुत्र शातकर्णी एक महत्त्वाचा राजा मानला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;गौतमीपुत्र शातकर्णी &lt;/strong&gt;(उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. .&lt;br /&gt;&lt;br /&gt;गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्लव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नाहपण राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नाहपणाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वागवत होता असे वाचायला मिळते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img height="180" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/en/f/f1/GautamiPutraSatakarni.jpg" width="300" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;शातकर्णीचा चेहरा असलेली नाणी&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य &lt;span style="color:#999999;"&gt;(सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) &lt;/span&gt;याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजराथ आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. नंतर ७८ वर्षांनी ही कालगणना सुरू झाल्याने ग्रेगरीयन कॅलेंडरपेक्षा ७८ वर्षे उशीराने सुरू होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या राजाबद्दल नाशिक येथे खुद्द त्याची आई गौतमीच्या सांगण्यावरून आपल्या मुलाची स्तुती करणारा शिलालेख कोरलेला आढळतो, त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --&lt;br /&gt;&lt;br /&gt;"क्षत्रियांचा&lt;span style="color:#999999;"&gt; (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी)&lt;/span&gt; गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात (KShaharat) घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी विकिपीडियावर मला या राजाची कथा सांगणारा एक भाग मिळाला. तो येथे चिकटवत आहे..&lt;br /&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;&lt;br /&gt;शालिवाहनाची राजधानी (आणि इतर सातवाहन राजांची राजधानी) पैठण होती. शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे वजन किती हे नक्की सांगता येईल का? ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी उपाय असा काढला कि पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. मग हत्तीला नावेत चढवले आणि पाणि नांवेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढून त्याजागी माती भरली बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेपर्यंत. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनासकट परत पाठवला. ह्या त्याच्या बौद्धिक विजयाने त्यानी सुरु केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात मान्य झाला.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;उपक्रमावरील एका सदस्यांनी मला सातवाहन घराण्याची संपूर्ण वंशावळ काढून दिली होती. ती ही येथे चिकटवत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आंध्र वंशातले राजे आणि त्यांचा अंदाजे कार्यकाल(वर्षे) असा: &lt;/p&gt;&lt;ol&gt;&lt;li&gt;सिमुक(सिंधुक, शिप्रक) २३ &lt;/li&gt;&lt;li&gt;कृष्ण(भात) १० &lt;/li&gt;&lt;li&gt;श्रीशातकर्णी(श्रीमल्‍लकर्णी) १० &lt;/li&gt;&lt;li&gt;पूर्णोत्संग(पौर्णमास) १८ &lt;/li&gt;&lt;li&gt;स्कंधस्तंभ १८ &lt;/li&gt;&lt;li&gt;शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी) ५६ &lt;/li&gt;&lt;li&gt;लंबोदर १८ &lt;/li&gt;&lt;li&gt;आपीतक(आपीलक, दिविलक) १२ &lt;/li&gt;&lt;li&gt;मेघस्वाति १८ &lt;/li&gt;&lt;li&gt;स्वाति(पतुमत्, अटमान्) १८ &lt;/li&gt;&lt;li&gt;स्कंदस्वाति ७ &lt;/li&gt;&lt;li&gt;मृगेंद्रस्वातिकर्ण ३ &lt;/li&gt;&lt;li&gt;कुंतलस्वातिकर्ण ८ &lt;/li&gt;&lt;li&gt;स्वातिवर्ण १ &lt;/li&gt;&lt;li&gt;पुलोमावी ३६ &lt;/li&gt;&lt;li&gt;अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण) २५ &lt;/li&gt;&lt;li&gt;हाल ५ &lt;/li&gt;&lt;li&gt;मंतलक(पत्तलक, मंदुलक) ७ &lt;/li&gt;&lt;li&gt;पुरिकषेण(प्रविल्‍लसेन, पुरीषभीरु) २१ &lt;/li&gt;&lt;li&gt;सुंदरशातकर्णी(सुनंदन) १ &lt;/li&gt;&lt;li&gt;चकोरशातकर्णी ६ महिने &lt;/li&gt;&lt;li&gt;शिवस्वाति २८ &lt;/li&gt;&lt;li&gt;&lt;strong&gt;गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र) २८&lt;/strong&gt; &lt;/li&gt;&lt;li&gt;पुलोमत् २८ &lt;/li&gt;&lt;li&gt;शातकर्णी(शिवशातकर्णी) २९ &lt;/li&gt;&lt;li&gt;शिवश्री ७ &lt;/li&gt;&lt;li&gt;शिवस्कंध ३ &lt;/li&gt;&lt;li&gt;यज्ञश्री शातकर्णी २९ &lt;/li&gt;&lt;li&gt;विजय ६ &lt;/li&gt;&lt;li&gt;चंडश्री १० &lt;/li&gt;&lt;li&gt;पुलोमत् ७. &lt;/li&gt;&lt;/ol&gt;&lt;p&gt;संदर्भ: सर्व संदर्भ आणि चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. याशिवाय, मेगॅस्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ यावरूनही ही माहिती दिली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;अधिक माहितीसाठी &lt;a href="http://mr.upakram.org/node/617"&gt;ही&lt;/a&gt; चर्चा पाहावी.&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-5988567858792994126?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/5988567858792994126/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=5988567858792994126' title='14 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/5988567858792994126'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/5988567858792994126'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2007/08/blog-post.html' title='गौतमीपुत्र शातकर्णी'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>14</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-4922959874049160994</id><published>2007-05-14T18:13:00.000-07:00</published><updated>2007-05-14T18:19:27.921-07:00</updated><title type='text'>ज्ञानप्रसाराची मौखिक परंपरा</title><content type='html'>&lt;span style="color:#ff0000;"&gt;खालील लेख हा कोणताही वाद सुरू करण्याच्या हेतूने लिहीलेला नाही. लेखातील बरेचसे विचार प्राचीन असल्याने ते सद्य काळात लागू आहेत असा लेखिकेचा दावा नाही. हा लेख कोणत्याही गोष्टीच्या समर्थनार्थ लिहिलेला नाही, तसेच, लेख परिपूर्ण आहे असाही लेखिकेचा दावा नाही. वाचकांकडे खाली दिलेल्या मुद्द्यांवर भर टाकण्याजोगे अथवा योग्य माहितीच्या आधारे लेखातील मुद्दे खोडून काढण्यासारखे काही असेल तर ते येथे जरूर द्यावे&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;“रुक मत जा" या वाक्यातील विरोधाभास बहुधा सर्वांनाच माहित असावा. "रुक, मत जा" यातील रुक नंतर आलेला स्वल्पविराम थोडेसे थांबणे सुचवतो, पण तोच जर "रुक मत, " नंतर "जा" आला तर वाक्याचा अर्थ बदलून टाकतो. जर या वाक्यात स्वल्पविराम आलाच नाही तर मात्र वाक्य दोहोंपैकी कोणत्या हेतूने लिहिले आहे याचा उलगडा होणे कठिण होऊन बसते. याउलट, बोलणारा ज्या हेतूने हे वाक्य बोलतो/ उच्चारतो तो हेतू सहज स्पष्ट होतो. विरामचिन्हांचा उपयोग होण्यापूर्वी मराठी, संस्कृतासारख्या भाषा योग्य रितीने कशा काय वाचल्या गेल्या असतील अशी शंका गेले अनेक दिवस डोक्यात घोळत होती. वाचन करत असताना लेखनकलेबद्दल काही विशेष नजरेस पडले ते येथे संकलित केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतिहासात डोकावून पाहिले आणि पूर्वापार चालत आलेले आणि अद्यापही अस्तित्वात असलेले साहित्य कोणते असा विचार केला असता, ते साहित्य म्हणजे 'लोककथा आणि पौराणिक कथा' असा निष्कर्ष काढला जातो. लोककथा/ पौराणिक कथा या नेमक्या कोणत्या काळात निर्मिल्या गेल्या हे सांगणे कठिण असले तरी त्या आजतागायत ऐकल्या/ ऐकवल्या जातात आणि अद्यापही प्रसिद्ध आहेत. इथे जर प्राचीन लिखित साहित्याचा विचार केला तर बरेचसे प्राचीन साहित्य हे काळाच्या ओघात वाहून गेले आहे किंवा मागे पडले आहे. अनेकदा ते ज्या लिपीत लिहिले गेले ती लिपी बदलल्याने किंवा नष्ट झाल्याने अशा लिखाणाचा अचूक अर्थ काढणे हे एक मोठे कठिण काम होऊन बसते, परंतु मौखिक परंपरेतून चालत आलेल्या बर्‍याच प्राचीन कथा आणि गोष्टी फुलवून सांगण्याची कला आजतागायत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतात मौखिक परंपरा म्हणून सर्वप्रथम वेदांकडे पाहिले जाते. वेद मौखिक का? पूर्वजांनी ते लिहून का ठेवले नाहीत? असा प्रश्न बरेचदा विचारला जातो. याचे अचूक उत्तर अद्याप सापडलेले नाही. अनेक तज्ज्ञांनी याबाबत अनेक मते मांडलेली दिसतात त्याप्रमाणे काही महत्त्वाची खाली दिली आहेत:&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="MARGIN-LEFT: 40px"&gt;१. त्याकाळी लेखनकला अस्तित्वात नसावी किंवा अतिशय प्राथमिक स्वरूपाची असावी.&lt;br /&gt;२. लेखनकला असावी फक्त ती साहित्यासाठी न वापरता, राज्यकारभारातील शिक्के किंवा इतर कामांसाठी वापरली जात असावी.&lt;br /&gt;३. उपलब्ध अक्षरांत अचूक उच्चार लिहिणे अशक्य असल्याने आणि तसे लिहून चुकीचे उच्चार प्रचलित होऊन अयोग्य ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहचू नये म्हणून वेदांना मौखिक ठेवण्यात आले.&lt;br /&gt;४. ज्ञान अनाधिकारी व्यक्तींच्या हाती जाऊ नये म्हणून.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;बरेचदा चौथ्या मुद्द्याला अवास्तव महत्त्व दिल्याचे दिसून येते, तरीही बर्‍याच तज्ज्ञांच्या मते यांतील पहिला मुद्दा खरा मानला जातो कारण ऋग्वेदात लेखनाचा उल्लेख नाही असा निर्वाळा तज्ज्ञ देतात. (यावर वाद-प्रतिवाद आहेतच.) परंतु लेखनकला विकसित झाल्यावरही वेदांचे लेखन झालेले आढळत नाही हे येथे महत्त्वाचे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाभारताच्या सुरुवातीलाच येणारी व्यास आणि गणेश यांच्यातील कथाही येथे विचारात घेण्याजोगी आहे. व्यासांनी महाभारत लिहून काढण्याची गणेशाला विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन गणेशाने सांगितले, “मी हे लेखन करेन परंतु माझी लेखणी एक क्षणही थांबता कामा नये.” यावर आपल्याला रचना करण्यास थोडी उसंत मिळावी या हेतूने व्यासांनी गणेशाला पुन्हा विनंती केली, “जेव्हा एखाद्या रचनेचा योग्य अर्थ लागणार नाही तोपर्यंत ती आपण लिहून काढू नये.” गणेशाला व्यासांच्या रचनेचा अर्थ लावताना वेळ लागलाच. या गोष्टीबाबत काही तज्ज्ञांचे मत असे की येथे केवळ अर्थ लावण्यापुरती ही कथा थांबत नसून, व्यासांच्या रचना इतक्या जटिल होत्या की त्यांचे उच्चार शब्दांत लिहिणे साक्षात गणेशालाही कठिण होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यापुढे जाऊन मला बहुतांश तज्ज्ञांत एकवाक्यता दिसली की प्राचीन भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे, पूर्वापार चालत आलेले अनेक विधी, वेद, मंत्र, रीती-रिवाज, सण, समजुती, खेळ, नृत्यप्रकार अशा अनेक प्रकारांतून कायम आहे याचे कारण मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला ज्ञान देणे आणि हे पिढ्यान पिढ्या चालत आल्याने प्राचीन भारतीय संस्कृती आजही अस्तित्वात आहे. वेदांच्या उच्चारांबाबत &lt;a href="http://www.sas.upenn.edu/~gpossehl/home.html"&gt;प्रा. ग्रेगरी पोसेल &lt;/a&gt;यांची एक प्रतिक्रिया मला वाचायला मिळाली त्यातील काही भाग येथे नमूद करत आहे:&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="MARGIN-LEFT: 40px"&gt;"भारतीय ब्राह्मणांनी वेद मुखोद्गत करण्याचे कार्य अतिशय गांभीर्याने केले आणि त्यात पिढ्यान् पिढ्या सारखीच अचूकता आणि उच्चार राखले. उच्चारातील साधर्म्य हा श्रद्धेचा भाग होता. एक विद्वान संस्कृतज्ज्ञ &lt;a href="http://web.utk.edu/~jftzgrld/MBh1Biblio.html#van%20Buitenen"&gt;जे. ए. बी. वॅन ब्युटेनन &lt;/a&gt;यांच्या सांगण्याप्रमाणे १८व्या आणि १९व्या शतकात ज्या युरोपीयांनी संस्कृत शिकायला सुरुवात केली त्यांच्या लक्षात असे आले की भारतातील कोणत्याही भागांत गेले असता जे मंत्रोच्चार कानी पडत असे ते सारखेच होते. पॉंडेचरीपासून पेशावरपर्यंत आणि कलकत्त्यापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या ब्राह्मणांचा एकमेकांशी कधीही संपर्क येण्याची शक्यता नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणून मौखिक परंपराही इतरांपेक्षा वेगळी वाटते आणि आज लिखित स्वरूपात अस्तित्वात असलेले हे वेद प्राचीन मौखिक वेदांशी मिळते-जुळतेच असावेत असे वाटते.”&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;मौखिक ज्ञानसंवर्धनाला भारतीय संस्कृतीत असलेली ही मान्यता इतर संस्कृतीत दिसते का यावर तज्ज्ञ पुढील उदाहरण देतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Socrates"&gt;सॉक्रेटिस&lt;/a&gt;बद्दल लिहिताना &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Plato"&gt;प्लेटो &lt;/a&gt;एके ठिकाणी एक सॉक्रेटियन प्रश्न उद्धृत करतो, “कोणते लक्षण लेखनाला योग्य किंवा अयोग्य ठरवते?” यावर सॉक्रेटिस सरळ उत्तर देण्याऐवजी एका इजिप्शियन पौराणिक कथेचे उदाहरण देतो.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="MARGIN-LEFT: 40px"&gt;&lt;span style="color:#0000ff;"&gt;&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Thoth"&gt;&lt;span style="color:#ff00ff;"&gt;थॉथ&lt;/span&gt;&lt;/a&gt; हा कला आणि विद्येचा इजिप्शियन देव. त्याला नवनवीन कला शोधण्याचा छंद होता. आपले संशोधन तो &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Amun"&gt;&lt;span style="color:#ff00ff;"&gt;अमुन&lt;/span&gt;&lt;/a&gt; या सर्वोच्च इजिप्शियन देवाला आणि संपूर्ण इजिप्तच्या राजाला नेऊन दाखवत असे आणि त्याची प्रशंसा प्राप्त करत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असाच एकदा थॉथला लेखनकलेचा शोध लागला. आपले नूतन संशोधन घेऊन थॉथ अमुनकडे गेला आणि उत्साहाने त्याने आपले संशोधन अमुनला सांगण्यास सुरुवात केली, “हे राजा, मी एक नवीन कला शोधली आहे. जी एकदा शिकून घेतली की समस्त इजिप्तवासी शहाणे होतील, विद्वान होतील आणि त्यांची स्मृती द्विगुणित होईल. या कलेद्वारे मी बुद्धिमत्ता आणि स्मृती यांवर अचूक तोडगा शोधला आहे.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;यावर नेहमी थॉथची प्रशंसा करणार्‍या अमुनने काही वेगळेच उत्तर दिले, “हे थॉथ! एखाद्या कलेला जन्म देणारा हा ती कला फायद्याची आहे किंवा नाही हे उत्तमरीत्या ठरवू शकत नाही. ही पारख त्या कलेच्या वापरकर्त्यांनी करावी. आता, तू या लेखनकलेचा जनक असल्याने येथे तुझे पितृवत प्रेम बोलते आहे आणि ते सत्य परिणामांच्या विरुद्ध आहे. खरंतर, ही कला तिच्या अभ्यासकांना विस्मरणाचे दान देईल. जे ही कला शिकतील ते आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग करणे सोडून देतील कारण ते लेखनावर/ लिखाणावर आपली श्रद्धा कायम करतील. या चिन्हा-खुणांच्या बाह्यज्ञानामुळे माणसे आपल्या हृदयातून निर्माण होणार्‍या अंतर्ज्ञानाला विसरतील. आपापल्यापरीने वाचन केल्याने ते त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढतील. तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे. हे संशोधन ऐकवल्याने (वाचून दाखवल्याने) लोकांना एकाच गोष्टीचे अनेक अर्थ कळतील. त्यांना आपण ज्ञानी झाल्याचा भास होईल परंतु प्रत्यक्षात त्यांना योग्य गोष्ट कळेलच असे नाही.”&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;पाश्चात्य इतिहासातील दोन महत्त्वाची महाकाव्ये &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Iliad"&gt;इलियड&lt;/a&gt; आणि &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Odyssey"&gt;ओडिसी&lt;/a&gt; यांची निर्मिती &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Homer"&gt;होमर &lt;/a&gt;या आंधळ्या आणि निरक्षर कवीने केल्याचे सांगितले जाते आणि मौखिक ज्ञान प्रसार परंपरेतील तो एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. इतर अनेक संस्कृतीतही जसे नेटिव इंडियन मौखिक ज्ञानाची परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली दिसते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-4922959874049160994?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/4922959874049160994/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=4922959874049160994' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/4922959874049160994'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/4922959874049160994'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2007/05/blog-post.html' title='ज्ञानप्रसाराची मौखिक परंपरा'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-2393959442344702545</id><published>2007-04-26T07:40:00.000-07:00</published><updated>2007-04-26T07:57:55.083-07:00</updated><title type='text'>आर्य भारतात बाहेरून आले का?</title><content type='html'>&lt;a href="http://mr.upakram.org/"&gt;उपक्रम&lt;/a&gt; या संकेतस्थळावरील एका चर्चेला प्रतिसाद देताना खालील प्रतिसाद लिहीला होता. त्याचा एक लहानसा लेख बनतो आहे असे वाटल्याने तो येथे टंकत आहे. खालील विचार माझे नसून मी नुकत्याच वाचत असलेल्या पुस्तकातील आहेत. लेखाच्या शेवटी पुस्तकाची माहिती दिली आहे. &lt;span style="color:#c0c0c0;"&gt;(या लेखातून कोणतेही वाद निर्माण करायची इच्छा नाही.)&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;आर्य भारतात बाहेरून आले का? या मुख्य मुद्द्यावर येण्यापूर्वी या प्रकाराची थोडीशी पार्श्वभूमी. जो समाज शहरे वसवतो तो इतर समाजापेक्षा अधिक सुसंसकृत गणला जातो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. येथे झपाट्याने अमर्याद फोफावलेल्या मुंबईसारख्या शहरीकरणाचा विचार करू नये. हे वाक्य का आले त्याचा उहापोह खाली केला आहे&lt;sup&gt;&lt;span style="color:#33cc00;"&gt;१&lt;/span&gt;&lt;/sup&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जगाच्या इतिहासात सर्वप्रथम शहरे वसवण्याचा मान मेसोपोटेमिया, इजिप्त आणि भारताकडे जातो. या तीनही संस्कृतींत इ.स. पूर्व ४००० ते ३००० च्या दरम्यान शहरांची निर्मिती करण्यात आली. भारतात हडप्पा, मोहेंजेदाडो, लोथल, ढोलवीरा अशी सुमारे २६०० पुरातन शहरांची ठिकाणे आढळतात. भारतातील या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हटले जाते, परंतु नवीन संशोधनाप्रमाणे ते पूर्ण सत्य नाही. वेदांत आणि इतर पुराणांत वर्णिलेली सरस्वती नदी जी या प्रदेशातून वाहत होती, ती या काळात सुकलेली नव्हती त्यामुळे हल्ली या संस्कृतीला सिंधू-सरस्वती संस्कृती असेही म्हटले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मॅक्स म्युल्लरने ऋग्वेदाचा काळ इ.स.पूर्व १५००-१२०० असा ठरवला परंतु त्यासोबत त्याने एक महत्त्वाची टिप्पणी केली - वेदांचा निश्चित काळ तो इ.स.पूर्व १०००-२००० की ३००० हे सांगणे पृथ्वीवर कोणालाही शक्य नाही. याचा एक अर्थ असाही घेता येईल की आर्यांनी वेदांची रचना केली असे सिद्ध होत नाही कारण इ.स. पूर्व २०००-३००० दरम्यान आर्य भारतात आलेच नव्हते. आर्य या नावाची व्युत्पत्ती अधिक खोलात जाऊन सांगायची गरज वाटत नाही. तत्कालिन पाश्चात्य संशोधकांनी ज्याला आर्य समाज हे नाव दिले ते वेदांत वर्णिलेल्या सुसंस्कृत पुरुषांना दिलेले संबोधन आहे इतकेच. म्युल्लरने आर्य भारतात आल्याचा काळही इ.स. पूर्वी १५०० वर्षांचा ठरवला. युरोपातून आलेल्या गोर्‍या लोकांच्या&lt;sup&gt;२&lt;/sup&gt;भटक्या जमातींनी एतद्देशीय समाजाला बळाच्या जोरावर हुसकावून दक्षिणेत जाण्यास भाग पाडले. आर्यांनी आपल्या सोबत जो सांस्कृतिक वारसा आणला तो संपन्न भाषेचा आणि त्यांनी भारतीय लोकांना सुसंकृत बनवले असे गृहितक मांडले गेले. या गृहितकावर, 'गोर्‍यांचे अबाधित वर्चस्व स्थापन करण्याच्या उद्देशाने' असा मलिन इतिहास लिहीला गेल्याचा ठपका लागतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता जर मूळ मुद्दा पाहिला तर पहिले गृहितक युरोपीय वंशाच्या सुसंस्कृत लोकांनी भारतावर स्वारी करून तेथिल द्रविड लोकांना दक्षिणेत जाण्यास भाग पाडले असे ठरते. या गृहितकाला धक्का लागला तो हडप्पा आणि मोंहिजेदाडोच्या खोदकामानंतर. या शहरांचे बांधकाम आर्य येण्याच्या फार पूर्वीचे असल्याने तेथे सुसंकृत संस्कृती नांदत नव्हती या कल्पनेला तडा जातो कारण या शहरांचे बांधकाम, त्यातील विटांचा वापर, जलनि:सारण पद्धत, मूर्ती, खेळणी, शिक्के, भांडी पाहिली असता एका शहरे वसवून राहणार्‍या सुसंस्कृत समाजाला केवळ बळाच्या जोरावर घोड्यावर बसून आलेल्या भटक्या आर्यांनी पळवून लावले असे दुसरे गृहितक मांडले गेले. &lt;span style="color:#999999;"&gt;(या शहरांत कोणताही लिखित ठेवा का सापडत नाही त्याच्या शक्यतेबद्दल वेगळा लेख लिहीता येईल.) &lt;/span&gt;या गृहितकाने आर्यांचा बाहेरुन येऊन सुसंस्कृत संस्कृती भारतीय समाजाला देण्याचा दावा खोटा ठरवला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परंतु, पुढे हे ही गृहितक खोटे ठरते कारण या खोदकाम झालेल्या ठिकाणांत कोठेही युद्ध झाल्याचे, नासधूस, जाळपोळ, शहर बेचिराख झाल्याचे पुरावे सापडत नाहीत. इतकेच काय परंतु मिळालेल्या मानवी सांगाड्यांवरूनही त्यांचे मृत्यू लढाईत वार होऊन किंवा अपघातात झाले असे आढळून येत नाही. &lt;span style="color:#999999;"&gt;(असे काही सांगाडे आढळले तरी ते एका प्रसंगात आणि एका ठिकाणी आढळले नसल्याने या ठीकाणी युद्ध झाले अशी कोणतीही खूण मिळत नाही.)&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color:#999999;"&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/en/6/6a/Lothal_conception.jpg" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;भारतीय पुरातत्त्व खात्यानुसार लोथल शहराचे रूप&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;१९९९ ला डॉ. एस्. आर्. राव, ग्रेगरी पोसेल आणि इतर भारतीय आणि अभारतीय तज्ज्ञांनी असे गृहितक मांडले की आर्य नावाचा कोणताही वंश नाही, आर्य नावाची इंडो-युरोपीय भाषासमूहातील भाषा बोलणारी कोणतीही जमात भारतावर स्वारी करून आली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;येथे काही इतर तज्ज्ञांचे मत असेही पडते की युरोप आणि मध्य आशियातून टोळ्या आल्या नाहीत असे नाही परंतु त्याचा काल फार पूर्वीचा असावा (अश्मयुगीन), ती घुसखोरी किंवा स्वारी नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;डॉ. आर्.एस्. बिश्त (भारतीय पुरातत्त्वखात्यातील एक संचालक) मते ऋग्वेदात वर्णन केलेली शहरे म्हणजेच सिंधू-सरस्वतीच्या खोर्‍यातील शहरे आहेत. या शहरांत गाई-गुरे आणि घोडे पाळल्याचे, यज्ञकर्म केल्याचे, तसेच या शहरांतून समुद्रप्रवास आणि व्यापार चालत असल्याचे पुरावे मिळतात. सरस्वती नदी सुकल्याने या शहरांतील लोकांनी स्थलांतर केले असेही एक गृहितक मांडले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे आणि असे बरेचसे विचार ग्रॅहम हॅनकॉक यांच्या 'अंडरवर्ल्ड - द मिस्टेरिअस ओरिजिन्स ऑफ सिविलायझेशन' या पुस्तकांत मांडलेले आहेत. ग्रॅहम हॅनकॉक पुरातत्त्ववेत्ता नाही केवळ पत्रकार आहे. त्यांच्या बर्‍याचशा शक्यता खर्‍या असतील असे नाही परंतु ते बर्‍याचशा शक्यता स्वतः मांडण्यापेक्षा विषयांतील तज्ज्ञांचे विचार मांडतात त्यामुळे पुस्तक वाचनीय ठरते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;sup&gt;१ &lt;/sup&gt;&lt;span style="color:#33cc00;"&gt;मोहेंजेदाडोचे एक चित्र येथे लावले आहे. त्याकडे लक्षपूर्वक पाहिले असता त्यातील सारखेपणा लक्षात येईल. उत्खनन केलेले हे शहर अतिशय मोनोटोनस दिसते. ज्यांना इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्रात काहीही रस नाही ते हे स्थळ पाहून कंटाळून जातात असे वाचले आहे. (येथे अमेरिकेतील एखादा हायवे किंवा टाऊनशिप नजरेसमोर आणा. हायवेवरून तासन् तास गाडी हाकणारा माणूस कंटाळतो परंतु त्याच बरोबर हे हायवे बांधणार्‍यांची दूरदृष्टी आणि अभियांत्रिकी वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे आकार, वेगमर्यादा, रॅम्प्स्, आत-बाहेर करण्याच्या सुविधा, रस्त्यांवरील चिन्हे, माहिती, रस्त्यांच्या कडेला असणारे शोल्डर्स् वगैरे वगैरे) मोहेंजेदाडो शहरातील जलनि:सारण पद्धत, रस्त्यांचे बांधकाम, भाजलेल्या, सुकवलेल्या विटा आणि लाकडे यांची बांधकामे आणि त्यातील सारखेपणा हे सुसंस्कृतीचे लक्षण आहे कारण हे सर्व बांधकाम करण्यासाठी गणित, खगोलशास्त्र, भूमिती, यांत्रिकी अशा अनेक शाखांची खोलवर माहिती हवी. &lt;img height="250" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/en/c/c1/Indusvalleyexcavation.jpg" width="300" align="right" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;यावर वर उल्लेखलेल्या पुस्तकातील एक उदाहरण देते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ढोलवीरा या शहराची रचना अप्पर टाऊनशिप, मिडल टाऊनशिप आणि लोअर टाऊनशिप (परम्, मध्यम् आणि अवम्) अशा तर्‍हेची आहे. यातील एका स्थळाचे मोजमाप पुढील प्रमाणे - पूर्वेकडून पश्चिमेकडील लांबी ७७१ मीटर आणि उत्तरेकडून दक्षिणेची लांबी (किंवा रुंदी म्हणू) ६१६.८ यांतील अप्पर टाऊनशिपचा भाग पूर्व-पश्चिम ११४ मीटर आणि उत्तर-दक्षिण ९२.५ मीटर. दोन्हींचे गुणोत्तर येते ५:४. (इतकी अचूकता नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.) परंतु हेच परिमाण का याचे स्पष्टीकरण बिश्त आणि एक प्राध्यापक एस्.पी गुप्ता यांनी पुढीलप्रमाणे दिले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांच्यामते हा योगायोग नाही. ऋग्वेद आणि इतर काही पुराणांत यज्ञवेदीच्या लांबी रुंदीविषयी लिहीले आहे.** त्याचे गुणोत्तर ५:४ असे आहे. (यावरूनही आर्यांनी वेदांची रचना केली नाही असा एक निष्कर्ष निघतो.) म्हणजेच जो समाज शहरे बांधू शकतो तो रानटी नाही, ज्यांना ही शहरे बांधायचे ज्ञान होते त्यांना इतर अनेक शाखांतील ज्ञानही नक्कीच होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;** यज्ञवेदीचे अनेक प्रकार आहेत आणि त्यांची योग्य परिमाणे ऋग्वेदात (किंवा इतर प्राचीन पुराणांत) दिलेली आहेत अशा प्रकारचा सुभाष काक यांचा एक लेख वाचलेला आठवतो. त्यापैकी नक्की कोणती यज्ञवेदी याची मात्र कल्पना नाही.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;sup&gt;२&lt;/sup&gt; येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भगवान विष्णू,शंकर, राम, कृष्ण, द्रौपदी, दमयंती यासारखी पुराणांतील अनेक प्रमुख पात्रे श्यामलवर्णी आहेत. कोणत्याही अंगाने गोरी नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वरील प्रतिसाद मला पुस्तकातील हा भाग जसा समजला त्यावरून आणि काही इतर वाचनांवरुन &lt;span style="color:#cccccc;"&gt;(जो येथे अत्यल्प आहे.)&lt;/span&gt; थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील चर्चेत उल्लेखलेल्या मुद्द्यांना केवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ विषयाची व्याप्ती प्रचंड आहे आणि या लेखात त्रुटी आढळल्यास चू. भू. द्या. घ्या.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;सर्व चित्रे विकिपिडियावरून.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-2393959442344702545?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/2393959442344702545/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=2393959442344702545' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2393959442344702545'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2393959442344702545'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2007/04/blog-post_26.html' title='आर्य भारतात बाहेरून आले का?'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-2948121790898360296</id><published>2007-04-16T11:50:00.000-07:00</published><updated>2007-04-16T12:18:23.981-07:00</updated><title type='text'>ग्रामदैवत</title><content type='html'>&lt;div&gt;हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते. अर्थात, या लेखाचा हेतू कुलाचाराबद्दल नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ग्रामदैवत या संज्ञेचा विचार केला असता माझ्या तुटपुंज्या ज्ञानाने मला असे आठवते की गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे अशी पूर्वापार प्रथा आहे. हे दैवत पूर, दुष्काळ, भूकंप यांसारखी नैसर्गिक संकटे, रोगराई इ. पासून गावाचे रक्षण करते असा सर्वसामान्य समज असतो. अशा दैवताला ग्रामदैवताचा मान का मिळाला याबाबतही अनेकदा विविध कथा, आख्यायिका ऐकण्यास मिळतात. उदा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रामायणातील सुंदरकांडात हनुमान लंकानगरीत प्रवेश करताना त्याची भेट साक्षात लंकादेवीशी होते. ती हनुमानाचा मार्ग अडवून उभी असल्याने हनुमान तिला आपली ओळख विचारतो. त्यावेळेस ती त्याला पुढील उत्तर देते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;span style="color:#0000ff;"&gt;&lt;strong&gt;अहं राक्षसराजस्य् रावणस्य् महात्मन:&lt;br /&gt;आज्ञाप्रतीक्षा दुर्धर्षा रक्षामि नगरीमिमाम्॥ ५-३-२८&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की मी राक्षसराज रावणाच्या आज्ञा पाळते आणि या नगराचे पराजित होण्यापासून संरक्षण करते. यापुढील श्लोकांवरून असे दिसते की मुष्टीप्रहार करून हनुमान लंकादेवीचा पराभव करतो आणि त्यावर दु:खी होऊन लंकादेवी सांगते की ब्रह्मदेवाने मला सांगितले होते की ज्या दिवशी एक वानर तुझा पराभव करेल त्यानंतर लंकानगरी आणि राक्षसांचा पराभव अटळ आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पौराणिक कथा सोडून इतिहासात पाहायचे झाल्यास ग्रामदैवताची अनेक उदाहरणे मिळतात. जसे, पुणे गाव नव्याने वसवताना जिजाबाईंनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची स्थापना केली. मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी ही मूळ कोळी समाजाची देवता. मुंबादेवीचे मंदिर १७ व्या शतकात बांधले गेल्याचा पुरावा सापडतो&lt;span style="color:#999999;"&gt;.(नक्की काळाबद्दल अनेक मतप्रवाह दिसले. हे मंदिर सुमारे ६०० वर्षांपूर्वी बांधले गेल्याचेही वाचण्यास मिळते.) &lt;/span&gt;मुंबा हे महाअंबा या नावाचे भ्रष्ट स्वरूप असल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिराची स्थापना मुंबा नावाच्या स्त्रीने केल्याने त्याला मुंबादेवी असे नाव पडल्याची गोष्टही ऐकवली जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका आख्यायिकेनुसार मुंबारक नावाचा राक्षस गावातील नागरिकांना त्रास देत असे. त्याचा धुमाकूळ वाढत चालल्याने त्रस्त नागरिकांनी ब्रह्मदेवाची उपासना केली. प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने आपल्या दिव्यशक्तीने एका आठ भुजांच्या देवीची निर्मिती केली. या देवीने मुंबारकाचा नि:पात केला. पश्चात्तापदग्ध मुंबारकाने देवीला शरण जाऊन आपल्या नावाने तिचे मंदिर उभारण्याचा पण केला, आणि अशा रीतीने मुंबादेवी हे नाव आणि मंदिर अस्तित्वात आले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शहरे वगळून जर लहान गावांकडे किंवा खेड्यांकडे वळले, तर ग्रामदैवताची संकल्पना थोडी बदलते. बरेच ठिकाणी अकाली आणि अनैसर्गिक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे, नागाचे किंवा ज्या मूळ पुरुषामुळे गाव अस्तित्वात आले अशा व्यक्तीचे मंदिर स्थापले जाते. बर्‍याचदा अशी मंदिरे एखाद्या झाडाच्या पारावर, दगडांना शेंदूर लावून बनवलेलीही आढळतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रकार कसेही असोत, बाह्य आणि अंतर्गत दुष्ट शक्तींपासून त्या गावाचे किंवा नगराचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूच्या किंवा ग्रामस्थांच्या मनात एका प्रकारचे आदरयुक्त भय निर्माण व्हावे या हेतूने ग्रामदैवताची स्थापना केली जात असे. याच पार्श्वभूमीवर इतर संस्कृतींत ही प्रथा होती का याचा शोध घेतला असता, आग्नेय आशियातील बौद्ध संस्कृतीत ती होतीच, असे दिसते. याखेरीज पाश्चिमात्य संस्कृतींतही ती असल्याचे आढळते. या लेखात ग्रीक संस्कृतीतील एका ग्रामदैवताबद्दल थोडीफार माहिती लिहीत आहे.&lt;br /&gt;&lt;a href="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/35/Ac.parthenon5.jpg"&gt;&lt;img style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 200px; CURSOR: hand" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/35/Ac.parthenon5.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अथेना&lt;/strong&gt; ही बुद्धीचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता ग्रीसची राजधानी अथेन्स या शहराची ग्रामदेवता आहे. या शहराला अथेन्स हे नाव या देवतेवरूनच पडल्याचे सांगितले जाते. प्राचीन अथेन्समध्ये ख्रि.पू.५०० च्या सुमारास &lt;strong&gt;पार्थेनॉन &lt;/strong&gt;या अथेनाच्या देवळाची स्थापना केली गेल्याचे सांगितले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ग्रीक कलाकुसरीचा अप्रतिम नमुना आणि अद्याप व्यवस्थित असणारी एक प्राचीन वास्तू म्हणून पार्थेनॉनला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे. पार्थेनॉनची रचना आयताकृती असून ८ स्तंभ x १७ स्तंभ अशा रचनेवर संपूर्ण मंदिर उभे आहे. हे मंदिर पूर्ण करण्यास सुमारे १६ वर्षांचा कालावधी लागल्याचे सांगितले जाते. फिडिअस नावाच्या शिल्पकाराने या मंदिराचे बांधकाम केल्याचे कळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरिकेत टेनसी राज्यातील नॅशविल या शहरात पार्थेनॉनच्या मंदिराची पूर्णाकृती प्रतिकृती १८९७ साली बनवली गेली. या वास्तूला भेट देण्याचा हल्लीच योग आला. टेनसी राज्याच्या शताब्दीप्रीत्यर्थ या इमारतीची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या इमारतीचा कलादालन म्हणून उपयोग केला जातो. अनेक ग्रीक शिल्पांच्या अप्रतिम प्रतिकृतींनी या इमारतीतील दालने सजलेली आहेत. सर्वात भव्य मूर्ती अर्थातच अथेनाची. पाश्चिमात्य जगतातील बंदिस्त आवारातील ही सर्वात मोठी मूर्ती गणली जाते.&lt;br /&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: left; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;br /&gt;&lt;tbody&gt;&lt;br /&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;a title="Photo Sharing" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/453105915/"&gt;&lt;img height="180" alt="नॅशविलचे पार्थेनॉन" src="http://farm1.static.flickr.com/168/453105915_014f9973bb_m.jpg" width="240" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;br /&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td class="caption"&gt;नॅशविलचे पार्थेनॉन&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मूळ मंदिरात असणारी अथेनाची मूर्ती फिडिअस या शिल्पकाराने संपूर्णत: सोन्यात आणि हस्तिदंतात बनवली असल्याचे परंतु ग्रीसवरील अनेक परकीय स्वार्‍यांत या मूर्तीची लूट केली गेल्याचे आणि कालांतराने मंदिराला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक अभ्यासावरून १९९० साली नॅशविलच्या प्रतिकृती मंदिरात सुमारे ४२ फुटांची अथेनाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि २००२ साली तिला सुवर्णवर्खाने सजवण्यात आले.&lt;br /&gt;&lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;br /&gt;&lt;tbody&gt;&lt;br /&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;a title="Photo Sharing" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/453105929/"&gt;&lt;img height="240" alt="अथेना" src="http://farm1.static.flickr.com/168/453105929_d79d26e5c9_m.jpg" width="180" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;br /&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td class="caption"&gt;अथेना&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मूर्तीचे सर्वसाधारण वर्णन करायचे झाल्यास या मूर्तीच्या उजव्या हातात अथेनाची सहकारी ग्रीक देवता &lt;strong&gt;नाइकी&lt;/strong&gt; (Nike) अथेनाच्या डोक्यावर चढवण्यासाठी विजयी मुगुट घेऊन उभी आहे. अथेनाच्या डाव्या हातात प्रचंड आकाराची ढाल असून त्यावर ग्रीक देव आणि दानव यांच्यातील युद्धाची चित्रे कोरलेली आहेत. तिच्या डाव्या खांद्यावर रेललेला भाला आणि पायाशी सर्प आहे. हा सर्प म्हणजे &lt;strong&gt;एरिकथोनिअस&lt;/strong&gt; हा अथेनाचा मानसपुत्र. आपल्या ढालीमागे त्याला दडवून ती एरिकथोनिअसचे रक्षण करते असे सांगितले जाते. अथेनाच्या चिलखतावर मेडुसा या राक्षसीचे मुंडके लावलेले आढळते. ग्रीक पुराणांनुसार &lt;strong&gt;पर्सिअस&lt;/strong&gt; या योद्ध्याला अथेनाने &lt;strong&gt;मेडुसाचा&lt;/strong&gt; नि:पात करण्यात मदत केली होती. विजयी झाल्यावर पर्सिअसने ते मुंडके अथेनाला भेट दिल्याचे सांगितले जाते. अथेनाच्या ढालीवरही मध्यभागी हे मुंडके दाखवले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मूर्तीची वस्त्रे आणि आभूषणे सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. भाला, ढाल, सर्प आणि नाइकी देखील सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. अथेनाचा चेहरा त्यामानाने बराच भडक रंगवलेला दिसतो. याचे स्पष्टीकरण जवळच वाचता येते. अनेक पौराणिक कथा आणि पुराव्यांच्या आधारे मूर्तिकाराने मूर्तीला असे स्वरूप दिल्याचे सांगितले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरिकेतील रहिवाशांना नॅशविलला जाण्याची संधी मिळाल्यास या अप्रतिम कलादालनाला जरूर भेट द्यावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color:#0000cc;"&gt;अवांतर: या कलादालनात एका छायाचित्रकाराने काश्गर, चीन येथे काढलेली काही अप्रतिम प्रकाशचित्रे पाहण्यास मिळाली. पिवळ्या कांतीच्या आणि नाजूक शरीरयष्टीच्या चिनी लोकांपेक्षा बरेच वेगळे दिसणारे हे लोक, त्यांच्या भटक्या जमाती, जत्रा, गाढवांचा बाजार इ. ची अप्रतिम प्रकाश/छायाचित्रे येथे लावली होती. भारतातील कुशाण राजे याच भागातून आले होते. याशिवाय या कलादालनात अतिशय अप्रतिम तैलचित्रांचा समावेश आहे.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भसूची:&lt;br /&gt;&lt;a title="इंग्रजी विकिपीडियावर पार्थेनॉन" href="http://en.wikipedia.org/wiki/Parthenon"&gt;इंग्रजी विकिपीडियावर पार्थेनॉन&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a title="नॅशविलचे पार्थेनॉन " href="http://www.nashville.gov/parthenon/"&gt;नॅशविलचे पार्थेनॉन &lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a title="ग्रीक दैवते" href="http://www.hol.gr/greece/ancgods.htm"&gt;ग्रीक दैवते&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#666666;"&gt;खुलासा: वरील लेख परिपूर्ण असल्याचा दावा नाही. रामायणातील संस्कृत श्लोक जसा मिळाला तसा टंकित केला आहे. जाणकारांना या लेखात त्रुटी आढळल्यास सुधारणा करण्यास मदत करावी. लेखासंदर्भात इतर माहिती प्रतिसादांतून लिहावी अशी विनंती.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-2948121790898360296?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/2948121790898360296/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=2948121790898360296' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2948121790898360296'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2948121790898360296'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2007/04/blog-post.html' title='ग्रामदैवत'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://farm1.static.flickr.com/168/453105915_014f9973bb_t.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-6521337569704778176</id><published>2007-03-27T18:52:00.000-07:00</published><updated>2007-03-27T18:58:13.848-07:00</updated><title type='text'>खूब लड़ी मर्दानी</title><content type='html'>सध्या मी &lt;a href="http://www.amazon.com/Hero-Thousand-Faces-Mythos-Books/dp/0691017840"&gt;The hero with a thousand faces &lt;/a&gt;हे जोसेफ कॅम्पबेल यांचे पुस्तक वाचत आहे. जगातील सर्व परीकथा, पौराणिक कथा आणि धार्मिक कथा यांतून येणार्‍या नायकांची (legendary heroes) कथा ही एकमेकांशी मोठ्या प्रमाणात साम्य दाखवते अशी या पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना आहे. स्टार वॉर्सचा निर्माता/ दिग्दर्शक जॉर्ज ल्युकस याने या संकल्पनेचे आपण ऋणी असल्याचे सांगितले असल्याचे वाचनात येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पौराणिक कथा आणि परीकथांप्रमाणेच बर्‍याचशा ऐतिहासिक व्यक्तींमध्ये आणि त्यांच्या जीवनकार्यातही एक विलक्षण साम्य दिसते. अनन्वित अन्याय, त्यातून निर्माण होणारा असंतोष, नायकाचा जन्म, त्याचे निराळे अनुभवविश्व आणि प्रस्थापित शक्तीविरुद्ध त्याने दिलेला लढा, त्यात मिळालेला अंतिम विजय किंवा प्राणांची आहुती. कथानायकांचे जीवन बरेचदा एकाच चाकोरीतून गेल्याचे आढळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मध्यंतरी अचानक सुभद्राकुमारी चौहान यांची 'खूब लड़ी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी।' ही कविता बर्‍याच वर्षांनी पुन्हा वाचण्याचा योग आला. आपल्यापैकी बरेचजण शाळेत ही कविता शिकले असतील. झाशीच्या राणीविषयी वेगळे काय लिहायचे? तिचे शौर्य, तिचा पराक्रम सर्वज्ञात आहे. भारतीय इतिहासात राणी लक्ष्मीबाईची कथा माहित नाही असा माणूस मिळणे कठिण. राजघराण्यात झालेला विवाह, अकाली वैधव्य, ब्रिटिशांकडून दत्तक विधान नाकारले जाणे, १८५७ चे बंड, 'मेरी झांसी नहीं दूंगी' असा राणीने घेतलेला कणखर पावित्रा, ब्रिटिशांशी निकराने दिलेली झुंज आणि पत्करलेले वीरमरण.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;राणीची कहाणी शब्दांत बांधणार्‍या सुभद्राकुमारी चौहान या स्वत: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सत्याग्रही होत्या. त्यांची जालियांवाला बागेवरील कविताही प्रसिद्ध आहे. 'खूब लड़ी मर्दानी...' या कवितेत त्यांनी राणीच्या बालपणाचे, लग्नाचे, वैधव्याचे, ब्रिटिशांच्या मुजोरीचे, राणीने शर्थीने दिलेल्या झुंजीचे आणि तिच्या बलिदानाचे यथार्थ वर्णन केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,&lt;br /&gt;बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी,&lt;br /&gt;गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,&lt;br /&gt;दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।&lt;br /&gt;चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,&lt;br /&gt;&lt;br /&gt;बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,&lt;br /&gt;खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जे काही माझे आहे ते मी तुम्हाला कदापि देणार नाही या भावनेतून एक मध्ययुगीन स्त्री प्रबळ ब्रिटिश सैन्यासमोर उभी राहते, शर्थीने मुकाबला करते आणि त्या यज्ञात आपली आहुती देते. आपले प्रेतही ब्रिटिशांच्या हाती लागू नये अशी इच्छा बाळगणार्‍या राणी लक्ष्मीबाईची कहाणी स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणादायी ठरली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;याच धर्तीवर मला इ.स.६०-६१ साला दरम्यानच्या आयसेनी जमातीच्या केल्टिक राणी बूडिका (बोअडिसिया) हिची कहाणी वाचायला मिळाली आणि दोन्ही गोष्टींत साम्य जाणवले. बूडिका या शब्दाचा अर्थ विजयी (विजया) असा होतो. पूर्व इंग्लंडच्या नॉरफोक प्रांताचा राजा रोमन साम्राज्याला पाठिंबा देणारा परंतु स्वतंत्र राज्याचा राजा होता. आपल्या मृत्यूनंतर त्याने आपल्या राज्याची धुरा आपल्या दोन मुली आणि रोमन साम्राज्यावर यावी असे &lt;a href="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/f/fc/Boudiccastatue.jpg"&gt;&lt;img style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 273px; CURSOR: hand; HEIGHT: 212px" height="186" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/f/fc/Boudiccastatue.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;सुचवले होते. परंतु रोमन साम्राज्य मुलींना राज्याचा उत्तराधिकारी मानत नसल्याने त्यांनी हे राज्य खालसा केले आणि ते रोमन साम्राज्याच्या घशात घातले. राणी बूडिकाने या जुलुमाविरुद्ध आवाज उठवला असता तिच्या दोन्ही मुलींवर बलात्कार करण्याची आणि राणीला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. याप्रकाराने संतप्त झालेले आयसेनीचे नागरिक आपल्या राणीच्या बाजूने उभे राहिले आणि राणीने आपल्या मुलींना रथात आपल्या बाजूला उभे करून स्वत: जातीने या बंडखोरांच्या सैन्याचे नेतृत्व केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;टॅसिटस या रोमन इतिहासकाराने राणीच्या तोंडी आवेशपूर्ण भाषण घातले आहे त्याचा गोषवारा पुढीलप्रमाणे - “मी माझी गमावलेली दौलत मिळवायला निघालेली राजस्त्री आहे असे कोणी समजू नये तर मी चाबकाच्या फटक्यांनी जखमी झालेली आणि माझ्या मुलींच्या अब्रूचे धिंडवडे काढणा‍र्‍यांविरुद्ध माझे गमावलेले स्वातंत्र्य मिळवायला पेटून उठलेली सामान्य नागरिक आहे. आपले ध्येय न्याय्य आहे आणि देव आपल्या पाठीशी आहे. मी एक स्त्री असूनही या युद्धात जिंकणे किंवा मरणेच पसंत करते, पुरुषांना गुलामगिरीत जगायचे असेल तर तो त्यांचा निर्णय असेल.”राणीच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या काही चकमकींत आयसेनीच्या सैन्याला विजय प्राप्त झाला परंतु पुढे जरी राणीच्या सैन्याची संख्या रोमन साम्राज्याच्या सैन्याहून अधिक असली तरीही आधुनिक शस्त्रांत्रांचा अभाव, शिस्त आणि मैदानी लढाई खेळण्याचा अनुभव नसलेल्या राणीच्या सैन्याचा रोमन साम्राज्याशी झालेल्या तुंबळ युद्धात पराभव झाला आणि शत्रूच्या हाती लागण्याऐवजी तिने विष खाऊन मरण पत्करले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;राणी विक्टोरियाच्या काळात विक्टोरिया बूडिकाला आपला आदर्श मानत असल्याने तिला असामान्य महत्त्व प्राप्त झाले. आजही इंग्लंडमध्ये तिला सांस्कृतिक प्रतिक मानले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीतरी एखादी गोष्ट वाचताना अचानक त्यातील प्रसंग आपण पूर्वी कधीतरी वाचले आहेत (deja vu) याची जाणीव आपल्याला होते. एखादे व्यक्तीविशेष वाचतानाही असाच भास बरेचदा होतो. इतिहास आमचा त्यांचा या समुदायासाठी लिहिलेला पहिला लेख मला एखाद्या कर्तृत्ववान ऐतिहासिक स्त्री विषयी लिहिण्याचे मनात होते, The hero with a thousand faces, बूडिका आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल एकाच वेळी वाचन करण्याचा योग आला. दोन्ही व्यक्तिंच्या जीवनकथेत विलक्षण साम्य दिसले आणि तारा आपोआप जुळत गेल्या.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-6521337569704778176?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/6521337569704778176/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=6521337569704778176' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/6521337569704778176'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/6521337569704778176'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2007/03/blog-post.html' title='खूब लड़ी मर्दानी'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-2213188412323790759</id><published>2007-01-11T06:09:00.000-08:00</published><updated>2007-02-19T17:32:38.470-08:00</updated><title type='text'>अप्सरा</title><content type='html'>खालील लेख विखुरलेला मोती म्हणता येईल का याची नक्की कल्पना नाही. कदाचित यावा, अप्सरांबद्दल माहिती गोळा करावी असे काही दिवसांपूर्वी डोक्यात आले परंतु ही माहिती आपल्या पुराणांत संकलित नसून सर्वत्र विखुरलेली आहे. ती एकत्र करणे हे माझ्या दृष्टीने कठीण कार्य होते कारण अमेरिकेत बसून इंटरनेट व्यतिरिक्त इतर कोणताही स्त्रोत उपलब्ध नसणे आणि संस्कृताच्या अत्यंत अल्प ज्ञानाचा उपयोग लेख लिहिण्यासाठी करणे हे महादिव्यच होते. मूळ लेख मराठी विकिपीडियासाठी लिहिला होता. तो अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे. सगळे संदर्भ शोधणे, त्यांचा पाठपुरावा करणे हे मला एकटीला संगणकासमोर बसून शक्य नाही तरी जितके शक्य झाले ते पुढे मांडले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#33cc00;"&gt;&lt;strong&gt;अप्सरा&lt;/strong&gt; &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;हिंदू पुराणांनुसार अप्सरा या स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबाराला नृत्यगायनाने रिझवणार्‍या स्वर्गीय सुंदर्‍या होत्या असे सांगितले जाते. ऋग्वेदानुसार अप्सरा या गंधर्वांच्या पत्नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत अप्सरा निपुण असल्याचे सांगितले जाते. मानवांच्या नीतीमत्ता व तत्त्वे अप्सरांना लागू नव्हत्या असे अनेक कथांतून दिसते. इतर कोणतेही मर्त्य राजे, देव-दानव किंवा ऋषी-मुनी स्वत:पेक्षा श्रेष्ठ होऊ नयेत आणि इंद्रपद बळकावू नयेत म्हणून या राजांना व ऋषी-मुनींना भुलवण्यासाठी, त्यांच्या उद्देशापासून दूर सारण्यासाठी देवराज इंद्र या अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्याकामी वापरत असे असे पुराणांत दाखले मिळतात.&lt;br /&gt;&lt;a href="http://upload.wikimedia.org/wikipedia/mr/2/28/Apsara_relief.jpg"&gt;&lt;img style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 200px; CURSOR: hand" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/mr/2/28/Apsara_relief.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भागवत पुराणानुसार कश्यप ऋषींच्या बारा पत्नींपैकी मुनी ही पत्नी या अप्सरांची माता असल्याचे दाखले दिले जातात. काही कथांमध्ये स्वत: ब्रह्मदेवांने अप्सरांची निर्मिती केल्याचे वाचायला मिळते. याशिवाय, मेरू पर्वताच्या समुद्रमंथनाच्या कथेतून अप्सरा हे रत्न निघाल्याचा उल्लेखही सापडतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हिंदू पुराणकथा, वेद, महाकाव्ये व नाट्यशास्त्राच्या आधारे काही अप्सरांची नावे दिली आहेत -&lt;br /&gt;&lt;br /&gt;अद्रिका, अल्मविशा, अंबिका, अन्वद्या, अनुचना, अरूणा, असिता, बुदबुदा, देवी, घृताची, गुणमुख्या, गुणवरा, काम्या, कर्णिका, केशिनी, क्षेमा, चित्रलेखा, लता, लक्ष्मणा, मनोरमा, मरिची, मेनका, मिश्रकेशी, मिश्रस्थला, पूर्वचित्ती, रक्षिता, रंभा, रितुशाला, सहजन्या, समिची, सौदामिनी, सौरभेदी, शरद्वती, शुचिका, सोमा, सुवाहू, सुगंधा, सुप्रिया, सुरजा, सुरसा, सुरता, सुलोचना, तिलोत्तमा, उमलोचा, ऊर्वशी, वपु, वर्गा, विद्युत्पर्णा आणि विश्वची. या खेरीजही इतर अनेक अप्सरांचा उल्लेख हिंदू पुराणांमध्ये दिसून येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इंद्राच्या दरबारात २६ अप्सरा होत्या. त्यापैकी ऊर्वशी, मेनका, रंभा व तिलोत्तमा या नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत होत्या. या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इंद्राच्या दरबारात स्थान न दिलेल्या काही अप्सरा वनदेवी, जलकन्यांच्या स्वरूपांत पुराण कथेत स्थान मिळवतात. उदा. रामायणातील किष्किंधा कांडात 'हेमा' नावाच्या वनातील अप्सरेचा संदर्भ सापडतो. रामायण, महाभारत, भागवत् पुराण, वेद या सर्वांत अप्सरांचे उल्लेख व अनेक कथा आढळतात. कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका ऊर्वशी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारताबाहेर आग्नेय आशियातील अनेक कथांमध्ये व विशेषत: आंग्कोर वाट मंदिराच्या कलाकुसरीत व कोरीव कामात या अप्सरा आढळतात. हिंदू पुराणकथांव्यतिरिक्त बौद्ध, ग्रीक, रोमन आणि नॉर्डिक पुराणांतही अप्सरांचा उल्लेख आढळतो. त्याकथांनुसारही मर्त्य मानवांना किंवा देवांना वश करण्याचे कार्य अप्सरा करत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;color:#33cc00;"&gt;रामायणातील अप्सरांचे संदर्भ&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रामायणात बर्‍याच ठिकाणी अप्सरांचे उल्लेख आढळतात. त्यापैकी काही श्लोक खाली दिले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;अप्सु निमर्थनात् एव रसात् तस्मात् वर स्त्रिय:।&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;उत्पेतु: मनुज श्रेष्ठ तस्मात् अप्सरसो अभवन् ॥ १-४५-३३&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;हा श्लोक बालकांडात येतो. राम-लक्ष्मणांना विश्वामित्र सम्रुद्रमंथनाची कथा सांगत असताना समुद्र मंथनातून अप्सरा हे रत्न निघाल्याचे सांगतात. यानंतर येणार्‍या श्लोकांतून अप्सरांच्या सौंदर्याचे वर्णन येते. तसेच विश्वामित्रांच्या कथेनुसार अप्सरांना आपला प्रियकर म्हणून देव, दानव, मानव यासर्वांची निवड करण्याची मुभा होती. लग्नबंधनाच्या नीतिनियमांपासून त्या मुक्त होत्या या अर्थांचे श्लोकही बालकांडात येतात.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;घृताचीम् अथ विश्वाचीम् मिश्र केशीम् अलम्बुसाम् ।&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;नागदन्तां च हेमा च हिमामद्रिकृतस्थलाम् ॥ २-९१-१७&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;अयोध्याकांडातील या श्लोकांत भारद्वाज मुनीनी केलेल्या भरताच्या आदर सत्कारात घृताची, विश्वाची, मिश्रकेशी, अलम्बुसा, नागदंता, हेमा व हिमा या अप्सरांना पाचारण केल्याचा उल्लेख येतो. या सर्व नृत्य, गायन व वादन कलांत निपुण होत्या आणि त्यांनी भरत व अयोध्येच्या सेनेला रिझवण्यासाठी नृत्य-गायन केल्याचा उल्लेखही नंतरच्या श्लोकांतून येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;color:#33cc00;"&gt;महाभारतातील अप्सरांचे संदर्भ&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाभारतात वनपर्वात अर्जुन व ऊर्वशीमधील संवाद येतो. ऊर्वशी ही कुरूवंशातील राजा पुरुरव्याची पत्नी असल्याने आणि अर्जुन हा पुरुरव्याचा वंशज असल्याने, कामातुर ऊर्वशीचा स्वीकार करण्यास अर्जुन नकार देतो. यावर ऊर्वशी सांगते, "अप्सरा या नीतिनियमांतून मुक्त असून आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरूष निवडतात. यामुळे मी जरी कुरूकुलातील तुझी पूर्वज असले तरी पुरूरव्याची मुले-नातवंडे जी कालांतराने येथे स्वर्गात आली त्या सर्वांनी माझ्याशी संग केला आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर."&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्जुन या मागणीचा अव्हेर करतो आणि संतप्त होऊन ऊर्वशी त्याला शाप देते, जो पुढे बृहन्नडेच्या रुपाने खरा ठरतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;याप्रमाणे अनुशासनपर्वात पंचचुडा या अप्सरेची व शांतीपर्वात घृताची या अप्सरेची कथा येते. घृताचीच्या कथेत अप्सरांना आपले रूप पालटण्याची विद्या अवगत असल्याचे दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#33cc00;"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;इतर संस्कृतीतील अप्सरांचे संदर्भ&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;कंबोडियातील अप्सरा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कंबोडियाच्या संस्कृतीवर हिंदू आणि बौद्ध धर्माचा पगडा असल्याने हिंदू देव-देवता तसेच गंधर्व, अप्सरा यांना कंबोडियाच्या संस्कृतीत एक वेगळे स्थान मिळाले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आंग्कोर वाट अप्सरा :&lt;/strong&gt; आंग्कोर वाटच्या मंदिराच्या भींतींवर अनेक अप्सरा नृत्य व वादन करताना कोरलेल्या आढळतात. मंदिरातील देव देवतांना प्रसन्न राखण्यासाठी अप्सरांचे कोरीव काम करण्यात आल्याचे सांगण्यात येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अप्सरा नृत्य:&lt;/strong&gt; ख्मेर राज्यकाळापासून कंबोडियात अप्सरा नृत्य करण्याची प्रथा आहे. पूर्वी मंदिरात देवतांना प्रसन्न करण्याकरता हे अभिजात नृत्य केले जात असे. आज या नृत्याला कंबोडियाच्या पारंपारिक नृत्याचा दर्जा आहे. बरेचदा हे नृत्य, नृत्यनाट्य म्हणून सादर केले जाते. यक्ष, किन्नर, अप्सरा, गरूड, ऋषी अशा अनेक भूमिका या नृत्यातून फुलवल्या जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेशमी वस्त्रे, आभूषणे, नाजूक पदन्यास व नत्यमुद्रांद्वारे केल्या जाणार्‍या या नृत्यात आंग्कोर वाटच्या मंदिरातील भिंतींवर कोरलेल्या अप्सरांचे दर्शन होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थायलंडमध्येही असे नृत्य केले जाते परंतु त्याला अप्सरा नृत्य म्हणण्याचा प्रघात नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;चीन मधील मोगाओ गुहा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;चीनमधील दुनहुआंग प्रांतात इ.स.पूर्व ४००व्या शतकातील बौद्ध भिक्षूंनी कोरलेल्या गुहा आहेत. हिंदू कलाकुसरीचा या गुहांवर मोठा प्रभाव दिसतो. यातील काही चित्रांत व लेण्यात अप्सरांचा समावेश आहे. या अप्सरा स्वर्गस्थ दाखविल्या असून त्या अवकाश विहार करतानाही दिसतात. काही ठिकाणी नृत्य, वादन करतानाही त्यांचे चित्रण केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चीनमधून पुढे कोरियातही अप्सरांचा कलाकुसर व चित्रकलेत समावेश झालेला आढळतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;जपानमधील अप्सरा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेन्यो नावाच्या स्वर्गीय सुंदरी स्वर्गात बुद्ध व बोधिसत्त्वांसमवेत राहात असल्याचे संदर्भ मिळतात. तेन्योंचा उगम संस्कृतातील अप्सरांवरून झाल्याचे सांगितले जाते. पुढे बौद्ध धर्माच्या प्रसारासमवेत चीनमार्गे जपानात यांचा प्रसार झाल्याचे दिसते. पारंपारिक पंचरंगी किमोनो, उंची आभूषणे ल्यालेल्या या सुंदरींना जपानी चित्रकला, बौद्ध मंदिरातील कोरीवकामांत व इतर कलाकुसरींमध्ये एक आगळे स्थान आहे आणि त्यांच्या अनेक कथा जपानात सांगितल्या जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://mr.wikipedia.org/wiki/à¤à¤ªà¥à¤¸à¤°à¤¾"&gt;विकिपीडियावरील लेखाचा दुवा&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-2213188412323790759?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/2213188412323790759/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=2213188412323790759' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2213188412323790759'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/2213188412323790759'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2007/01/blog-post.html' title='अप्सरा'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-116187243133686378</id><published>2006-10-26T07:19:00.000-07:00</published><updated>2006-10-26T12:10:49.580-07:00</updated><title type='text'>जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर</title><content type='html'>&lt;p&gt;इ. स. १८६० साली एक फ्रेंच संशोधक (Henri Mahout) कंबोडियाच्या मध्यभागी असणार्‍या टोन्ले सॅप सरोवराच्या जवळपास जंगलात पदभ्रमण करत असता त्याला एका भव्य अशा प्राचीन वास्तूचे भग्नावशेष दिसले. त्याबद्दल त्याने जे लिहिले त्यातील काही विशेष वाक्यांचा स्वैरानुवाद येथे देत आहे...&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;"...ही वास्तू उभारताना लागलेले अपार कष्ट आणि कारागिरी पाहिली की मन कौतुकाने उचंबळून येते आणि एक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही... या भव्य वास्तूची निर्मिती करणार्‍या त्या महान आणि शक्तिमान संस्कृतीचे पुढे झाले तरी काय?..."&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p align="center"&gt;&lt;a href="http://www.hinduwisdom.info/images/angkor_aerialview.jpg"&gt;&lt;img height="400" alt="arial veiw" src="http://www.hinduwisdom.info/images/angkor_aerialview.jpg" width="500" align="center" /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;हे वर्णन कंबोडियातील प्राचीन हिंदू मंदिर 'एंगकोर वट'चे आहे. अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि भव्य शिल्पकलांचा नमुना म्हणून ओळखले जाणारे एंगकोर वट हे मध्ययुगात 'व्रह विष्णुलोक' &lt;span style="color:#c0c0c0;"&gt;(गृह विष्णुलोक?) &lt;/span&gt;म्हणून ओळखले जाई.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;a href="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/8/8b/Angkor_Wat_W-Seite.jpg"&gt;&lt;img height="150" alt="Angkor Wat" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/8/8b/Angkor_Wat_W-Seite.jpg" width="150" align="right" /&gt;&lt;/a&gt; &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;इतिहास:&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;कंबोडियाच्या मध्यभागी असणाऱ्या एंगकोर या प्राचीन ख्मेर राजधानीच्या भग्नावशेषांत एंगकोर वटचे मंदिर आजही उठून दिसते. संस्कृत "नगर" या शब्दाचे अपभ्रष्ट ख्मेर रूप "नोकोर"वरून नंतर "एंगकोर"ची व्युत्पत्ती झाली व "वाटिका" या शब्दापासून "वट" या शब्दाची निर्मिती झाली असा इतिहास वाचण्यास मिळतो. हिंदू व बौद्ध स्थापत्यशास्त्रांचा उपयोग करून बांधलेले एंगकोर वट हे भगवान विष्णूंचे जगातील सर्वात मोठे मंदिर समजले जाते. या मंदिराची निर्मिती भारतीय खगोलशास्त्राचे नियम वापरून करण्यात आली आहे असे सांगितले जाते.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;ख्मेर राज्यकर्ता यशोवर्मन पहिला याने सुमारे इ. स. ८८९च्या काळात टोन्ले सॅप सरोवराच्या उत्तरेला यशोधरापुर नावाची आपली राजधानी स्थापन केली. या नगराच्या सभोवती त्याने खंदक खोदून नगराला सुरक्षित बनवले. कालांतराने या शहरालाच एंगकोर म्हटले जाऊ लागले. यशोवर्मननंतरच्या सर्व राजांनी आपापल्या परीने या नगरात बांधकाम करून त्याची शोभा वाढवली. एंगकोर वटची स्थापना सूर्यवर्मन दुसरा (राज्यकाळ: इ. स. १११३- ११४५) याच्या काळात सुरू झाली. सूर्यवर्मनचा राज्यकाळ तसा धामधुमीचा गेला, तरीही सुमारे ३७ वर्षे हे बांधकाम अखंडित चालले. राजा सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतर हे काम सततच्या युद्धांमुळे व आक्रमणांमुळे थांबून राहिले. पुढे जयवर्मन सातवा (राज्यकाळ: इ. स. ११८१- १२१९) याच्या काळात बांधकाम पुन्हा रुजू करण्यात आले. परंतु या वेळेपर्यंत कंबोडियात थेरवाद बौद्धधर्माचा प्रसार झाल्याने बांधकामात बौद्ध स्थापत्यशास्त्राचा प्रभाव आढळतो.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;मंदिराचे बांधकाम:&lt;/span&gt;&lt;/strong&gt; &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;एंगकोर वटचे मंदिर सर्व बाजूंनी पाण्याच्या खंदकांनी वेढलेले असल्याने कालांतराने या भागांत चहूबाजूंनी जंगल वाढले तरीही ते फारशी पडझड न होता सुरक्षित राहिले. संपूर्ण जगात स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना म्हणून गणल्या गेलेल्या या मंदिराच्या बांधकामात हिंदू आणि बौद्ध शिल्पकलांचा सुरेख संगम झाला आहे.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;a href="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/3d/Angkor-wat-central.jpg"&gt;&lt;img height="150" alt="Angkor Wat model" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/3d/Angkor-wat-central.jpg" width="150" align="right" /&gt;&lt;/a&gt; &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;हे मंदिर पश्चिमाभिमुख असून त्यातील मुख्य देवालय हिंदू पुराणातील मेरू पर्वताची प्रतिकृती मानले जाते. या स्थानाची लांबीरुंदी १५०० मीटर x १३०० मीटर असून ते जमीनीच्या तीन स्तरांवर (वेगवेगळ्या उंचीच्या तीन प्रांगणांत) बांधलेले आहे. मुख्य मंदिराच्या सभोवती पाच गोपुरांच्या शिल्पकलेने सुशोभित अशा सुरेख भिंती आहेत. या भिंती मेरूपर्वताला घातलेल्या वासुकीच्या विळख्याचे प्रतीक समजल्या जातात. गोपुरांच्या बुरुजांवर ब्रह्मदेवाचे मुख कोरलेले असून पायाजवळ कोरलेले त्रिमुखी हत्ती प्रत्येक सोंडेत कमलपुष्प धरून प्रवेशद्वारांची शोभा वाढवतात. मुख्य देवळापासून चौथ्या भिंतीसभोवती खणलेल्या खंदकाला क्षीरसागराचे प्रतीक समजतात. मंदिराची सर्वात बाहेरील भिंत ४.५ मीटर उंचीची असून पश्चिम दिशेकडून तिच्या पुढयातील सुमारे २०० मीटर लांबीच्या खंदकाला सुमारे ३५० मीटर लांबीच्या आणि १२ मीटर रुंदीच्या काजवाटेने (causeway) जमिनीशी जोडलेले आहे. पूर्वेकडूनही अशीच कच्ची काजवाट असून ती पूर्वी बांधकामाचे दगड वाहून नेण्यास व इतर वाहतुकीसाठी वापरली जात असावी.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;हे संपूर्ण मंदिर वालुकाश्माच्या (sandstone) प्रस्तरापासून बनवले असून हे पत्थर अनेक मैल दूर असलेल्या खाणीतून कोरून मंदिराच्या जागी आणल्याचा पुरावा मिळतो. मंदिराचे बांधकाम व कलाकुसर पाहून हजारो गुलामांची, विशारदांची व कारागिरांची फौज या कामी लागली असावी असा अंदाज बांधता येतो.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;मंदिराच्या भिंतींवर व गोपुरांवर अनेक देवतांच्या व अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या गोपुरांना "हत्ती दरवाजे" असेही म्हटले जाते कारण हे दरवाजे हत्तींची सहज ये-जा होण्याइतपत मोठे आहेत. ही गोपुरे ओलांडून आतील प्रांगणात आले असता सर्वप्रथम मुख्य मार्गाच्या उभय बाजूस दोन लहान इमारती आढळतात. त्यांना ग्रंथालये असे म्हटले जाते. यांचा उपयोग नक्की कशासाठी होत असावा याबद्दल शंका असली तरी पुरोहितवर्गाने एकत्र बसून पठण करण्याचे ते स्थान असावे असे समजले जाते. या ग्रंथालयांच्या भिंतीवर प्राचीन ख्मेर भाषेत कोरलेले शिलालेख आढळून येतात. यांत रामायण महाभारतातील संस्कृत श्लोक उद्धृत केलेले आहेत.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;a href="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/3e/Gopurataprohm.JPG"&gt;&lt;img height="150" alt="Gopure" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/3e/Gopurataprohm.JPG" width="150" align="right" /&gt;&lt;/a&gt; &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;हे मंदिर पश्चिमाभिमुख असण्याचे एक कारण असे सांगितले जाते की राजा सूर्यवर्मन याने आपले मृत्यूपश्चात आपले स्मारक राहावे या हेतूने मंदिराची स्थापना केली. या कारणास्तव या मंदिराला 'पिरॅमिड टेंपल' असेही संबोधले जाते. तसेच वैकुंठाला जाणारा मार्ग पश्चिमेकडे आहे असे मानल्याने या देवळाचे प्रमुख प्रवेशद्वार हे इतर हिंदू देवळांप्रमाणे पूर्वेला नसून पश्चिमेला बांधलेले आहे. काही तज्ज्ञांचा या संकल्पनेस विरोध आहे कारण अशी मंदिरे बांधण्याची प्रथा हिंदू धर्मात इतरत्र दिसून येत नाही तर भारतात काही मंदिरे पश्चिमाभिमुख आढळतात.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;a href="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/8/84/Awatoceanofmilk01.JPG"&gt;&lt;img height="150" alt="King Suryavaraman's procession" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/8/84/Awatoceanofmilk01.JPG" width="150" align="left" /&gt;&lt;/a&gt; &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;या स्थानाच्या तिसर्‍या आणि सर्वात उंचावरील प्रांगणात पाच मुख्य मंदिरे आहेत. त्यातील मध्यावरील प्रमुख मंदिरात पोहोचण्यासाठी तीन आयताकृती सज्जे पार करावे लागतात. प्रत्येक सज्जाच्या भिंतींवर व खांबांवर सुरेख कोरीव नक्षीकाम &lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Bas-relief"&gt;(bas-relief)&lt;/a&gt;  केलेले आहे. सर्वात बाहेरील सज्जावर रामायण व महाभारतातल्या अनेक प्रसंग कोरलेले आहेत. यांत राम-रावण यांच्यातील युद्ध तसेच कौरव-पांडव युद्ध यांचा समावेश आहे. दक्षिणेकडील सज्जावर राजा सूर्यवर्मनची मिरवणूक जाताना कोरली आहे तर पूर्वेकडील सज्जावर देव व असुर यांच्यातील मेरूपर्वताच्या साहाय्याने क्षीरसागर घुसळण्याच्या समुद्रमंथनाचा प्रसंग कोरलेला आहे. याखेरीज भगवान विष्णूंनी केलेला असुरांचा पराभव, श्रीकृष्णाने केलेला बाणासुराचा वध अशी अनेक रेखीव शिल्पे कोरलेली आहेत. बौद्धकाळात निर्मिलेल्या एका सज्जात भगवान बुद्धांच्या अनेक मूर्तीही आढळतात. &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;a href="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/d/dd/Cruciformgalleryangkorwat.JPG"&gt;&lt;img height="150" alt="gallery" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/d/dd/Cruciformgalleryangkorwat.JPG" width="150" align="right" /&gt;&lt;/a&gt; &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;या भिंती ओलांडून आत आले की पायऱ्या चढून मुख्य मंदिराकडे जाता येते. येथे पुन्हा एकदा मार्गाच्या उभय बाजूंस ग्रंथालये आढळतात. त्यानंतर पाच मुख्य देवळांचा समूह (quincunx – 'फाशावरील पाचाचा आकडा') दिसतो. कोणत्याही मंगलस्थानी चार दिशांना चार स्तंभ किंवा इमारती उभ्या करून चतु:सीमा निश्चित करणे व मध्यभागी असणाऱ्या वास्तूला/ इमारतीला संरक्षण देणे किंवा तिचे महत्त्व वाढवणे ही वैदिक परंपरा आहे. (उदा. सत्यनारायणाच्या पूजेतील चार खांब व मध्यभागी कलश) या मंदिरांची बांधणीही त्यानुसारच झाल्याचे दिसते. या पाचही मंदिरांतील मध्यावरील मंदिराचा कळस सर्वात उंच असून ते मेरूपर्वताचे प्रतीक समजले जाते. सर्व मंदिरांच्या भिंतींवर अतिशय नाजूक कोरीव काम केलेले आहे. या भिंतींवर प्रामुख्याने देवदेवतांच्या सुबक प्रतिमा कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिरात पूर्वी भगवान विष्णूंची मूर्ती होती, परंतु बौद्धधर्म स्वीकारल्यावर ती मूर्ती बदलून त्या स्थानी आता बुद्धाच्या मूर्ती आढळतात.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;एंगकोर शहरांत एंगकोर वट शिवाय तत्कालीन ख्मेर राजांनी बांधलेली अनेक रेखीव मंदिरे आहेत. राजा हा देवाचा अंश असल्याने देवाची सेवा, प्रार्थना व कर्मकांड याला या समाजात फार महत्त्व असल्याचे दिसते. यांतून देवाशी, राजाशी आणि त्यायोगे राज्याशी एकरूपता व एकसंधता साधण्यास फार मोठी मदत झाली असावी असे वाटते. ख्मेर घराण्याच्या शेकडो वर्षे चाललेल्या राज्यकारभाराला या मंदिरांनी फार मोठा हातभार लावला असावा.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;हे मंदिर पुनश्च उभारताना जयवर्मन सातवा याचे शब्द मंदिरातील एका शिलालेखावर आढळतात, "माझ्या या चांगल्या कार्याचा उपयोग, जीवनाच्या भवसागरात तरून जाण्याची धडपड करणाऱ्या जनसमुदायाला प्रसादाप्रमाणे होवो आणि त्यांना मोक्ष प्राप्त होवो."&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p align="center"&gt;****&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p align="left"&gt;संदर्भसूची:&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;कंबोडिया - मॉडर्न नेशन्स ऑफ द वर्ल्ड - रॉबर्ट ग्रीन&lt;br /&gt;&lt;li&gt;कंबोडिया - ए कंट्री स्टडी - फेडरल रिसर्च डिव्हिजन - लायब्ररी ऑफ काँग्रेस&lt;br /&gt;&lt;li&gt;द सेव्हन्टी वंडर्स ऑफ द एंशन्ट वर्ल्ड&lt;br /&gt;&lt;li&gt;&lt;a href="http://www.theangkorguide.com/text.htm"&gt;द एंगकोर गाइड.कॉम&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;&lt;a href="http://www.hinduwisdom.info/Sacred_Angkor.htm"&gt;हिंदू विस्डम.इन्फो&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;&lt;a href="http://en.wikipedia.org/wiki/Angkor_Wat"&gt;विकिपीडिया- एंगकोर वट&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;li&gt;आणि इतर...&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#999999;"&gt;सर्व चित्रे विकिपीडिया व हिंदूविस्डम.इन्फो यांच्या सौजन्याने घेतली असून त्यावर टिचकी मारली असता ती मोठ्या आकारांत पाहता येतील.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;div id="HA-spellcheck-dictionaries"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-116187243133686378?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/116187243133686378/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=116187243133686378' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/116187243133686378'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/116187243133686378'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2006/10/blog-post.html' title='जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-115772157811550633</id><published>2006-09-08T06:14:00.000-07:00</published><updated>2006-09-08T06:21:03.283-07:00</updated><title type='text'>कंबोडीयाचे हिंदू साम्राज्य (भारताची एक प्राचीन वसाहत)</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;हिंदू धर्म हा जरी जगातला एक पुरातन धर्म समजला गेला तरी इतर धर्मांसारखा या धर्माचा प्रसार मात्र भारताबाहेर फारसा झाला नसल्याचे अनेकदा ऐकू येते. त्यामानाने हिंदू धर्माची एक उपशाखा मानावी अशा बौद्ध धर्माचा प्रसार मात्र दूरपर्यंत झालेला दिसतो. हिंदू धर्म खरंच भारताबाहेर गेला की काय याचा विचार केला असता उत्तर 'तसा तो भारताबाहेरही पसरला' असे येते. हिंदू धर्म एके काळी पूर्वेकडील देशांत पसरला होता, समृद्धीस आणि भरभराटीस आला होता असे दिसून येते. यावर वाचनात आलेला वाल्मीकी रामायणातील एक संस्कृत श्लोक&lt;sup&gt;१&lt;/sup&gt; पुढे उद्धृत केला आहे. &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;यत्नवन्तो यव द्वीपम सप्त राज्य उपशोभितम ।&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;सुवर्ण रूप्यकम द्वीपम सुवर्ण आकर मण्डितम ॥ ४-४०-३० &lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;किष्किंधा कांडात सुग्रीव वानरांना पूर्व दिशेस जाऊन सीतेचा शोध घेण्यास सांगतो, त्यावेळेस नक्की कुठल्या ठीकाणी शोध घ्यावा याची माहिती तो वरील श्लोकात देतो. यव द्वीप हे जावा बेटाचे आणि त्या भोवतीच्या इतर बेट समूहाचे वर्णन आहे असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजेच वाल्मीकींना ज्याअर्थी यव द्वीपाची माहिती होती त्याअर्थी त्याकाळी या भूभागाशी भारताचे संबंध असले पाहिजेत. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;पूर्वेकडच्या अशा देशांत प्राचीन हिंदू संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात त्यातला एक महत्त्वाचा देश म्हणजे कंबोडीया. कंबोडीयाचा नजिकच्या काळातला इतिहास ख्मेर रक्तक्रांती आणि हुकूमशहा पोल पॉटच्या बाबतीत वाचायला मिळतो. प्राचीन इतिहास वाचण्याच्या उद्देशाने मी कंबोडीया, ख्मेर राज्यकर्ते व एंगकोर वट यावर जे थोडे बहुत वाचन केले त्याचे संकलन या लेखाद्वारे करत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इसवी सनापूर्वी सुमारे २००० वर्षांच्या दरम्यान मुख्यत्वे भातशेतीची लागवड करण्यासाठी सुपीक जमीनींचा शोध सुरू झाला. यातूनच भारताच्या मुख्य भूमीवरून हळूहळू पूर्वेकडे स्थलांतर होऊ लागले. सुरुवातीच्या काळात स्थलांतरीतांनी स्वत:ची स्वतंत्र खेडी स्थापन करण्यास प्रारंभ केला. याच बरोबर भारत आणि चीन यांच्या दरम्यान होणाऱ्या व्यापारामुळे हा भूभाग हळूहळू माणसांनी आणि भारतीय संस्कृतीने व्यापला गेला. यालाच या भूभागाचे हिंदुत्वीकरण (इंडिअनायझेशन) म्हणून ओळखले जाते. खऱ्या अर्थाने हिंदुत्वीकरणाचा काळ इसवी सना पूर्वी ५०० (२००?) वर्षे मानला जातो. सर्वात जुनी संस्कृती कंबोडियन समुद्राच्या बंदरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोऱ्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली. भारत- चीन यांच्या व्यापारामुळे वृद्धिंगत होणाऱ्या या संस्कृतीत हळू हळू हिंदू ब्राह्मण, बौद्ध भिक्षू, अन्य विद्वान, कारागीर, कलावंत यांची ये जा ही सुरू झाली. कंभोज (कंबुजा) राजघराण्याच्या उदया विषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती पुढील प्रमाणे -- &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;कंभोज देशाचा ब्राह्मण राजपुत्र कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला. तिथे त्याची नजरभेट ड्रॅगन राजाची (नाग वंश?) मुलगी मीरा (Mera) हीच्याशी झाली आणि तो तिच्यावर भाळला. ड्रॅगन राजा एका पाणथळ प्रदेशावर राज्य करत होता. एक दिवस राजकन्या आपल्या नौकेतून विहारासाठी जात असता कौंडिण्याने तिच्यावर मायावी बाण मारला, जेणे करून राजकन्या त्याच्या प्रेमात पडली. आपल्या जावयाला भेट म्हणून ड्रॅगन राजाने या पाणथळ जागेतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि तो भूभाग कौंडिण्याला राज्य करण्यास भेट दिला. या नव्या राज्याचे नाव पडले कंबुजा आणि कम्बु व मीरा&lt;sup&gt;२&lt;/sup&gt; यांच्या नावांच्या संकरातून या राजघराण्याला ख्मेर हे नाव पडले. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;या राज्याला पुढे फुनानचे राज्य म्ह्टले जाऊ लागले. कालांतराने या भागात लहान मोठी बरीच हिंदू राज्ये वसली गेली. त्यापैकी चेन्लाचे (झेन्ला: चीनी उच्चार) त्यामानाने प्रबळ राष्ट्र बराच काळ फुनानचे मांडलिक होते पण पुढे जाऊन चेन्लाने फुनानवर स्वारी करून ते राज्य आपल्या अंकित केले. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;&lt;strong&gt;फुनान:&lt;/strong&gt;&lt;/span&gt; (इ. स. नंतर पहिले शतक - इ.स. नंतर ६१३) फुनानच्या शासकांनी भारतामधून बऱ्याच ब्राह्मणांना फुनानच्या राज्यात स्थलांतर करण्यास उद्युक्त केले असा उल्लेख वाचण्यास मिळतो. या ब्राह्मणांनी राज्यशासन, राज्य नियंत्रण व कलेच्या क्षेत्रात फुनानच्या शासकांना बहुमोल मदत केली. उत्खननातील काही पुरावे व अवकाशातील छायाचित्रांच्या साहाय्याने या काळात कालवे काढून शेती केली जात होती असे दिसून येते. कंबोडीयाच्या बंदरावरून होणारा व्यापारही या काळात फुलून आला. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;या राज्याची बरीचशी माहीती प्राचीन चिनी दस्तावैजांमधे मिळते. त्यामानाने प्रत्यक्ष कंबोडीया मधे ती फारशी उपलब्ध नाही. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;&lt;strong&gt;चेन्ला:&lt;/strong&gt;&lt;/span&gt; (इ. स. नंतर ५५० - सुमारे ८ वे शतक) चेन्लाचा सर्वप्रथम उल्लेख चिनी दस्तावैजात फुनानचे मांडलिक राज्य म्हणून आढळतो. इ.स.नंतर ५५० ला चेन्ला राज्य फुनान पासून वेगळे होऊन स्वतंत्र झाले. त्यानंतर ६० वर्षांत त्यांनी फुनान बळकावले. इशानपुरा ही चेन्ला राज्याची पहिली राजधानी मानली जाते. या शासकांनीही हिंदू संस्कृतीचा अंगिकार केला. पुढे या राज्याचे अनेक तुकडे पडून एक छत्री अंमल नाहीसा झाला. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;&lt;strong&gt;जावा साम्राज्य&lt;/strong&gt;:&lt;/span&gt; (८ वे शतक) खिळखिळ्या झालेल्या चेन्ला राज्यावर समुद्रापलीकडच्या जावा साम्राज्याने स्वाऱ्या करून त्याला अधिकच लुटले. जावा साम्राज्याशी दोन हात करायला असमर्थ असल्याने चेन्ला राज्यांची समुद्रतटांवरून पीछेहाट झाली व ते कंबोडीयाच्या अंतर्भागातील टोन्ला सॅप या सरोवराच्या आसपास जाऊन वसले. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;&lt;strong&gt;एंगकोर साम्राज्य&lt;/strong&gt;&lt;/span&gt; (इ.स.८०२- इ.स.१४३१): जयवर्मन दुसरा या चेन्ला राज्याच्या एका शासनकर्त्याला जावा साम्राज्यात बंदी ठेवले होते. बंदिवासातील सुटके नंतर त्याने सैन्याची जमवाजमव करून इ. स. ७९० पासून पुढे १२ वर्षे जावा साम्राज्याशी निकराने लढा दिला. इ.स. ८०२ मध्ये त्याने स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला आणि अशा प्रकारे ख्मेर घराण्याचा आणि एंगकोर राजवटीच्या सुवर्ण काळाचा आरंभ झाला. आपल्या राज्यकाळात त्याने कंबोडीयाच्या अनेक प्रांतांवर स्वाऱ्या करून आपला राज्य विस्तार केला आणि एकछत्री अंमल प्रस्थापित केला. याबरोबरच त्याने "देवराजा" ही महत्त्वाची प्रथा सुरू केली. राजा हा ईश्वरी अंश असतो, ही हिंदू संकल्पना त्याने प्रत्यक्ष अमलात आणली. निर्विवाद वर्चस्व आणि आधिपत्य स्थापन करून एंगकोर साम्राज्याची पाळेमुळे कंबोडीयात घट्ट रोवण्यास या प्रथेचा फार मोठा उपयोग झाला. इतिहासावरून दिसून येतं की जयवर्मन आणि त्यानंतरच्या पुढील देवराजांच्या मागे सर्व प्रजा एकजूटीने उभी राहिली आणि एका बळकट साम्राज्य निर्माण झाले. एंगकोरचे साम्राज्य सुमारे ६०० वर्षे टिकले. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;बऱ्याचशा ख्मेर राजांच्या नावामागे लावली जाणारी "वर्मन" ही उपाधी रक्षणकर्ता या अर्थाने वापरली जाते. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;याच वंशातील सूर्यवर्मन दुसरा (१११३ - ११५०) याने जगप्रसिद्ध एंगकोर वट&lt;sup&gt;३&lt;/sup&gt; या भव्य देवळाची निर्मिती केली. भगवान विष्णूंचे हे मंदिर स्थापत्यशास्त्राचे जगातील एक आश्चर्य मानले जाते. हे देऊळ पूर्ण करण्यास ३७ वर्षे लागली व याकामी सुमारे ५०,००० मजूर राबले असा संदर्भ वाचनात येतो. या वंशातील इतर कलाप्रेमी राजांनीही अशा अनेक मंदीरांची निर्मिती केली. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;कालांतराने या वंशातील राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला. असं अनुमान काढलं जातं की बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर 'देवराजाची' प्रथा मोडीत निघाली व हळू हळू राज्य विस्तार, नियंत्रण या सर्वांना खीळ बसली. त्यातूनच पुढे हे साम्राज्य कमकुवत झाले.&lt;br /&gt;&lt;hr /&gt;&lt;br /&gt;&lt;sup&gt;१&lt;/sup&gt;मूळ संस्कृत श्लोकाचा अर्थ याहून वेगळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिळालेल्या माहीतीवरून हा श्लोक उद्धृत केला आहे. तज्ज्ञांनी अधिक माहीती द्यावी. मी संस्कृत जाणकार नसल्याने श्लोक लिहीण्यात चूक झाली असेल तर चू. भू. दे. घे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;sup&gt;२ &lt;/sup&gt;काही ठीकाणी या राजकन्येचे नाव सोमा असल्याचे वाचनात आले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;sup&gt;३&lt;/sup&gt; एंगकोर वटचे मंदीर हा एक विस्तृत विषय असल्याने त्यावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. त्यामुळे अधिक माहीती दिलेली नाही.&lt;br /&gt;वरील लेखासाठी वापरलेली माहीती महाजालावरील अनेक संकेतस्थळांवरून संकलित केली आहे आणि सर्व चित्रे विकिपिडीया मुक्तकोशाच्या सौजन्याने वापरली आहेत. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-115772157811550633?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/115772157811550633/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=115772157811550633' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/115772157811550633'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/115772157811550633'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2006/09/blog-post.html' title='कंबोडीयाचे हिंदू साम्राज्य (भारताची एक प्राचीन वसाहत)'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-115452961153898446</id><published>2006-08-02T07:38:00.000-07:00</published><updated>2007-02-20T12:31:16.681-08:00</updated><title type='text'>राजे सरफोजी आणि सरस्वती महाल ग्रंथालय</title><content type='html'>&lt;div align="left"&gt;इजिप्त व मेसोपोटेमिया सारख्या ठिकाणी संस्कृतींचा (भाषा, लिपी वगैरे) उदय झाल्यावर माणसाला हळूहळू लिखित दस्तावैज तयार करण्याची गरज पडू लागली असा ज्ञात इतिहास आहे. पुरातत्त्ववेत्त्यांना हल्लीच सापडलेली ४०००(?) वर्षांपूर्वीची सुमेरियन मृत्तिका पट्टी ही लिखित दस्तावैजातील सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इजिप्त मध्ये नाईल काठी उगवणार्‍या पपायरस या झाडापासून बनवल्या जाणा-या कागदावर, मेसोपोटेमियात चिकण मातीच्या पट्ट्यांवर आणि भारतात बेतुल वृक्षापासून बनवल्या जाणा-या भूर्जपत्रांवर लिखाणाला सुरुवात झाली. या बरोबरच हे हस्तलिखित जपून ठेवण्याची आणि इतरांना व पुढच्या पिढीला उपलब्ध करून देण्याची गरज भासू लागली. ज्ञान संचयासाठी लागणा-या या गरजेमुळेच नंतरच्या काळात ग्रंथालयाची उत्पत्ती झाली असावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ग्रंथालयाचा सर्वात जुना उल्लेख ग्रीक इतिहासात सापडतो. त्याकाळी ग्रंथालये ही शासनकर्ते व अधिकारी विद्वानांची खाजगी मालमत्ता असून त्यात सर्वसामान्य जनतेला प्रवेश नसावा असे वाचनात आले आहे. ख्रि. पू. तिसऱ्या शतकात टोलेमी दुसरा याच्या काळातले ऍलेक्झांड्रीयाचे ग्रंथालय त्या काळी जगातले सर्वात भव्य ग्रंथालय म्हणून गणले जायचे. भारतातही नालंदा व तक्षशीला सारख्या विद्यापीठांमध्ये अशी ग्रंथालये होती. नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय ९ मजली असल्याचे वाचनात आले आहे. ही ग्रंथालये केवळ विद्यार्थी व सन्माननिय पाहुणे केवळ यांच्यासाठीच होती. दुर्दैवाने त्याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या नंतरच्या इतिहासातही ग्रंथालयांविषयी फार माहिती दिसत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यानंतर मध्ययुगीन कालातही अशी अनेक खाजगी ग्रंथालये असण्याचा संभव आहे. कलाप्रेमी राजे व संस्थानिक यांनी आपल्या खाजगी ग्रंथालयांची स्थापना केली होती. यातील एका महत्वाच्या आणि सध्याही अस्तित्वात असणा-या "सरस्वती महाल ग्रंथालयाची" माहिती हल्लीच माझ्या वाचनात आली. शिवाजी राजांच्या वंशातले राजे सरफोजी यांनी या ग्रंथालयाची स्थापना केली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;सरफोजी राजे (१७७७-१८३२):&lt;/span&gt;&lt;/strong&gt; शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी (व्यंकोजी) राजे यांच्यापासून आठव्या पिढीत सरफोजी राजांचा जन्म झाला. (ते दत्तक पुत्र असल्याचे वाचनात आले आहे) १७९८ साली ते तंजावूरच्या गादीवर आले. सरफोजी राजे हे कलासक्त, साहित्यप्रेमी आणि विद्येचे आदर करणारे होते. त्यांच्या राज्यकालात तंजावूरला विद्येच्या माहेरघराचा दर्जा प्राप्त झाला. वाचन आणि ज्ञानसंचयाच्या विलक्षण आवडीतून त्यांनी सरस्वती महाल ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयासाठी त्यांनी परदेशातून विविध विषयांवरची सुमारे ४००० पुस्तके/ ग्रंथ खरेदी केली. अस म्हटलं जात की ही पुस्तके/ ग्रंथ त्यांनी स्वत: वाचले होते. या ग्रंथालयात नाट्यशास्त्र, नृत्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, हत्ती-घोडे यांचे प्रशिक्षण, वेदान्त, ज्योतिष, व्याकरण, संगीत अशा अनेक विषयांवरील ग्रंथ आढळतात. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;img style="WIDTH: 285px; HEIGHT: 252px" height="300" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/en/e/e8/Serfoji_II.jpg" width="300" align="right" /&gt;&lt;br /&gt;सरफोजी राजांनी दक्षिणेत पहिला देवनागरी छापखाना टाकला. त्यात छपाईसाठी दगडाक्षरांचा वापर करण्यात आला. तसेच त्यांनी वैद्यक शास्त्रातील प्रगती करता धन्वंतरी महाल प्रयोगशाळेची स्थापना केली. यात ऍलोपथी, आयुर्वेद, युनानी, सिद्ध वैद्यांकडून संशोधन चालत असे. या प्रयोगशाळेत अनेक औषधी वनस्पतींचा अभ्यास करून त्यांची खुलासेवार वर्गवारी करण्यात आली. त्यांना चित्रकलेतही विशेष रस होता हे त्यांच्या दरबारातील तैलचित्रांवरून जाणवून येई. त्यांच्याकडे पुरातन दुर्मिळ नाण्यांचा संग्रह ही होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सरफोजी महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकारने तंजावूरचे राज्य खालसा केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;&lt;strong&gt;सरस्वती महाल ग्रंथालय&lt;/strong&gt;:&lt;/span&gt; हे ग्रंथालय संपूर्ण जगात; मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते. या ग्रंथालयात सुमारे ४६००० हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. त्यातील काही प्राचीन असून भूर्जपत्रांवर व ताडपत्रांवर लिहिलेली आहेत. त्यात मध्ययुगीन काळातील वाल्मीकी रामायण, कंब रामायण व इतर पुरातन ग्रंथांच्या ताडपत्रावरील प्रती आहेत. कागदांवर लिहिलेल्या हस्तलिखितांमध्ये इसवी सन १४६८ मध्ये लिहिलेले भामती, भगवद्गीतेचे सर्वात लहान आकारातील हस्तलिखित, अंबर होसैनी या मुसलमान कवीने केलेले भगवद्गीतेचे मराठी निवेदनाचे हस्तलिखित, तत्त्व चिंतामणी हा बंगाली लिपीतील संस्कृत ग्रंथ यांचा समावेश आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;मराठी हस्तलिखिते:&lt;/span&gt;&lt;/strong&gt; इसवी सन १६७६ ते १८५५ च्या मराठा राज्यकाळात लिहिली गेलेली मराठी हस्तलिखिते या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. त्यांची संख्या अदमासे १८५६ आहे. यात संतकवी रामदासी व दत्तात्रय मठातील विपुल साहित्य आहे. पुढे जेव्हा हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले गेले त्यावेळेस अनेक मराठी पंडित व विद्वानांनी लिहिलेल्या १२२० हस्तलिखितांची या संग्रहात भर घातली गेली. आता त्यांची संख्या ३०७६ इतकी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यातील बरेचसे साहित्य महाराष्ट्रात उपलब्ध नसल्याने त्याला दुर्मिळतेचे एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. माधव स्वामींचे रामायण, महाभारत, मेरू स्वामीचे अवधूत गीता टीका व रामसोहळा, मुकुंद स्वामींचे श्री रामकृपा विलास, राघव स्वामीचे आत्मबोध, आणि अनंत मुनी यांची भगवद् गीता यांचा या दुर्मिळ हस्तलिखितांत समावेश आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;याखेरीज तामीळ, संस्कृत, उर्दू हस्तलिखितांचाही या ग्रंथालयात समावेश आहे. मोडी लिपीतील राज्यकारभार विषयक दैनंदिनी, हिशेब, टिप्पणी, पत्र व्यवहार या सारखी लिखितेही या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. याखेरीज मराठी भाषेतील आणि मोडी लिपीत लिहिलेल्या चार प्राचीन ताम्रपट्टीका या ग्रंथालयात दर्शनी ठेवलेल्या आहेत. तसेच अनेक प्राचीन नकाशांचाही संग्रह केलेला आहे. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;सध्या हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले असून त्यातील संग्रहाचा संदर्भकोश म्हणून वापर करता येतो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;a href="http://www.sarasvatimahal.in/"&gt;अधिक माहिती&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-115452961153898446?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/115452961153898446/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=115452961153898446' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/115452961153898446'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/115452961153898446'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2006/08/blog-post.html' title='राजे सरफोजी आणि सरस्वती महाल ग्रंथालय'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-115072961824526899</id><published>2006-06-19T07:57:00.000-07:00</published><updated>2006-06-19T08:24:46.483-07:00</updated><title type='text'>रेव्ह. चार्ली एन्ड्रूज</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;काल परवा रिचर्ड ऍटेनबरोंचा गांधी चित्रपट पुनश्च पाहिला. नक्की कितव्यांदा ते आठवत नाही पण दरवेळेला चित्रपट पाहताना एक प्रश्न नेहमीच पडायचा. संपूर्ण चित्रपटात गांधिजींना "मोहन" म्हणून हाक मारणारे आणि त्यांना भारतात परत आणण्यात काही अंशी कारणीभूत असलेले "रेव्ह. चार्ली एन्ड्रूज" हे महाशय नक्की कोण?&lt;br /&gt;&lt;br /&gt;एखाद्या अपरिचित व्यक्तीची माहिती काढणे हे तसेही थोडे कठिण काम. त्यातून ती व्यक्ती विस्मृतीत गेलेली, माझ्याकडेही माहितीच्या महाजाला शिवाय दुसरे साधन नाही. पण महाजाला सारखं दुसरं प्रभावी साधन नाही असंही म्हणता येईल कारण प्रथमदर्शनी कठीण वाटणारा हा शोध अगदी सोपा झाला. सर्वप्रथम &lt;a href="http://www.imdb.com"&gt;IMDB &lt;/a&gt;(Internet Movie Data Base) वर गांधी चित्रपट शोधला. त्यात रेव्ह. चार्ली एन्ड्रूज हे नाव दृष्टीस पडले त्यामुळे गुगलवर त्यांचा शोध घेणे खूप सोपे झाले. वाचलेल्या माहितीवरुन पुढील गोषवारा लिहीत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेव्ह. चार्ल्स फ्रिर (चार्ली) एन्ड्रूज यांचा जन्म १८७१ साली न्यू कॅसल, इंग्लंड येथे झाला. चार्लींचे वडिल ही चर्च मिनीस्टर होते, त्यांनी लहानग्या चार्लीला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. पहिली, प्रार्थनेवर प्रेम आणि दुसरी गरीबांवर प्रेम. काही कौटुंबिक कारणांमुळे चार्लीचे कुटुंब गरीबीच्या खाईत लोटले गेले. चार्लीच्या आई वडिलांना कुटुंब चालवण्यासाठी जे अपार कष्ट घ्यावे लागले त्याचा लहानग्या चार्लीच्या मनावर खोल परिणाम झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ख्रिस्ती धर्माचे शिक्षण घेऊन १८९७ साली चार्ली पाद्री बनले. याच काळात त्यांचा ब्रिटिश साम्राज्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाच्या झगडयाशी संबंध आला आणि त्यातल्या त्यात भारतात सुरु असलेल्या लढयाविषयी त्यांना विशेष आत्मीयता वाटली. १९०४ साली दिल्ली येथिल से. स्टिफन कॉलेजमधे शिकवण्याची संधी चालून आली आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन चार्ली भारतात दाखल झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतात ब्रिटिशांचे वर्णद्वेषी धोरण पाहून ते व्यथित झाले आणि स्वत: या लढयात सक्रिय व्हायचे त्यांनी ठरवले. लढयाला पाठिंबा देणारा ब्रिटिश पाद्री या नात्याने त्यांना भारतात एक आगळेच महत्त्व प्राप्त झाले. नॅशनल कॉंग्रेसच्या सभा व बैठकींना त्यांना आमंत्रित केले जाऊ लागले. पाद्री असल्याने त्यांनी ब्रिटिश व भारतीय या दोहोंचा विश्वास लवकरच संपादन केला. यानंतर चार्ली स्वत: लढयात सक्रिय झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१९१३ साली कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळकृष्ण गोखले यांच्या आग्रहावरुन चार्ली साऊथ अफ्रिकेच्या भारतीय समाजाला वर्णद्वेषाविरुद्ध त्यांच्या लढयात मदत करण्यासाठी तिथे दाखल झाले. तेथिल वास्तव्यात त्यांची भेट गांधीजींशी झाली आणि गांधीजींच्या अहिंसेच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेने ते प्रभावित होऊन गेले. या दोघांतील अतूट मैत्रीला इथूनच सुरुवात झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१९१६ साली चार्ली गांधींजींसमवेत भारतात परतले. चंपारण्याच्या सत्याग्रहाच्या कैदेत असताना गांधीजींनी त्यांना "फीजी" ला जाऊन तेथिल मजूर आणि कामगारांना आपल्या हक्कांविषयी जागृत करण्यास सुचवले. त्यानुसार चार्ली फिजीला गेले. फीजीला त्यांना "&lt;strong&gt;दीनबंधू &lt;/strong&gt;" या विशेषणाने सन्मानित करण्यात आले.तिथून परतल्यावर १९२५ व १९२७ साली त्यांनी All India Trade Union चे अध्यक्षपद भूषवले. १९३१ साली गोल मेज परिषदेसाठी गांधीजींसमवेत ते ईंग्लंडला जाऊन आले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्व धर्मांविषयी त्यांचा दृष्टीकोन सहिष्णू तर होताच पण अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९३३ साली त्यांनी बाबा साहेब आंबेडकरांना अस्पृश्यांच्या मागण्या अधोलिखित करण्यास मदतही केली. गुरुदेव टागोरांच्या शांतिनिकेतन मधे वेळ घालवण्यास त्यांना फार आवडायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे, भारताविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या ब्रिटिशांनी इंग्लंडला परतावे व स्वातंत्र्यलढा भारतीयांनाच लढू द्यावा असे गांधीजींनी चार्लींना सुचवले. त्या नुसार त्यांनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ ब्रिटनमधे व्यतित केला. तिथेही त्यांनी आपल्या लिखाणातून पाश्चिमात्य जगताला भारतीय स्वातंत्र्य लढा व गांधीजींच्या तत्वांची ओळख करुन दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गांधीजींना "मोहन" या त्यांच्या प्रथम नावाने संबोधणारे चार्ली हे एकच असावेत. “Mahatma Gandhi: His Life and Ideas” हे पुस्तक त्यांनी लिहून प्रकाशित केले होते. ५ एप्रिल १९४० साली कलकत्ता भेटीवर असताना त्यांचे निधन झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;----------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढयाला येन केन प्रकारे मदतीचा हातभार लावणाऱ्या अनेक मोहोऱ्यांविषयी आपण अनभिज्ञ असल्याचे वारंवार लक्षात येते. या छोटयाश्या गोषवाऱ्यातून वाचकांचे लक्ष वेधण्याचा हा एक लहानसा प्रयत्न.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.tear.org.au/resources/target/043/18.cfandrews-peopleoffaith.htm"&gt;या लेखासाठी वापरलेली रेव्ह. चार्ली एन्ड्रुज विषयी अधिक माहिती येथे मिळेल.&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;a href="http://www.dartingtonarchive.org.uk/images/Andrews%20and%20Tagore.JPG"&gt;रेव्ह. चार्ली एन्ड्रुज यांचे छायाचित्र.&lt;/a&gt; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/27527214-115072961824526899?l=vmoti.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vmoti.blogspot.com/feeds/115072961824526899/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=27527214&amp;postID=115072961824526899' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/115072961824526899'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/27527214/posts/default/115072961824526899'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vmoti.blogspot.com/2006/06/blog-post.html' title='रेव्ह. चार्ली एन्ड्रूज'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-27527214.post-114675057301975129</id><published>2006-05-04T06:38:00.000-07:00</published><updated>2006-05-04T10:04:20.590-07:00</updated><title type='text'>विखुरलेले मोती</title><content type='html'>&lt;div align="center"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;काहीतरी वाचताना भा. रा. तांब्याच्या प्रसिद्ध कवितेच्या ओळी नेहमीच आठवून जातात --&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,&lt;br /&gt;तारे अपुला क्रम आचरतील&lt;br /&gt;असेच वारे पुढे वाहतील, होईल का काही अंतराय?&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहिल कार्य काय?&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;काळाच्या ओघात अनेक मौल्यवान रत्ने कुठेतरी हरवून गेली आहेत. तांब्यांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे त्यांची आठवण होणे सुद्धा अभावानेच आहे. कधी त्या रत्नांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून तर कधी समाजाला त्यांची फारशी गरज वाटली नाही. युद्धात वीरमरण पत्करणारा प्रत्येक योद्धा, राज्याश्रय न मिळालेले अनेक विद्वान, प्रासादाच्या पायाशी रचलेला दगड यांची गणती ठेवायची तरी कशी? या रत्नांबद्दल कधी कुठेतरी काही वाचायला मिळाल की मला उगीचच खंत वाटत रहाते. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;या रत्नांबद्दलची माहिती संकलीत करुन ठेवावी अस बऱ्याच वर्षांपासून मनात आहे. त्यांची मी कशी पारख केली, मला ती किती आणि का भावली, त्यांचा हार कसा गुंफत जायचा ते या नवीन ब्लॉग द्वारे माझ्या शब्दांत मांडायच ठरवल आहे. यातली काही रत्न ऐतिहासिक आहेत तर काही पौराणिक, काही खरी तर काही रचवलेली, काही अस्सल भारतीय तर काहींचा दूरान्वये भारताशी संबंध नाही. बाकी त्यांच्याविषयीची माहिती मला जपून ठेवण्याची फार इच्छा आहे. "मनात आलं.."ची सुरुवात देवापासून केली होती. या ब्लॉगची सुरुवात "आई"ने करावीशी वाटते.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;चांगली मुलं घडायला चांगले पालक कारणीभूत असतात. माझ्या सुदैवाने मला ते लाभले आणि मला वाटत की तुम्हालाही लाभले असतीलच. त्यातूनही, आई जर खंबीर, धोरणी, कर्तबगार आणि द्रष्टी असेल तर तिच्या पोटी नक्कीच "शिवाजी" जन्माला येतात. या ब्लॉगची सुरुवात करण्यासाठी जिजाबाईंपेक्षा अधिक महत्वपूर्ण व्यक्ति कोण मिळणार?&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;आपल्या मराठीत म्हण आहे, "स्वामी तिन्ही जगाचा आईविणा भिकारी." शिवाजी महाराज खरोखर भाग्यवान म्हणायला पाहिजेत कारण त्यांना आयुष्यात बराच काळ आपल्या कर्तबगार आईची साथ लाभली.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;जिजाबाई हा कालौघात हरवलेला मोती नाही पण मला वाटत की या मोत्याला हवे तसे कोंदण लाभलेले नाही. विशेषत: माहितीच्या या महाजालावर त्यांच्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे.&lt;em&gt; &lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;४०० वर्षांपूर्वीच्या या स्त्रीचा द्रष्टेपणा आणि दूरदृष्टी ही खचितच वाखाणण्याजोगी आहे. जिजाबाईंचा माहेरचा आधार तुटलेला होता, पतीप्रेमही फारसे त्यांच्या वाटयाला नव्हते. पतीचा दुसरा घरोबा, मोठा मुलगा दुरावलेला, पुण्यासारखी उजाड जहागीर नशीबी आलेली. अशा परिस्थितीतही ज्याच्यावर आपल्या सर्व आशा केंद्रीत आहेत त्या मुलाचे, स्वराज्याचे दुर्गम स्वप्न साकार व्हावे यासाठी अखंड त्याच्या पाठीशी उभं राहून त्याच्या या कार्यात सहभागी होणारी आई इतिहासात विरळाच.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;काही दिवसांपूर्वी विकिपिडियाच्या मराठी ज्ञानकोशाच्या आवृत्तीवर काहीतरी शोधताना एक टीपण्णी वाचली की तेथील लेखांची संख्या केवळ साडे ३००० आहे. सहज म्हणून शिवाजी महाराजांविषयि माहिती शोधली तर बऱ्यापैकी लेख होता पण जिजाबाई, शहाजीराजे आणि इतर अनेक संलग्न व्यक्तींविषयी काहीच माहिती नव्हती. होत्या फक्त माहितीअभावी असलेल्या लाल खुणा. पाहून मनाला बरं नाही वाटलं. आपल्यामधे उत्कृष्ट मराठी लिहिणारे अनेकजण आहेत. त्यापैकी काही जणांनी तरी आपल्याकडिल माहिती या ज्ञानकोशात घातली तर तेथील उपयुक्त लेखांची संख्या वाढेल.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;मी इतिहास विषयाची तज्ञ मुळीच नाही, तरीही मला जिजाबाईंविषयी ज्ञात असलेली ऐतिहासिक माहिती मी तिथे भरली. आपल्याला या पेक्षा जास्त माहिती असल्यास जरुर फेरफार करा. एके ठिकाणी जिजाबाईंविषयी बऱ्यापैकी माहिती मिळून गेली, पण त्यात आख्यायिका अधिक वाटता
